Wednesday, July 15, 2026

"श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात भक्ती,शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम; भारतातील 16 हजारांहुन अधिक शाळा व वीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' संस्थेचे शिलेदार मिलिंद माने मित्र परिवारातर्फे श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांना रेनकोट वाटप करून, सामाजिक वसा जपण्याचा "या" चार जिवलग मित्रांचा अनोखा सामाजिक उपक्रम"

सासवड, दि.15 : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सासवड येथून श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान करून, श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा  रविवारी १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यातील, पांगारे येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

"टाळ-मृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "श्री संत सोपानदेव महाराज की जय" या जयघोषाने अवघा पुरंदर तालुका व पांगारे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.या पालखी सोहळ्याचे नेटके, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारे विविध सामाजिक उपक्रम हे या वर्षीच्या वारीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत."

"पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या चार मित्रांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन या वारीत पहायला मिळाले. सेवा, भक्ती, शक्ती, आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या श्री संत सोपानकाका महाराज पालखी  सोहळ्यात पाहायला मिळाला. महाराष्ट्राची महान परंपरा असलेल्या या वारीच्या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या भक्ती आणि शक्तीच्या ऊर्जेची अनुभूती प्रत्येक भाविक - भक्ताला आल्याशिवाय राहत नाही""

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात विठूनामाचा गजर घुमत असून, महाराष्ट्रातील महान संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या भक्तीच्या महासागरात केवळ विठ्ठलनामाचा गजरच नाही, तर सेवेचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये अशाच एका निस्सीम सेवाभावाची प्रचिती आली, जेव्हा समाजातील चार यशस्वी मित्रांनी एकत्र येत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी हक्काची सावली निर्माण केली.

भारतात शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य करणाऱ्या आणि देशातील १६ हजारांहून अधिक शाळांमधील तब्बल २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' (Lend-A-Hand India) या नामांकित संस्थेचे शिलेदार मिलिंद माने आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.

या पालखी सोहळ्यात लेंड अ हँड इंडिया या सामाजिक संस्थेचे शिलेदार मिलिंद माने व यांच्या मित्र परिवाराने श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे.

"पावसाची संततधार आणि वाढती थंडी लक्षात घेऊन, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांच्यासह पुण्याच्या उद्योग जगतातील प्रसिद्ध नाव आणि 'ओव्हन फ्रेश'चे मालक प्रमोद बाक्रे, अग्रगण्य इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर किरण सामल आणि जिम साहित्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योजक संजय सावंत या चार मित्रांनी श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात सेवाभावी वृत्तीतून शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप केले."

आपला व्यवसाय आणि दैनंदिन व्यस्ततेमधून वेळ काढत, वारीतील शेवटच्या घटकाची काळजी घेण्याच्या उद्देशाने या चार मित्रांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. 

वारीदरम्यान कोसळणाऱ्या पावसातही वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास अविरत सुरू राहावा, त्यांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे रेनकोट जणू माऊलींची मायेची शाल ठरले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. या वारीत विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या या वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर चालत असताना भक्ती आणि अध्यात्मिक ऊर्जेची आम्हाला अनुभूती मिळाली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान,आनंद आणि या महान पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे," अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.

भक्ती, शक्ती आणि सामाजिक सेवेचा हा अनोखा मेळ पाहून संपूर्ण पालखी सोहळ्यात या चारही मित्रांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, "अशाच समाजसेवेतून खऱ्या अर्थाने विठ्ठल सेवा घडते," अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी दिली.

पारंपरिक रिवाज आणि शिस्तबद्ध नियोजन -

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख  त्रिगुण महाराज गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीचे रिवाज जपत आणि कोणताही विस्कळीतपणा येऊ न देता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालखीचे मार्गक्रमण सुरू आहे.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या वारीचे हेच नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वरूप दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत असते. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यंदाही श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याला कडक सुरक्षा आणि स्वयंसेवकांच्या चोख नियोजनात दिंड्यांचे पांगारे येथे शांततेत, भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

'फूल ना फुलाची पाकळी' सेवाभावी वृत्तीतून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप - 

आषाढ महिन्यातील संततधार पाऊस आणि बदलत्या हवामानाचा विचार करून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक सेवाभावी संस्था आणि भक्तांचे कर्तव्य ठरते. याच उदात्त भावनेतून, पालखी सोहळा प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून 'फूल ना फुलाची पाकळी' या भावनेने शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमामध्ये एलआयसी ऑफ इंडियाचे भारतातील प्रसिद्ध अधिकारी, भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणारी सामाजिक संस्था "लेंड अ हॅन्ड इंडिया" या संस्थेचे शिलेदार मिलिंद माने, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक किरण सामल, प्रमोद बाक्रे, संजय सावंत यांनी भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ मदत न करता हे सर्व मित्र स्वतः वारीच्या भक्तीमय वातावरणात दंग झाले. 

त्यांनी वारकऱ्यांसोबत सासवड ते पांगारे या पालखी सोहळा मार्गावर टाळ धरत, वारीमध्ये पायी प्रवास केला आणि वारीचा अलौकिक सोहळा अनुभवला. 

रेनकोट वाटपासारख्या पवित्र कार्याची आणि वारकरी सेवेची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मित्र परिवाराने  श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पांगारे येथील या मुक्कामादरम्यान पालखी सोहळ्यातील सर्व १२६ नोंदणीकृत दिंड्या, त्यांचे प्रमुख, वारकरी भाविक, विणेकरी आणि चोपदार यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.

पुणे येथील मित्र परिवाराने सोपानदेवांच्या चरणी लीन होऊन, सर्व वारकऱ्यांना पुढील वारीचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि सुरक्षित होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पांगारे येथील ग्रामस्थांच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला वर्गाने श्री संत सोपानकाका महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. सोमवारी पहाटे महापूजा आणि आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचा हा अनोखा सोहळा पंढरीच्या दिशेने विठूनामाचा गजर करत पुढे वाटचाल करत आहे.

‘वारी’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा, देदीप्यमान आणि जिवंत उत्सव आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो वारकऱ्यांनी भक्ती भावाने पायी चालत जाण्याची जी शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी ही 'वारी' लाखो वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करते.

वारी करणाऱ्या लाखो श्रद्धाळू वारकऱ्यांना भक्तीची ही ऊर्जा वर्षभर मिळत असते. ​हा केवळ एक धार्मिक प्रवास नाही, तर तो समता, बंधुभाव आणि भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा आहे.

पुणे....

पुणे....

News in Editing in Process....

Sunday, June 21, 2026

"आईची प्रेरणा,वडिलांचे मार्गदर्शन; पुणे शहरातील पाणीपुरवठा विभागातील शिलेदार उदय जाधव यांची कन्या सई जाधव या गुणवंत विद्यार्थिनीचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश; पुण्यातील लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर, लोकप्रिय नगरसेवकांची कौतुकाची थाप; जिद्द, चिकाटी,मेहनत व उत्तुंग यश; प्रशासकीय अधिकारी बनण्याचे सईचे स्वप्न".....

पुणे,दि.21 : जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर पुण्याच्या सहकारनगर येथील 'मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल'ची विद्यार्थिनी कु. सई उदय जाधव हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून ९५% गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. केवळ पाठांतरावर भर न देता संकल्पना समजून घेऊन, आत्मसात करण्याच्या तिच्या अनोख्या अभ्यासाच्या पद्धतीमुळे सईने हे मोठे यश खेचून आणले आहे. 

"सई जाधव हिच्या यशामुळे जाधव कुटुंब, मुक्तांगण शाळा आणि संपूर्ण धनकवडी परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सईच्या या यशामागे पुणे महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात प्रामाणिक सेवा देणारे तिचे वडील उदय जाधव आणि आदर्श शिक्षिका असलेल्या सईच्या आई मनीषा जाधव यांची प्रेरणा, मार्गदर्शन व संस्कार कारणीभूत असल्याचे पाहायला मिळत आहे."

"पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर व धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षा तापकीर यांनी सई जाधव हिच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल सत्कार करून, कौतुकाची थाप दिली आहे. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दिलेली कौतुकाची थाप नेहमीच मुलांना प्रेरणा देणारी असते" 

"पुणे शहरातील धनकवडी प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक किशोर धनकवडे यांनी सई जाधव या गुणवंत विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्याबद्दल  कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिलेली कौतुकाची थाप ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या भावी कारकीर्दीसाठी बळ देणारी असते. पुण्यातील प्रसिद्ध वर्धमान सोसायटीचे सभासद बापूसाहेब शिरोळे व सूर्यवंशी सर यांनी देखील सई जाधवच्या उत्तुंग याबद्दल कौतुक केले."

"शालेय जीवनामध्ये विद्यार्थी मेहनत घेत असतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यश मिळवल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दिलेली कौतुकाचे थाप नेहमीच त्यांना भावी यशस्वी कारकीर्दीसाठी प्रेरणा देत असते. पुणे शहरातील बालाजीनगर - कात्रज- आंबेगाव प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका प्रतिभा चोरघे व शेतकरी युवा संघ अध्यक्ष, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रोहिदास बापू चोरघे यांनी सई जाधवला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्याबद्दल सन्मान करून, कौतुक केले. पुणे शहरातील धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका तेजश्री बदक व सामाजिक कार्यकर्ते सचिन बदक यांनी सई जाधव हिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील उत्तुंग यश मिळाल्याबद्दल सन्मान करून, कौतुक केले."

जुनियर के.जी. ते दहावीपर्यंतचा प्रवास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन :

सईने तिचे जुनियर के.जी. पासून ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शालेय शिक्षण सहकारनगरमधील नामांकित 'मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल'मधून पूर्ण केले आहे. 

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे शहरात संपूर्ण देशभरातून, जगभरातून विद्यार्थी  शिक्षणासाठी येत असतात. पुणे शहरात चांगले शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उत्तमरीत्या कार्यरत असल्यामुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

शालेय जीवनाच्या सुरुवातीपासूनच सई जाधव एक अत्यंत हुशार आणि आज्ञाधारक विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात आहे. शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या शालेय उपक्रमांमध्ये व विविध स्पर्धांमध्ये सहभागी घेऊन, सईने चांगले यश मिळवलेले आहे.

तिच्या या यशाबद्दल बोलताना सईने सांगितले की, "माझ्या या यशाचे श्रेय माझे आई, वडील व मार्गदर्शक, माझ्या शाळेतील अनुभवी आणि गुणी शिक्षकांना जाते. त्यांनी प्रत्येक विषयात मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आणि माझा आत्मविश्वास वाढवला."

घोकंपट्टीला फाटा; संकल्पना समजून घेऊन आत्मसात करण्यावरती दिला भर : 

आजकाल अनेक विद्यार्थी केवळ गुण मिळवण्यासाठी पाठांतर किंवा घोकंपट्टी  करण्यावर भर देतात. मात्र, सईने या पारंपारिक आणि तात्पुरत्या पद्धतीला पूर्णपणे फाटा दिला. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

सई जाधव हिने पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक विषयातील मूलभूत संकल्पना  समजून घेऊन, आत्मसात करून, अगदी स्पष्ट ठेवण्यावर भर दिला. अभ्यासातील याच सातत्यामुळे आणि विषयाचे सखोल ज्ञान घेतल्यामुळे तिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५% इतके गुण मिळून, हे मोठे यश मिळवणे सहज शक्य झाले. पुणे शहरातील धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षा तापकीर यांनी सई जाधव हिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल  कौतुकाची थाप दिलेली आहे.

कर्तव्यदक्ष पिता आणि 'आदर्श पुरस्कार' विजेत्या शिक्षिका मातेचे संस्कार : 

"सई जाधवच्या घरची पार्श्वभूमी ही सुशिक्षित आणि समाजसेवेची आहे. तिचे वडील  उदय जाधव हे पुणे महानगरपालिकेच्या  पाणीपुरवठा विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी तसेच जनसामान्यांना पाणी मिळावे म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे शिलेदार  म्हणून परिचित आहेत. पुणे शहरातील लोकांना वेळेवर पाणी मिळावे म्हणून चांगली सेवा देऊन, कार्यरत आहेत. पुणेकरांना नियमित आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ते अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा देतात. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा आणि कष्टाचा मोठा प्रभाव सईवर आहे.

"दुसरीकडे, सईची आई मनीषा जाधव या पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीची आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना 'आदर्श शिक्षिका' पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. घरातच आईच्या रूपाने 'आदर्श शिक्षिका' आणि वडिलांच्या रूपाने 'कर्तव्यदक्ष सेवक' लाभल्यामुळे सईला अभ्यासाचे आणि कष्टाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले."

एकत्र कुटुंबाचे पाठबळ :

आजच्या विभक्त कुटुंबाच्या काळात सईला तिच्या आजी-आजोबांच्या छत्राखाली वाढण्याचे भाग्य लाभले. सईच्या या यशात तिचे आजोबा,आजी, आई-वडील,चुलते आणि तिचा लहान भाऊ या सर्वांचा खूप मोठा पाठींबा आहे.

परीक्षेच्या काळात संपूर्ण कुटुंबाने घरात अभ्यासाचे अत्यंत प्रसन्न वातावरण तयार केले होते. तिच्या प्रत्येक अभ्यासासाठी आवश्यक गोष्टीची काळजी कुटुंबाने घेतली, ज्यामुळे सई कोणत्याही तणावाशिवाय परीक्षेला सामोरी जाऊ शकली.

भविष्यातील ध्येय : 'इंजिनिअरिंग' आणि 'प्रशासकीय सेवेतून देशाची सेवा'

सई जाधव केवळ दहावीच्या यशावर थांबणारी नाही, तर तिने भविष्यातील ध्येय आत्तापासूनच निश्चित केले आहे. तिला इंजिनिअरिंग सीईटी (Engineering CET) परीक्षेची अत्यंत जोमाने तयारी करायची आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिला प्रशासकीय सेवांमध्ये (Administrative Services - UPSC/MPSC) प्रवेश करायचा आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी बनून देशाची आणि समाजाची प्रामाणिक सेवा करणे, हेच तिचे अंतिम ध्येय आहे.

आई-वडिलांप्रमाणेच शासकीय व्यवस्थेत राहून देशसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा सईचा मानस आहे. कुटुंबातील सुशिक्षित व समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा तिचा मानस आहे.

"सई उदय जाधव हिने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, कष्टकरी आणि प्रामाणिक पालकांच्या संस्कारांचा हा विजय आहे. सईच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून,धनकवडी परिसरातून, पुणे शहरातून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

"पुणे शहरात पाणीपुरवठा विभागात लोकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्यरत असतो. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना, कुटुंबातील आमच्या कन्येचे यश निश्चितच प्रेरणा देऊन जाते. सईने प्रामाणिकपणे केलेला अभ्यास, जिद्द, चिकाटी यामुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. पुणे शहरातील लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर साहेब व धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षाताई तापकीर यांनी  सईचा सत्कार करून तिच्या यशस्वी वाटचालीबद्दल दिलेली कौतुकाची थाप तिला प्रेरणा देणारी आहे." अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा विभागाचे शिलेदार,सईचे वडील उदय जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"कुठल्याही पालकाला आपल्या मुलांचे यश हे नेहमीच आनंद देत असते. सई पहिल्यापासूनच अभ्यासू विद्यार्थिनी असल्यामुळे, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा मनापासून केलेला अभ्यास, प्रचंड मेहनत, शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन व योग्य दिशेने केलेले प्रयत्न यामुळे तिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. तिचे भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी तिला मनापासून शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया सई जाधवच्या आई, आदर्श शिक्षिका मनीषा जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"मला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या यशात माझे आई-वडील व शिक्षक यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. माझ्या आयुष्यात माझ्या आईची प्रेरणा व वडिलांचे मार्गदर्शन नेहमीच ऊर्जा देणारे आहे. भविष्यात अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, स्पर्धा परीक्षा देऊन, प्रशासकीय अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे." अशी प्रतिक्रिया सई जाधव हिने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

आजच्या काळातील मुले माध्यमिक शिक्षण घेत असताना व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन, चांगले यश मिळवत असतात. पालकांचे, शिक्षकांचे व समाजाचे मार्गदर्शन व पाठिंबा असेल तर हीच मुले उद्याच्या विकसित भारताचे स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकतात.

Monday, June 8, 2026

"90 वर्षीय आजीने न्यायाची लढाई जिंकली! नातू - पणतुंना दिलेली 8 एकर जमीन परत; बक्षीसपत्र रद्द, शासकीय लाभ व्याजासह परत करण्याचे लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांचा आदेश; कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या "या" लोकहिताच्या निर्णयाने जिंकली जनसामान्यांची मने"....


लातूर,दि.८ : प्रेम, विश्वास आणि वृद्धापकाळातील आधाराच्या अपेक्षेने आपली संपत्ती पुढच्या पिढीच्या नावे करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा धक्का बसतो. मात्र, लातूर जिल्ह्यातील एका ९० वर्षीय आजीने कायद्याच्या आधारे आपल्या हक्काची लढाई जिंकून सर्वांना एक नवा दिलासा दिला आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"लातूर जिल्ह्यातील कारसा गावातील हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावे केलेले आठ एकर जमिनीचे बक्षीसपत्र उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ अंतर्गत रद्द केले आहे. फेरफार नोंद रद्द करून जमीन आजीच्या नावे करण्याचे आदेश देण्यात आले असून, नातू-पणतूंनी घेतलेले शासकीय लाभ, अनुदाने आणि पीकविमा यासह सर्व आर्थिक फायदे व्याजासह परत करण्याचे कडक निर्देश दिले आहेत." कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या या आदेशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यातील जनसामान्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


हौसाबाई लहाडे यांचे वय ९० वर्षे आहे. त्यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. कारसा गावात सुमारे आठ एकर शेतजमीन त्यांच्या मालकीची होती. वृद्धत्वात आपली काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्यांनी ही जमीन नातू आणि पणतूच्या नावे नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित केली. मात्र, जमीन हस्तांतरित झाल्यानंतर नातू आणि पणतूने आजीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. 


गेल्या अनेक वर्षांपासून ते गावाकडे फिरकलेच नाहीत. जमीन भाड्याने दुसऱ्याकडे कसण्यास दिली आणि उत्पन्न स्वतःकडे ठेवले. यामुळे हौसाबाईंना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

“ज्यांच्या नावाने आयुष्यभराची पुंजी दिली, त्यांनीच वाऱ्यावर सोडले तर काय करावे?” असा प्रश्न पडल्याने हौसाबाईंनी लातूर उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला. दोन्ही बाजूंची कागदपत्रे, पुरावे आणि युक्तिवाद ऐकून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे पाटील यांनी सखोल सुनावणी केली. अधिनियम २००७ च्या कलम २३ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी बक्षीसपत्र आणि फेरफार नोंद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 


या निर्णयाने केवळ जमीन परत मिळाली नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण कसे होते याचे उदाहरणही निर्माण झाले आहे.


कायद्याची तरतूद काय सांगते? :

ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २३(१) नुसार, ज्येष्ठ नागरिकाने प्रेमापोटी किंवा विश्वासाने मालमत्ता हस्तांतरित केली असता आणि त्यात संगोपन व काळजी घेण्याची अट अंतर्भूत असेल, तर ती अट पूर्ण न झाल्यास हस्तांतरण फसवणूक किंवा जबरदस्तीने झाल्यासारखे मानले जाते. न्यायाधिकरण अशा हस्तांतरणाला रद्द ठरवू शकते. हौसाबाईंच्या प्रकरणात बक्षीसपत्रात संगोपनाची अपेक्षा स्पष्ट होती आणि ती पूर्ण न झाल्याने निर्णय आजीच्या बाजूने लागला.


लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे पाटील यांनी सांगितले, “अनेकदा आई-वडील किंवा ज्येष्ठ नागरिक प्रेमापोटी मालमत्ता मुलांच्या किंवा नातवंडांच्या नावे करतात. मात्र, अशा हस्तांतरणात संगोपनाची अट नमूद असते. ती पूर्ण न झाल्यास बक्षीसपत्र रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.” या निर्णयामुळे वारसा हक्काच्या नावाखाली संपत्ती लाटून ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.


आर्थिक फटका आणि पुढचे परिणाम :

फक्त जमीन परत मिळणे एवढेच नाही, तर नातू-पणतूंनी या जमिनीवर घेतलेले शासकीय अनुदाने, पीकविमा, इतर आर्थिक लाभ व्याजासह शासनाला परत करावे लागणार आहेत. हा आर्थिक बोजा त्यांच्यासाठी मोठा ठरणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आता आपली संपत्ती हस्तांतरित करताना कायदेशीर सल्ला घेऊन अटी स्पष्टपणे नमूद करण्याकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


समान प्रकरणे आणि व्यापक संदर्भ : 

हे प्रकरण एकमेव नाही. देशभरात अशी अनेक प्रकरणे न्यायालयीन स्तरावर येत आहेत. दिल्ली उच्च न्यायालय, छत्तीसगढ उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय यांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्ती हस्तांतरणात संगोपनाची अट पूर्ण न झाल्यास बक्षीसपत्र (गिफ्ट डीड) रद्द करण्याचे निकाल दिले आहेत. महाराष्ट्रातही यापूर्वी अशी प्रकरणे समोर आली आहेत. हे प्रकरण ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आदर्श ठरेल.


भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. २०२६ पर्यंत ही संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, कुटुंब पद्धती बदलत असताना अनेक ज्येष्ठ एकाकी पडत आहेत. अशा वेळी कायद्याचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. हौसाबाईंचा निर्णय केवळ एक व्यक्तिगत विजय नाही तर समाजाला संदेश आहे – संपत्ती देणे हे प्रेमाचे प्रतीक आहे, पण त्याची किंमत ज्येष्ठांच्या अपमानाने किंवा दुर्लक्षाने चुकवता येणार नाही.


हौसाबाईंची भावना : 

लातूरच्या हौसाबाईंच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, निर्णयानंतर आजींना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षानुवर्षे सहन केलेला मानसिक त्रास संपला. आता त्यांना आपल्या जमिनीवर नियंत्रण मिळेल आणि शांततेने उर्वरित आयुष्य घालवता येईल. गावातील लोकही या निर्णयाचे स्वागत करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देऊ लागल्याचे हे चित्र सकारात्मक आहे.


"लातूरचा हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा ऐतिहासिक ठरला आहे. उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधिकरणाने दाखवलेल्या संवेदनशीलतेला सलाम. हा निर्णय इतर ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देईल की, त्यांचा आवाज दडपला जाऊ नये. कुटुंबातील जबाबदारी ही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही आहे. प्रेमापोटी दिलेली संपत्ती अपेक्षाभंगाने परत घेण्याची गरज पडू नये, यासाठी प्रत्येक पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे."


भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. कुटुंबातील व्यक्तींनी वृद्ध लोकांची काळजी घेतली तर त्यांना कायद्याचा आधार घेण्याची गरज पडणार नाही. यासाठी समाजामध्ये चांगले प्रबोधन होण्याची गरज आहे.