Monday, February 16, 2026

"पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेचा राज्यस्तरीय शासकीय चित्रकला परीक्षेत 100% निकाल; एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत "या" अकरा विद्यार्थ्यांना ए ग्रेड विशेष प्राविण्य; सलग 22 वर्षे 100% निकाल व शेकडो कलागुणवत्ताधारक विद्यार्थी; प्रसिद्ध कलाशिक्षक सुनिल सोनवणे यांची अभिमानास्पद कामगिरी".....

धनकवडी,पुणे,दि.१६ : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) २०२५ चा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. पुण्यातील धनकवडी येथील प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेने या परीक्षेत सालाबादाप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करत, प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेचा शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला.

 या दोन्ही परीक्षांसाठी एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"राज्यस्तरीय एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या एकूण २९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी ४ विद्यार्थ्यांनी A ग्रेड मिळवला. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत २१ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त केला. एकूण दोन्ही परीक्षांमध्ये ११ विद्यार्थ्यांनी A ग्रेड मिळवून प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे."

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ (MSBAE), मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शासकीय रेखाकला (Elementary & Intermediate Drawing Grade) परीक्षा आयोजित केली जाते. ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्यांचे मूल्यमापन करते. 

एलिमेंटरी ग्रेड परीक्षा सातवी इयत्तेपासून  आणि इंटरमिजिएट ग्रेड इयत्ता आठवीपासून सुरू होते. २०२५ मध्ये ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सप्टेंबर महिन्यात ऑफलाइन घेतली जाते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या एलिमेंटरी परीक्षेत मेमरी ड्रॉइंग ज्यामध्ये विविध मानवाकृत्यांचा सराव वस्तूचित्र/स्थिरचित्र, विविध वस्तूंची प्रमाणबद्ध रेखाटणे,संकल्पचित्र/डिझाईन,कर्तव्य भूमितीच्या विविध रचनांचा अभ्यास तसेच अक्षरलेखन/लेटरिंग अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास करून, पोस्टर कलर, वॉटर कलर, रंगीत पेन्सिल अशा विविध माध्यमांचा वापर करून चित्र वेळेत पूर्ण करावे लागते एलिमेंटरी व इंटरमिजिएटचे प्रत्येकी चार पेपरची ही परीक्षा चार दिवस चालते.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्व : 

ही परीक्षा केवळ स्पर्धा नव्हे, तर कौशल्य विकासाची संधी! चित्रकला शिकून निरीक्षणशक्ती, एकाग्रता, कल्पनाशक्ती वाढते. सरकारी प्रमाणपत्र मिळते, जे दहावी बोर्ड परीक्षेत A ग्रेडसाठी ७ गुण, B ग्रेडसाठी ५ गुण, C ग्रेडसाठी ३ गुण असे अतिरिक्त गुण (SSC) मिळवून देते. कला महाविद्यालय, डिप्लोमा, BFA, आर्किटेक्चर, फॅशन डिझाइन, अॅनिमेशनसाठी प्रवेशासाठी अनिवार्य/फायदेशीर. मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रदर्शन संधी. भविष्यात करिअरसाठी पोर्टफोलियो मजबूत होते. आजच्या स्पर्धात्मक युगात कला कौशल्ये AI, डिझाइन फील्डमध्ये मागणीचे.

या परीक्षेच्या तयारीत नियमित सराव, तज्ञ कला शिक्षकांचे कोचिंग, पुस्तके  मदत करतात. यशस्वी विद्यार्थी म्हणून अभिमान बाळगण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. चित्रकला ही करिअरची गुरुकिल्ली!.

राज्यस्तरीय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत A ग्रेड मिळवणाऱ्या प्रियदर्शिनी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेयश सरतापे, सार्थक गाढवे, आर्यन महाबोले, जान्हवी गलंडे, सई खाटपे,संस्कृती भालेराव आणि शिवानी शिंगारे यांचा समावेश आहे.


राज्यस्तरीय एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत अभय शिर्के, माहिन शेख, गायत्री गायकवाड आणि रूद्राक्ष सोविलकर यांनी A ग्रेड मिळवला.

शासकीय रेखाकला परीक्षा कलाक्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेचे प्रमाणपत्र असते. 

"प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सातत्याने कला क्षेत्रातील या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. यंदाही १००% निकाल आणि A ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने प्रशालेच्या कलाशिक्षणातील दर्जेदार प्रशिक्षणाचे दर्शन घडवले आहे. पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शिनी विद्या मंदिर प्रशालेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते त्यासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात."

प्रियदर्शिनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका  राजश्री निंगुणे आणि  रूपाली मालुसरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. "विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हा यशस्वी निकाल साध्य झाला आहे. कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची पायरी आहे. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा," असे त्यांनी म्हटले.

या यशस्वी विद्यार्थ्यांच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे  प्रियदर्शिनी प्रशालेचे कलाशिक्षक सुनिल सोनवणे यांचे विशेष कौतुक केले जात आहे. संस्थेचे सचिव, सामाजिक कार्यकर्ते अप्पा रेणुसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, "प्रियदर्शिनी विद्या मंदिर ही केवळ शैक्षणिकच नव्हे तर कलागुणवत्तेचीही उत्तम संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत."

"कलेमुळे व्यक्तिमत्त्व विकसित होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून चित्रकलेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. कलाक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी या परीक्षा कलाक्षेत्राचा पाया समजला जातो. आनंदी जीवन जगण्यासाठी एक तरी कला असणे गरजेचे आहे. शासकीय चित्रकला परीक्षा ग्रेड परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याने देणे आवश्यक आहे . प्रशालेत चित्रकलेची आवड असणारे विद्यार्थी निवडणे व त्यांना परीक्षेसाठी सराव करून, तयार करणे एक आव्हान असते एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही ग्रेड परीक्षेत प्रशालेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी पास होऊन १००% निकाल लागला आहे हा निकाल सलग २२ व्या वर्षी १०० % लागला याचा विशेष आनंद आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजर्षी निंगुणे व सौ रूपाली मालुसरे यांनी बालकलाकारांना व कलेला दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले .परीक्षेसाठी बसलेले सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक जे की सध्या अभ्यासाची स्पर्धा सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांकडे लक्ष देणारे पालक यांचे मन:पासून अभिनंदन करतो. आमच्या प्रियदर्शिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाक्षेत्रातील यशस्वी भरारीसाठी छोटेशे योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे समाधान आहे." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्या मंदिरचे  कलाशिक्षक सुनिल सोनवणे यांनी दिली."

धनकवडी परिसरातील ही प्रियदर्शिनी प्रशाला मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत असून, विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासावर भर देते. रेखाकला परीक्षेतील हा १००% निकाल हा प्रशालेच्या कलाशिक्षणातील यशस्वी परंपरेचा आणखी एक पुरावा आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे हे फलित आहे.

Saturday, February 14, 2026

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर नगरीत लाखो भाविक - भक्तांचा जनसागर, 'सवाई सर्जाचं चांगभलं'च्या गजरात, वर्षभर भक्तीची ओढ लावणाऱ्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक वीर यात्रा सोहळ्याची लाल रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात, पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"

पुरंदर,वीर, दि. १४ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा (रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी,दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक परंपरा जोपासत,गुरुवारी उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 12 दिवस चालणाऱ्या वीरच्या यात्रेची सांगता झाली.

गुरुवारी पारंपारिक मारामारीचा (रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला.  

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. 

छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले.  मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली.

तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी  रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने  वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.

या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी भाविक - भक्तांनी गर्दी केली.

या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजल्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

"महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो."

या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे, जिल्हाधिकारी पुणे,  तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ,भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.

या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून, उत्तम नियोजन केले.

सकाळपासूनच भाविकांची गर्दी व दर्शनाबारी, पार्किंग, मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करणे याबाबत देवस्थान ट्रस्टने पूर्व नियोजन करीत सर्व विश्वस्त मंडळ जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते. 

या सोबतच महसूल विभाग,   पोलीस प्रशासन, कमांडो स्टाफ ( सिक्युरिटी), वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी व पीएमपीएल  बससेवा, विद्यत विभाग, अनिरुद्धा डिझास्टर मेनेजमेंट, होमगार्ड, पोलीसमित्र,हाउसकीपिंग विभाग, गावातील कार्यरत सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट काम करीत आपली सेवा बजावली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा आनंददायी,भक्तीमय वातावरणात पार पडला. यासाठी  वीर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सल्लागार, सालकरी, मानकरी, स्वयंसेवक,वीर ग्रामस्थ, वीर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन या सर्वांचे चांगले सहकार्य लाभले व सर्वांचेच नेहमीच सहकार्य असते" अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव धुमाळ यांनी दिली.

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले. लाखो लोकांना भक्तीच्या माध्यमातून ऊर्जा देणारा चालू वर्षाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याकरिता सहकार्य केलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, तसेच कोडीत, कन्हेरी, वाई, सोनवडी, राजेवाडी, भोंडवेवाडी, कसबा(पुणे), वीर पालखी, सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सल्लागार,सहकारी,ग्रामस्थ,पत्रकार बांधव, तसेच श्रीनाथांच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक, देणगीदार, ज्ञात-अज्ञात सर्वांनीच मोलाचे सहकार्य केल्याने यात्रा निर्विघ्नपणे, मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली याचे आम्हाला खूप समाधान आहे." अशी प्रतिक्रिया वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना भक्ती आणि शक्तीच्या धाग्यात एकत्र बांधणारा ऐतिहासिक वीर यात्रा उत्सव हा अठरा - पगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची सेवा करून, आयुष्य समृद्ध करणारा हा ऐतिहासिक यात्रा उत्सव आहे. वीर यात्रेचा हा आनंदी सोहळा प्रत्येक वर्षी लवकर यावा असे लाखो भाविक - भक्तांना वाटत असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक - भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो.

Monday, February 9, 2026

"माजी मंत्री विजय शिवतारे यांचे वर्चस्व असलेल्या पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात अतितटीच्या लढतीत भाजपचे हरिभाऊ लोळे विजयी; वीर पंचायत समिती गणात अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे प्रवीण जगताप "इतक्या" मतांनी विजयी; वीर पंचायत समिती गणातील "या" प्रमुख गावांमध्ये "या" उमेदवारांना किती मते मिळाली? कुणाचा पराभव नक्की कोणामुळे? वाचा सविस्तर निकाल, विश्लेषण"...


पुरंदर, वीर, दि.९ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वीर-भिवडी जिल्हा परिषद गटात आणि वीर पंचायत समिती गणात मतदारांनी आपला कौल शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना दिला आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या मतमोजणीनंतर, माजी मंत्री, पुरंदर - हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांचे वर्चस्व असलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे हरिभाऊ लोळे अतितटीच्या लढतीत 557 मतांनी विजयी झाले तर वीर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे  प्रविण जगताप अत्यंत चुरशीच्या लढाईत  149 मतांनी विजयी झाले.

पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे एकूण 32,449 मतदान झाले.भाजपचे  उमेदवार हरिभाऊ  लोळे  यांनी  एकूण 11 हजार, 630 मते मिळवून  विजय मिळवला.

पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार समिर जाधव  यांनी 11,073 मते मिळवून भाजपच्या हरिभाऊ लोळे यांना कडवी झुंज दिली. समीर जाधव यांचा केवळ 557 मतांनी पराभव झाला. परिंचे गावचे माजी सरपंच असलेले समीर जाधव हे मागील अनेक वर्षांपासून परिंचे पंचक्रोशीतील गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचलेले आहेत. माजी मंत्री पुरंदर - हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांची ताकद देखील त्यांच्या पाठीशी नेहमीच राहिलेली आहे. 

समीर जाधव यांचा जनसंपर्क, तरुणांचा पाठिंबा, सामाजिक कार्य शिवसेनेचा प्रभावशाली प्रचार असून देखील परिंचे गावातील राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्कराज जाधव यांना मिळालेली  "लक्षणीय मते" व एकच गावातील दोन तुल्यबळ उमेदवारांची मतविभागणी ही भाजपच्या हरिभाऊ लोळे यांच्या विजयास व समीर जाधव यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते. परिंचे गावातील एकच तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असता तर विजय सुकर झाला असता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार  पुष्कराज जाधव  यांना 7,038 मते मिळाली असून त्यांनी या  लढतीत आपली ताकद दाखवून दिली आहे. परिंचे गावातील दोनही तुल्यबळ उमेदवार समीर जाधव व पुष्कराज जाधव यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे हरिभाऊ लोळे यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध नेते हेमंतकुमार माहूरकर यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना यावेळी वीर - भिवडी जिल्हा परिषद  गटातील निवडणुकीत 1876 मते मिळाली. माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हेमंतकुमार माहूरकर यांचा लोकसंपर्क मोठा असताना, एवढी कमी मते मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वीर गावातील काँग्रेसचे उमेदवार नवनाथ माळवे यांना 344 मते मिळाली. कुठली मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला होता.

"पुरंदर तालुक्यात शिवसेना पक्षात अनेक वर्षांपासून काम करणारे हरिभाऊ लोळे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून, वीर - भिवडी जिल्हा परिषदेसाठी भाजपचे तिकीट मिळवून, निवडणुकीत जोरदार प्रचार करून, रंगत आणली होती. माजी आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा, भाजपची प्रचार यंत्रणा व हरिभाऊ लोळे यांचा राजकीय अनुभव, संघटन, सामाजिक कार्य व प्रभावशाली प्रचार यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे."

पुरंदर तालुक्यातील, वीर पंचायत समिती गणातील अत्यंत चुरशीच्या लढतीत  शिवसेनेच्या प्रविण जगताप यांनी भाजपच्या सुधीर आप्पा धुमाळ यांचा अवघ्या 149 मतांनी पराभव केला.

"ऐतिहासिक वीर गाव पुणे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पारंपारिक यात्रेमुळे प्रसिद्ध  आहे. वीर गाव हे पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने व मतदारसंख्येने मोठे असलेले, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव आहे. वीर पंचायत समिती गणाच्या रंगतदार निवडणुकीत वीर गावातील दोन उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना मिळाल्याचा निकालावरून दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्यातील वीर पंचायत समिती गणातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एकूण 15 हजार 860 मतदान झाले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

शिवसेनेचे प्रवीण जगताप यांनी एकूण 5 हजार 940 मतांसह विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम धुमाळ यांना 3 हजार 264 मते मिळाली.

"वीर पंचायत समिती गणातील चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार सुधीरआप्पा  धुमाळ यांनी 5 हजार 791 मते मिळवून, कडवी झुंज दिली. सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे, वीर गावचे सुधीरआप्पा धुमाळ शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. भाजपची प्रभावशाली प्रचार यंत्रणा असताना देखील, वीर पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत वीर गावातीलच दोन उमेदवार उभे असल्याने त्यांच्या मतविभाजनाचा फटका बसल्याने भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना अवघ्या 149 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले."

वीर पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत वीर गावचे काँग्रेसचे उमेदवार महेश धुमाळ यांना 305 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार किशोर  वचकल यांना 369 मते मिळाले. या वीर गावच्या दोन्ही उमेदवारांच्या मतविभाजणाचा फायदा शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना मिळाल्याचा निवडणूक निकालावरून दिसून येते.

वीर पंचायत समिती गणातील प्रमुख गावांमध्ये उमेदवारांना मिळालेले मतदान : 

(मतदान आकडेवारी सौजन्य - निवडणूक आयोग - पुरंदर तालुका प्रशासन)

"वीर पंचायत समिती गणातील सर्वात मोठया असलेल्या वीर गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 1 हजार 788 मते मिळाली तर शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना 910 मते मिळाली. वीर गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना चांगले मतदान मिळाले त्यांनी 878 मतांची आघाडी घेतली. शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना वीर गावात प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीरआप्पा धुमाळ यांच्या एकूण मताच्या 50 टक्के पेक्षा जास्त मतदान मिळाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येते."

"वीर पंचायत समिती गणातील मतदार संख्येने मोठ्या असलेल्या मांडकी गावात शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 1 हजार 642 मते मिळाली तर भाजपचे सुधीर आप्पा धुमाळ यांना अवघी 183 मते मिळाली. मांडकी गावचे मा. पोलीस पाटील असलेल्या प्रवीण जगताप यांना मांडकी गावातील नागरिकांनी प्रचंड मोठे मताधिक्य दिले. मांडकी गावात शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 1 हजार 459 मतांची आघाडी मिळाली. मांडकीकरांनी दिलेली 1 हजार 459 मतांची आघाडी शिवसेनेच्या प्रवीण जगताप यांच्या विजयात खूप महत्त्वपूर्ण ठरली. मांडकी गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण जगताप यांच्या एकूण मतदानाच्या 30 टक्केही मतदान मिळाले नाही. हे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे."

वीर पंचायत समिती गणातील राजकीय दृष्टया महत्त्वपूर्ण असणाऱ्या परिंचे गावात शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना 886 मते मिळाली तर भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 928 मते मिळाली. परिंचे गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 42 मतांची आघाडी मिळाली.

वीर पंचायत समिती गणातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या जेऊर गावात शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना 449 मते मिळाली तर भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 242 मते मिळाली तर जेऊर गावचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम धुमाळ यांना जेऊर गावातून 861 मते मिळाली.

भिवडी पंचायत समिती गणात भाजपच्या सायली शिंदे एकूण 6 हजार 791 मते मिळवुन विजयी झाल्या. भाजपचे विजयी उमेदवार सायली शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवार पूजा मोकाशी यांचा 871 मतांनी पराभव केला.

शिवसेनेच्या उमेदवार पूजा मोकाशी यांनी 5 हजार 920 मते मिळवत चांगली लढत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुजा पोमण यांना 3 हजार 611 मते मिळाली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"पुरंदर तालुक्यात झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेल्याचे आम्हाला समाधान आहे. तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा विजय हा कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे मा. आमदार संजय जगताप यांनी दिली.

"लोकनेते अजितदादा पवार यांचे पुणे जिल्हा परिषद ही प्रचंड बहुमताने जिंकण्याचे स्वप्न होते ते सर्व मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे बहुमत देऊन,पूर्ण केले आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादा पवार यांचे महान कार्य तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नामुळे पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खूप चांगले यश मिळाले. पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू." अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक तुल्यबळ उमेदवारामुळे चुरशीची ठरली. भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत समीर जाधव यांचा अवघ्या 557 मतांनी पराभव करून अनपेक्षित विजय मिळवला. राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव यांनी जोरदार प्रचार केला, मात्र अपक्ष उमेदवार बबूसाहेब माहुरकर यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका त्यांना बसला. शिवसेनेच्या प्रविण जगताप यांनी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना एकत्र घेत, नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांचा लोकसंग्रह मोठा होता, मात्र वीर गावातील दोन उमेदवार रिंगणात असल्याने झालेल्या मतविभाजनामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चुरशीच्या लढतीत लोकांचा कौल महत्त्वाचा ठरतो" अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध तालुका आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुरंदर तालुक्यातील जनतेने पुरंदर तालुका पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा जनादेश देऊन, चार जागांवरती विजय मिळवून दिला. पुरंदर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले तर दोन जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला यश मिळाले. शिवसेनेला पंचायत समितीच्या दोन जागांवर यश मिळाले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटामध्ये अतितटीच्या लढाईत भाजपचे हरिभाऊ लोळे 557 मतांनी विजयी झाले. परिंचे गावातील दोन तुल्यबळ उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे उमेदवार हरीभाऊ लोळे यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते. वीर पंचायत समिती गणात शिवसेनेचे प्रवीण जगताप अत्यंत चुरशीच्या लढतीत 149 मतांनी विजयी झाले. वीर गावातील दोन उमेदवारांच्या मतविभाजणाचा फायदा शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते. गावचा एकच उमेदवार असता तर वीर व परिंचे गावातील तुल्यबळ उमेदवार निवडून आले असते. पुरंदर तालुक्यातील निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान द्यावे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे  संपादक अजित जगताप यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 51 जागा जिंकून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केलेले आहे.

पुरंदर तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या, अत्यंत चुरशीची लढत असलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात व वीर पंचायत समिती गणात जनतेने भाजप व शिवसेनेला कौल दिलेला आहे. सर्व विजयी उमेदवारांनी वीर - भिवडी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.