Tuesday, April 25, 2023

"लोकनेते शरद पवार यांनी 'खास सन्मानित' केलेले पुरंदरचे लोकप्रिय युवा नेते पुष्कराज जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन सोहळ्याची पर्वणी"




पुरंदर, परिंचे, दि. २५ : "लोकनेते शरद पवार यांनी 'खास सन्मानित' केलेले पुरंदरचे लोकप्रिय युवा नेते पुष्कराज जाधव यांचा वाढदिवस सोमवारी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे आनंददायी व उत्साहमय वातावरणात, मान्यवरांच्या उपस्थितीत व शेकडो, हजारो लोकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.




पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  पुष्कराजभैय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्रभुषण,प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा भव्य कीर्तन सोहळा सोमवारी दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी, ग्रामपंचायत कार्यालय परिंचे या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत, आध्यात्मिक वातावरणात, उत्साहात संपन्न झाला.




या कीर्तन सोहळ्यासाठी पुरंदर तालुक्यातील, ग्रामीण भागातील शेकडो, हजारो लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात पुष्कराज जाधव यांनी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.




'पाणपोई' हा एक सामजिक उपक्रम व तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याईचे काम म्हणून पुष्कराजभैय्या जाधव मित्र परिवार तर्फे मागील वर्षी नागरिकांसाठी परिंचे येथे पाणपोई सुरू करण्यात आलेली आहे.




आजच्या काळात 'पाणपोई' लुप्त होऊ लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांची विकतची पाणी पिण्याची जास्त मानसिकता नसते.त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॅाटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.वास्तविक तहान कमी झालेली नाही.परंतु समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोईची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


उन्हाची तीव्रता जास्त जाणवत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी ,अबालवृध्द महिला व वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हॅाटेल व चहाच्या टपरीचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो या सामजिक बांधिलकीतुन ,नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने पुरंदर तालुक्यातील परिंचे या ठिकाणी रयत शिक्षण संस्था शाळा , ग्रामपंचायत समोर बाजार पेठ येथे व श्रीनाथ मंदिर परिसर या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री पुष्कराज भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने 'पाणपोई' सुरू करण्यात आलेली आहे. या सामाजिक उपक्रमाचे लोकांकडून कौतुक करण्यात आलेले आहे.




पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करून पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक  अध्यक्ष पुष्कराज जाधव हे तरुणांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत.



पुष्कराज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण सहकाऱ्यांची व तरुण मित्रांची उपस्थिती लक्षणीय होती.




पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पुष्कराज भैय्या जाधव यांचा वाढदिवस परिंचे येथे मोठ्या उत्साहात, आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष अभिष्टचिंतन कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध समाज प्रबोधनकार, कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांच्या कीर्तन सोहळ्याची पर्वणी शेकडो, हजारो लोकांना अनुभवता आली.




सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, औद्योगिक, राजकीय,  क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्कराज जाधव यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, ज्येष्ठ नेते सुदामराव इंगळे, पुरंदरचे नेते बबूसाहेब माहूरकर, श्यामकांत  भिंताडे ,सतीश शिंदे, शरद जगताप, श्री विजय जगताप (कात्रज डेअरी) व तसेच श्री प्रभाकर कदम ,( बाबा) जगताप , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्कराज जाधव यांना शुभेच्छा दिल्या.


पुष्कराज जाधव यांनी पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, लोकनेते शरद पवार यांनी मार्गदर्शन केलेला "शेतकरी संवाद" हा कार्यक्रम आयोजित करून तसेच वेगवेगळी आंदोलने करून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.


Friday, April 14, 2023

३०० वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक परंपरा असलेली, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील "जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा" उत्साहात, भक्तिमय वातावरणात संपन्न'; महाराष्ट्रातील,सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावचा "असा" असतो ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळा,वाचा सविस्तर"...



फलटण, जिंती, दि.१४ : सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावची ३०० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेली श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा गुलाल - खोबऱ्यांची उधळण करीत, "जितोबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात, भक्तीमय वातावरणात पार पडली. 




ही ऐतिहासिक परंपरा सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षांपासून ग्रामस्थांनी भक्तिभावाने जोपासली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन, पुणे,सांगली, सातारा जिल्ह्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.




"महाराष्ट्रातील,सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावचा "असा" असतो ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळा : - 



सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील जिंती गावचा जितोबा देवाचा ऐतिहासिक बगाड यात्रेचा सोहळा पाच दिवस चालू असतो. 




या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यात पहिल्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा हळदी समारंभ संपन्न होतो. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यानंतर दुसऱ्या दिवशी श्री जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा लग्न समारंभ पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.




या यात्रा सोहळ्यातील तिसरा दिवस यात्रेचा महत्त्वाचा दिवस श्री जितोबा देवाचे बगाड. या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात.




यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री जितोबा देवाचा पहाटे चार वाजता छबिना भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. त्या दिवशी चार वाजता कुस्तीचा आखाडा रंगतो. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पाचव्या दिवशी पाकाळणी होऊन अशा प्रकारे प्रसिद्ध जिंती गावची श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा पार पडते.




ही ऐतिहासिक यात्रा पार  पडत असताना श्री जितोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे ऐतिहासिक बगाड हे बगाड सोमवार, बुधवार ,आणि शनिवार या वारी होत नाही. 



श्री जितोबा देवाची यात्रा चैत्र शुद्ध कालाष्टमीला सुरू होते. श्री जितोबा देवाच्या बगाडाच्या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री जितोबा देवाच्या यात्रेत समाजातील सर्व घटकांना, अठरापगड जातीतील लोकांना मान असतो .




या ऐतिहासिक बगाड सोहळ्याची सुरुवात हराळी वैष्णव मठापासून म्हणजे हराळी समाजातील मठ म्हणजेच या लोकांचा एकत्रित देव्हारा होय. या देव्हाऱ्यासमोर श्री जितोबा देवाचे मानकरी, बगाडी यांना पोशाख परिधान करण्यात येतो. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या पोशाखाचा मान "वाकी या गावातील भक्ताचा" असतो. यावेळेस जिंती गावातील सर्व लोक उपस्थित असतात. 




श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी यांना पोशाख झाल्यावर गोसावी समाजाचे लोक नातपंथाचे पद म्हणतात. यानंतर बगाडी पालात ढोल - ताशांच्या गजरामध्ये श्री जितोबा देवाच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात.




यावेळेस गुलालाची उधळण होते.हजारो भाविक भक्त हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. यावेळी श्री जितोबा देवाचे मानाचे बगाडी श्री जितोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होतात. श्री जितोबा देवाचे दर्शन झाल्यानंतर श्री जितोबा मंदिरा मधील दीपमाळेचे दर्शन घेऊन श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडाकडे प्रस्थान करतात.




हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त उपस्थित असतात. श्री जितोबा देवाचे बगाडी बगाडावर गेल्यावर श्री जितोबा मंदिराकडे तोंड असते या वेळेस श्री जितोबा देवाचे ऐतिहासिक, पारंपरिक बगाड   सुरू झालेले असते. हा बगाड सोहळा 15 ते 20 मिनिटं सुरू असतो.




या ऐतिहासिक बगाड सोहळ्यात  सनई, चौघड्याचा निनाद तसेच ढोल -  ताश्या, बँड, आणि "जितोबाच्या नावानं चांगभलं" हा गजर सर्वत्र चालू असतो.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या सोहळ्यात फटाक्यांची अतिषबाजी होते. या 15 ते 20 मिनिटांमध्ये श्री जितोबा देवाची भाकणूक यामध्ये ठरत असते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.




हे ऐतिहासिक बगाड झाल्यानंतर बगाडी बगाडावरून आपले अंग पूर्णपणे मागे टाकून देतात. यानंतर सर्व भक्त या बगाड्याला झेलतात यानंतर  त्यांच्या पायावर पाणी टाकले जाते. यानंतर बगाड्याच्या कानामध्ये सनई वाजवून जागं केलं जातं. जागे झाल्यावर बगाडी ढोल, सनई चौघड्याच्या ताशामध्ये भक्तिमय वातावरणात खेळतात .खेळताना त्यांना स्नान घातले जाते .यानंतर श्री जितोबा देवाचा वर्षभराचा पारंपरिक भाकणूक सोहळा संपन्न होतो.




ही पारंपरिक भाकणूक झाल्यावर किरणाच्या जागेचा रस्ता मोकळा करण्यात येतो. किरण म्हणजे श्री जितोबा मंदिरासमोर बगाडी मानकऱ्याकडून गोल उडी मारली जाते. यानंतर बगाडी  पारंपरिक मठाकडे प्रस्थान करतात. अशा प्रकारे हा जिंती गावचा  ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो.




"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेला ३०० पेक्षा जास्त वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक - भक्त आमच्या जिंती गावच्या ऐतिहासिक बगाड यात्रेसाठी उपस्थित राहतात.  जिंती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ऐतिहासिक बगाड यात्रा सोहळ्याचे चांगले नियोजन केले जाते." अशी प्रतिक्रिया जिंती गावचे ग्रामस्थ, भक्त दिपक रणवरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारी ही जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा भक्तीचा वारसा समृद्ध करते.