सासवड, दि.15 : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सासवड येथून श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याने अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान करून, श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावला.
"टाळ-मृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "श्री संत सोपानदेव महाराज की जय" या जयघोषाने अवघा पुरंदर तालुका व पांगारे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.या पालखी सोहळ्याचे नेटके, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारे विविध सामाजिक उपक्रम हे या वर्षीच्या वारीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत."
"पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या चार मित्रांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन या वारीत पहायला मिळाले. सेवा, भक्ती, शक्ती, आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यात पाहायला मिळाला."
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात विठूनामाचा गजर घुमत असून, महाराष्ट्रातील महान संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या भक्तीच्या महासागरात केवळ विठ्ठलनामाचा गजरच नाही, तर सेवेचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये अशाच एका निस्सीम सेवाभावाची प्रचिती आली, जेव्हा समाजातील चार यशस्वी मित्रांनी एकत्र येत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी हक्काची सावली निर्माण केली.
भारतात शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य करणाऱ्या आणि देशातील १६ हजारांहून अधिक शाळांमधील तब्बल २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' (Lend-A-Hand India) या नामांकित संस्थेचे शिलेदार मिलिंद माने आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.
या पालखी सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे.
पावसाची संततधार आणि वाढती थंडी लक्षात घेऊन, मिलिंद माने यांच्यासह पुण्याच्या उद्योग जगतातील प्रसिद्ध नाव आणि 'ओव्हन फ्रेश'चे मालक प्रमोद बाक्रे, अग्रगण्य इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर किरण सामल आणि जिम साहित्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योजक संजय सावंत या चार मित्रांनी सेवाभावी वृत्तीतून शेकडो वारकऱ्यांना रेनकोटचे मोफत वाटप केले.
आपला व्यवसाय आणि दैनंदिन व्यस्ततेमधून वेळ काढत, वारीतील शेवटच्या घटकाची काळजी घेण्याच्या उद्देशाने या चार मित्रांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. वारीदरम्यान कोसळणाऱ्या पावसातही वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास अविरत सुरू राहावा, त्यांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे रेनकोट जणू माऊलींची मायेची शाल ठरले.
"वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. या वारीत विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या या वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर चालत असताना भक्ती आणि अध्यात्मिक ऊर्जेची आम्हाला अनुभूती मिळाली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान,आनंद आणि या महान पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे," अशा भावना यावेळी मिलिंद माने आणि त्यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या.
भक्ती, शक्ती आणि सामाजिक सेवेचा हा अनोखा मेळ पाहून संपूर्ण पालखी सोहळ्यात या चारही मित्रांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, "अशाच समाजसेवेतून खऱ्या अर्थाने विठ्ठल सेवा घडते," अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी दिली.
पारंपरिक रिवाज आणि शिस्तबद्ध नियोजन -
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीचे रिवाज जपत आणि कोणताही विस्कळीतपणा येऊ न देता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालखीचे मार्गक्रमण सुरू आहे.
श्री संत सोपानकाका महाराजांच्या वारीचे हेच नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वरूप दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत असते. यंदाही कडक सुरक्षा आणि स्वयंसेवकांच्या चोख नियोजनात दिंड्यांचे पांगारे येथे शांततेत, भक्तीमय वातावरणात आगमन झाले.
'फूल ना फुलाची पाकळी' सेवाभावी वृत्तीतून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप -
आषाढ महिन्यातील संततधार पाऊस आणि बदलत्या हवामानाचा विचार करून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक सेवाभावी संस्था आणि भक्तांचे कर्तव्य ठरते. याच उदात्त भावनेतून, पालखी सोहळा प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून 'फूल ना फुलाची पाकळी' या भावनेने शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमामध्ये एलआयसी ऑफ इंडियाचे भारतातील प्रसिद्ध अधिकारी, भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणारे सामाजिक संस्था लेंड हॅन्ड या संस्थेचे शिलेदार मिलिंद माने, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक किरण सामल, प्रमोद बाक्रे, संजय सावंत यांनी भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ मदत न करता हे सर्व मित्र स्वतः वारीच्या भक्तीमय वातावरणात दंग झाले.
त्यांनी वारकऱ्यांसोबत सासवड ते पांगारे या पालखी सोहळा मार्गावर टाळ धरत, वारीमध्ये पायी प्रवास केला आणि वारीचा अलौकिक सोहळा अनुभवला.
रेनकोट वाटपासारख्या पवित्र कार्याची आणि वारकरी सेवेची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मित्र परिवाराने श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा -
पांगारे येथील या मुक्कामादरम्यान पालखी सोहळ्यातील सर्व १२६ नोंदणीकृत दिंड्या, त्यांचे प्रमुख, वारकरी भाविक, विणेकरी आणि चोपदार यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
पुणे येथील मित्र परिवाराने सोपानदेवांच्या चरणी लीन होऊन, सर्व वारकऱ्यांना पुढील वारीचा प्रवास सुखाचा, सुखरूप आणि सुरक्षित होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पांगारे येथील ग्रामस्थांच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. सोमवारी पहाटे महापूजा आणि आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचा हा अनोखा सोहळा पंढरीच्या दिशेने विठूनामाचा गजर करत पुढे वाटचाल करत आहे.
‘वारी’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा, देदीप्यमान आणि जिवंत उत्सव आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो वारकऱ्यांनी भक्ती भावाने पायी चालत जाण्याची जी शेकडो वर्षांची परंपरा आहे, त्याला 'वारी' म्हणतात; आणि ही वारी करणाऱ्या लाखो श्रद्धाळू वारकऱ्यांना भक्तीची ही ऊर्जा वर्षभर मिळत असते. हा केवळ एक धार्मिक प्रवास नाही, तर तो समता, बंधुभाव आणि भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा आहे.





































































