Wednesday, July 15, 2026

"श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात भक्ती,शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम; भारतातील 16 हजारांहुन अधिक शाळा व वीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' संस्थेचे शिलेदार मिलिंद माने मित्र परिवारातर्फे श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांना रेनकोट वाटप करून, सामाजिक वसा जपण्याचा "या" चार जिवलग मित्रांचा अनोखा सामाजिक उपक्रम"

सासवड, दि.15 : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सासवड येथून श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान करून, श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा  रविवारी १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यातील, पांगारे येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

"टाळ-मृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "श्री संत सोपानदेव महाराज की जय" या जयघोषाने अवघा पुरंदर तालुका व पांगारे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.या पालखी सोहळ्याचे नेटके, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारे विविध सामाजिक उपक्रम हे या वर्षीच्या वारीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत."

"पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या चार मित्रांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन या वारीत पहायला मिळाले. सेवा, भक्ती, शक्ती, आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या श्री संत सोपानकाका महाराज पालखी  सोहळ्यात पाहायला मिळाला. महाराष्ट्राची महान परंपरा असलेल्या या वारीच्या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या भक्ती आणि शक्तीच्या ऊर्जेची अनुभूती प्रत्येक भाविक - भक्ताला आल्याशिवाय राहत नाही""

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात विठूनामाचा गजर घुमत असून, महाराष्ट्रातील महान संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या भक्तीच्या महासागरात केवळ विठ्ठलनामाचा गजरच नाही, तर सेवेचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये अशाच एका निस्सीम सेवाभावाची प्रचिती आली, जेव्हा समाजातील चार यशस्वी मित्रांनी एकत्र येत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी हक्काची सावली निर्माण केली.

भारतात शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य करणाऱ्या आणि देशातील १६ हजारांहून अधिक शाळांमधील तब्बल २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' (Lend-A-Hand India) या नामांकित संस्थेचे शिलेदार मिलिंद माने आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.

या पालखी सोहळ्यात लेंड अ हँड इंडिया या सामाजिक संस्थेचे शिलेदार मिलिंद माने व यांच्या मित्र परिवाराने श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे.

"पावसाची संततधार आणि वाढती थंडी लक्षात घेऊन, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांच्यासह पुण्याच्या उद्योग जगतातील प्रसिद्ध नाव आणि 'ओव्हन फ्रेश'चे मालक प्रमोद बाक्रे, अग्रगण्य इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर किरण सामल आणि जिम साहित्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योजक संजय सावंत या चार मित्रांनी श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात सेवाभावी वृत्तीतून शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप केले."

आपला व्यवसाय आणि दैनंदिन व्यस्ततेमधून वेळ काढत, वारीतील शेवटच्या घटकाची काळजी घेण्याच्या उद्देशाने या चार मित्रांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. 

वारीदरम्यान कोसळणाऱ्या पावसातही वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास अविरत सुरू राहावा, त्यांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे रेनकोट जणू माऊलींची मायेची शाल ठरले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. या वारीत विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या या वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर चालत असताना भक्ती आणि अध्यात्मिक ऊर्जेची आम्हाला अनुभूती मिळाली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान,आनंद आणि या महान पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे," अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.

भक्ती, शक्ती आणि सामाजिक सेवेचा हा अनोखा मेळ पाहून संपूर्ण पालखी सोहळ्यात या चारही मित्रांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, "अशाच समाजसेवेतून खऱ्या अर्थाने विठ्ठल सेवा घडते," अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी दिली.

पारंपरिक रिवाज आणि शिस्तबद्ध नियोजन -

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख  त्रिगुण महाराज गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीचे रिवाज जपत आणि कोणताही विस्कळीतपणा येऊ न देता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालखीचे मार्गक्रमण सुरू आहे.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या वारीचे हेच नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वरूप दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत असते. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यंदाही श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याला कडक सुरक्षा आणि स्वयंसेवकांच्या चोख नियोजनात दिंड्यांचे पांगारे येथे शांततेत, भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

'फूल ना फुलाची पाकळी' सेवाभावी वृत्तीतून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप - 

आषाढ महिन्यातील संततधार पाऊस आणि बदलत्या हवामानाचा विचार करून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक सेवाभावी संस्था आणि भक्तांचे कर्तव्य ठरते. याच उदात्त भावनेतून, पालखी सोहळा प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून 'फूल ना फुलाची पाकळी' या भावनेने शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमामध्ये एलआयसी ऑफ इंडियाचे भारतातील प्रसिद्ध अधिकारी, भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणारी सामाजिक संस्था "लेंड अ हॅन्ड इंडिया" या संस्थेचे शिलेदार मिलिंद माने, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक किरण सामल, प्रमोद बाक्रे, संजय सावंत यांनी भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ मदत न करता हे सर्व मित्र स्वतः वारीच्या भक्तीमय वातावरणात दंग झाले. 

त्यांनी वारकऱ्यांसोबत सासवड ते पांगारे या पालखी सोहळा मार्गावर टाळ धरत, वारीमध्ये पायी प्रवास केला आणि वारीचा अलौकिक सोहळा अनुभवला. 

रेनकोट वाटपासारख्या पवित्र कार्याची आणि वारकरी सेवेची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मित्र परिवाराने  श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पांगारे येथील या मुक्कामादरम्यान पालखी सोहळ्यातील सर्व १२६ नोंदणीकृत दिंड्या, त्यांचे प्रमुख, वारकरी भाविक, विणेकरी आणि चोपदार यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.

पुणे येथील मित्र परिवाराने सोपानदेवांच्या चरणी लीन होऊन, सर्व वारकऱ्यांना पुढील वारीचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि सुरक्षित होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पांगारे येथील ग्रामस्थांच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला वर्गाने श्री संत सोपानकाका महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. सोमवारी पहाटे महापूजा आणि आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचा हा अनोखा सोहळा पंढरीच्या दिशेने विठूनामाचा गजर करत पुढे वाटचाल करत आहे.

‘वारी’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा, देदीप्यमान आणि जिवंत उत्सव आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो वारकऱ्यांनी भक्ती भावाने पायी चालत जाण्याची जी शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी ही 'वारी' लाखो वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करते.

वारी करणाऱ्या लाखो श्रद्धाळू वारकऱ्यांना भक्तीची ही ऊर्जा वर्षभर मिळत असते. ​हा केवळ एक धार्मिक प्रवास नाही, तर तो समता, बंधुभाव आणि भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा आहे.

"अद्वैत माईंड - वेल्थ अकॅडमीचे पुणे शहरात लोकप्रिय नगरसेवक दिलीप वेडे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन; समग्र मानवी विकासासाठी ध्यान, संस्कार व आधुनिक विज्ञानाची मेळ; शालेय विद्यार्थ्यांसाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी "सुपर सेन्सर डेव्हलपमेंट उपक्रम" उपयुक्त; लोक काय म्हणतील? यापेक्षा 'परमात्मा' काय म्हणेल हा विचार महत्त्वाचा".....



पुणे,दि.15 : "होलिस्टिक माइंड एम्पॉवरमेंट अर्थात समग्र मानवी विकास" ही सकारात्मक संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अद्वैत माईंड वेल्थ अकॅडमीच्या नवीन बावधन शाखेचे भव्य आणि दिमाखदार उद्घाटन नुकतेच (दि. १२ जुलै २०२६) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. 



विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांच्या मानसिक, बौद्धिक, आर्थिक तसेच आध्यात्मिक विकासासाठी ही संस्था वैज्ञानिक व अनुभवाधारित प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे.




या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात  ज्योती मेहता यांच्या 'णमोकार मंत्र' पठणाने झाली. यामुळे संपूर्ण सभागृहात एक अत्यंत सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा निर्माण झाली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

मान्यवरांची मांदियाळी अन् भरभरून शुभेच्छा :
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक  दिलीप अण्णा वेडे पाटील उपस्थित होते. त्यांच्या सोबतच समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या खास कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. विद्या डागा, डॉ. प्रवीण कासार,  संदीप श्रीधर काळभोर, मनोज खंदारे,  सिताराम कडू पाटील,  रोहन कडू पाटील,  दिनेश भागीनकर, ॲड. संपत फड, गणेश शांताराम काटकर, शंकर शांताराम काटकर,  उल्हास खुटवड,  दिलीप काटकर,  अरुण खैरनार, वरिष्ठ पत्रकार  अजित जगताप, प्राचार्या जानवी आजोटीकर, धन्यकुमार कस्तुरे, विजयकुमार लुंगाडे, विनोद काटकर यांचा समावेश होता. 

अद्वैत माईंड -वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या आधारस्तंभ, प्रेरणास्थान व मार्गदर्शक  इंदुमती रणदिवे, इंदुबाई काटकर आणि  विजया कस्तुरे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अकॅडमीच्या दोन शाखांविषयी माहिती :
अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमीच्या सध्या पुण्यात दोन प्रमुख शाखा कार्यरत आहेत :
 1. सदाशिव पेठ शाखा: सोबा टॉवर, A-102, सदाशिव पेठ, पुणे.
 2. बावधन शाखा (नवीन): ट्रायडेंट प्लाझा, युनियन बँकेसमोर, पहिला मजला, बावधन, पुणे.

अनुभवी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी कार्य : 
अद्वैत माईंड - वेल्थ अकॅडमीचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक, कल्याणमित्र,  भगवान (आशिष) शांताराम काटकर हे गेल्या १२ वर्षांपासून मानसिक, आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत १०,००० हून अधिक विद्यार्थी व व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक विज्ञान, ध्यान, ऊर्जा संतुलन आणि जीवन व्यवस्थापन यांचा सुंदर समन्वय साधणारे उपक्रम राबविले जात आहेत.

अद्वैत माईंड -वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या कार्यात सुषमा अविनाश रणदिवे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. तर  अविनाश अशोक रणदिवे हे संस्थेच्या आर्थिक नियोजन, व्यवस्थापन व विकास धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अविनाश रणदिवे यांना आरोग्य विमा व आर्थिक नियोजन क्षेत्रातील १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी महाराष्ट्रातील १०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना आरोग्य विमा, आर्थिक नियोजन, संपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरतेचे धडे दिले आहेत.

प्रमुख वक्त्यांचे विचार आणि मार्गदर्शन :
 मा. नगरसेवक  दिलीप अण्णा वेडे पाटील :
    "मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लहानपणापासूनच त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे, ध्यान धारणा शिकवणे आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा अकॅडमी प्रत्येक परिसरात सुरू व्हायला हव्या," असे प्रतिपादन करत त्यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
   
  अविनाश रणदिवे :
    "‘लोक काय म्हणतील?’ यापेक्षा ‘परमात्मा काय म्हणेल?’ हा विचार मानवी आयुष्यात अधिक महत्त्वाचा आहे. समाजाचे आपल्यावर काही ऋण असते आणि ते फेडण्याच्या भावनेतूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अद्वैत माईंड - वेल्थ ॲकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविले जातात. मुलांमध्ये लहानपणापासून उत्तम संस्कार, ध्यान, जीवनमूल्ये, सकारात्मक विचार रुजवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रितपणे कार्य केले पाहिजे"
   
 कल्याणमित्र श्री. भगवान (आशिष) काटकर :
   "आपली संतती ही केवळ आपल्या कुटुंबाची नसून राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. त्यामुळे देश हिताचा विचार करून मुलांना लहानपणापासूनच उत्तम संस्कार, ध्यान, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सकारात्मक जीवनदृष्टी देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. वयाच्या पहिल्या १५ वर्षांत मिळणारे योग्य मार्गदर्शन मुलांचे व्यक्तिमत्त्व सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडवते. आजच्या डिजिटल युगात शाळा-महाविद्यालयांत जीवनमूल्य, ध्यान, व्यक्तिमत्व विकास व मूल्याधिष्ठित शिक्षणाला मर्यादित स्थान असल्याने ती उणीव भरून काढण्यासाठी अद्वैत माईंड अँड वेल्थ ॲकॅडमी काम करत आहे. सुसंस्कृत कुटुंब, सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्र घडविणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे."
   
विशेष प्रात्यक्षिके आणि अभ्यासक्रम (Courses Offered)
उद्घाटनानंतर उपस्थितांना राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशनचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. या विषयावर देश-विदेशात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती देण्यात आली, ज्यावर उपस्थितांनी स्वतःचे सकारात्मक अनुभव मांडले.

अकॅडमीमार्फत चालवले जाणारे प्रमुख कार्यक्रम : 
 1)सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्राम (मिडब्रेन ऍक्टिवेशन)

 2)राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशन

 3)ऑरा स्कॅनिंग अँड द १० डिमेन्शन्स ऑफ रियालिटी

 4)वेल्थ मॅनेजमेंट अँड सुपर रिच मास्टरी प्रोग्राम

नियमित बॅचेसचे नियोजन आणि प्रवेश माहिती :
बावधन शाखेत दर रविवारी राजयोग अग्निहोत्र हिलिंग मेडिटेशनच्या नियमित बॅचेस आयोजित केल्या जाणार आहेत.

सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामची वेळ :
 1)बावधन शाखा : दर शनिवारी (सकाळी १० ते १) आणि दर रविवारी (सकाळी ११ ते दुपारी २)सदाशिव पेठ शाखा : दर रविवारी (सायंकाळी ४ ते ७).

(टीप: गुणवत्तेवर भर देण्यासाठी प्रत्येक बॅचमध्ये केवळ २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.)

उत्कृष्ट नियोजन अन् आभार प्रदर्शन :
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन  प्रीतम मेहता यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले. राजयोग अग्निहोत्र सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणिक हीलर  किरण भगवान काटकर आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी शुद्ध जैन सात्त्विक भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

अकॅडमीच्या या सामाजिक उपक्रमाचे बावधन आणि पुणे परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक व व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



Sunday, June 21, 2026

"आईची प्रेरणा,वडिलांचे मार्गदर्शन; पुणे शहरातील पाणीपुरवठा विभागातील शिलेदार उदय जाधव यांची कन्या सई जाधव या गुणवंत विद्यार्थिनीचे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश; पुण्यातील लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर, लोकप्रिय नगरसेवकांची कौतुकाची थाप; जिद्द, चिकाटी,मेहनत व उत्तुंग यश; प्रशासकीय अधिकारी बनण्याचे सईचे स्वप्न".....

पुणे,दि.21 : जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर पुण्याच्या सहकारनगर येथील 'मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल'ची विद्यार्थिनी कु. सई उदय जाधव हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून ९५% गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. केवळ पाठांतरावर भर न देता संकल्पना समजून घेऊन, आत्मसात करण्याच्या तिच्या अनोख्या अभ्यासाच्या पद्धतीमुळे सईने हे मोठे यश खेचून आणले आहे. 

"सई जाधव हिच्या यशामुळे जाधव कुटुंब, मुक्तांगण शाळा आणि संपूर्ण धनकवडी परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सईच्या या यशामागे पुणे महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात प्रामाणिक सेवा देणारे तिचे वडील उदय जाधव आणि आदर्श शिक्षिका असलेल्या सईच्या आई मनीषा जाधव यांची प्रेरणा, मार्गदर्शन व संस्कार कारणीभूत असल्याचे पाहायला मिळत आहे."

"पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर व धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षा तापकीर यांनी सई जाधव हिच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल सत्कार करून, कौतुकाची थाप दिली आहे. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दिलेली कौतुकाची थाप नेहमीच मुलांना प्रेरणा देणारी असते" 

"पुणे शहरातील धनकवडी प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक किशोर धनकवडे यांनी सई जाधव या गुणवंत विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्याबद्दल  कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिलेली कौतुकाची थाप ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या भावी कारकीर्दीसाठी बळ देणारी असते. पुण्यातील प्रसिद्ध वर्धमान सोसायटीचे सभासद बापूसाहेब शिरोळे व सूर्यवंशी सर यांनी देखील सई जाधवच्या उत्तुंग याबद्दल कौतुक केले."

"शालेय जीवनामध्ये विद्यार्थी मेहनत घेत असतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यश मिळवल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दिलेली कौतुकाचे थाप नेहमीच त्यांना भावी यशस्वी कारकीर्दीसाठी प्रेरणा देत असते. पुणे शहरातील बालाजीनगर - कात्रज- आंबेगाव प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका प्रतिभा चोरघे व शेतकरी युवा संघ अध्यक्ष, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रोहिदास बापू चोरघे यांनी सई जाधवला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्याबद्दल सन्मान करून, कौतुक केले. पुणे शहरातील धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका तेजश्री बदक व सामाजिक कार्यकर्ते सचिन बदक यांनी सई जाधव हिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील उत्तुंग यश मिळाल्याबद्दल सन्मान करून, कौतुक केले."

जुनियर के.जी. ते दहावीपर्यंतचा प्रवास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन :

सईने तिचे जुनियर के.जी. पासून ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शालेय शिक्षण सहकारनगरमधील नामांकित 'मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल'मधून पूर्ण केले आहे. 

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे शहरात संपूर्ण देशभरातून, जगभरातून विद्यार्थी  शिक्षणासाठी येत असतात. पुणे शहरात चांगले शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उत्तमरीत्या कार्यरत असल्यामुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

शालेय जीवनाच्या सुरुवातीपासूनच सई जाधव एक अत्यंत हुशार आणि आज्ञाधारक विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात आहे. शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या शालेय उपक्रमांमध्ये व विविध स्पर्धांमध्ये सहभागी घेऊन, सईने चांगले यश मिळवलेले आहे.

तिच्या या यशाबद्दल बोलताना सईने सांगितले की, "माझ्या या यशाचे श्रेय माझे आई, वडील व मार्गदर्शक, माझ्या शाळेतील अनुभवी आणि गुणी शिक्षकांना जाते. त्यांनी प्रत्येक विषयात मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आणि माझा आत्मविश्वास वाढवला."

घोकंपट्टीला फाटा; संकल्पना समजून घेऊन आत्मसात करण्यावरती दिला भर : 

आजकाल अनेक विद्यार्थी केवळ गुण मिळवण्यासाठी पाठांतर किंवा घोकंपट्टी  करण्यावर भर देतात. मात्र, सईने या पारंपारिक आणि तात्पुरत्या पद्धतीला पूर्णपणे फाटा दिला. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

सई जाधव हिने पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक विषयातील मूलभूत संकल्पना  समजून घेऊन, आत्मसात करून, अगदी स्पष्ट ठेवण्यावर भर दिला. अभ्यासातील याच सातत्यामुळे आणि विषयाचे सखोल ज्ञान घेतल्यामुळे तिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५% इतके गुण मिळून, हे मोठे यश मिळवणे सहज शक्य झाले. पुणे शहरातील धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षा तापकीर यांनी सई जाधव हिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल  कौतुकाची थाप दिलेली आहे.

कर्तव्यदक्ष पिता आणि 'आदर्श पुरस्कार' विजेत्या शिक्षिका मातेचे संस्कार : 

"सई जाधवच्या घरची पार्श्वभूमी ही सुशिक्षित आणि समाजसेवेची आहे. तिचे वडील  उदय जाधव हे पुणे महानगरपालिकेच्या  पाणीपुरवठा विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी तसेच जनसामान्यांना पाणी मिळावे म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे शिलेदार  म्हणून परिचित आहेत. पुणे शहरातील लोकांना वेळेवर पाणी मिळावे म्हणून चांगली सेवा देऊन, कार्यरत आहेत. पुणेकरांना नियमित आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ते अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा देतात. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा आणि कष्टाचा मोठा प्रभाव सईवर आहे.

"दुसरीकडे, सईची आई मनीषा जाधव या पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीची आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना 'आदर्श शिक्षिका' पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. घरातच आईच्या रूपाने 'आदर्श शिक्षिका' आणि वडिलांच्या रूपाने 'कर्तव्यदक्ष सेवक' लाभल्यामुळे सईला अभ्यासाचे आणि कष्टाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले."

एकत्र कुटुंबाचे पाठबळ :

आजच्या विभक्त कुटुंबाच्या काळात सईला तिच्या आजी-आजोबांच्या छत्राखाली वाढण्याचे भाग्य लाभले. सईच्या या यशात तिचे आजोबा,आजी, आई-वडील,चुलते आणि तिचा लहान भाऊ या सर्वांचा खूप मोठा पाठींबा आहे.

परीक्षेच्या काळात संपूर्ण कुटुंबाने घरात अभ्यासाचे अत्यंत प्रसन्न वातावरण तयार केले होते. तिच्या प्रत्येक अभ्यासासाठी आवश्यक गोष्टीची काळजी कुटुंबाने घेतली, ज्यामुळे सई कोणत्याही तणावाशिवाय परीक्षेला सामोरी जाऊ शकली.

भविष्यातील ध्येय : 'इंजिनिअरिंग' आणि 'प्रशासकीय सेवेतून देशाची सेवा'

सई जाधव केवळ दहावीच्या यशावर थांबणारी नाही, तर तिने भविष्यातील ध्येय आत्तापासूनच निश्चित केले आहे. तिला इंजिनिअरिंग सीईटी (Engineering CET) परीक्षेची अत्यंत जोमाने तयारी करायची आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिला प्रशासकीय सेवांमध्ये (Administrative Services - UPSC/MPSC) प्रवेश करायचा आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी बनून देशाची आणि समाजाची प्रामाणिक सेवा करणे, हेच तिचे अंतिम ध्येय आहे.

आई-वडिलांप्रमाणेच शासकीय व्यवस्थेत राहून देशसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा सईचा मानस आहे. कुटुंबातील सुशिक्षित व समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा तिचा मानस आहे.

"सई उदय जाधव हिने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, कष्टकरी आणि प्रामाणिक पालकांच्या संस्कारांचा हा विजय आहे. सईच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून,धनकवडी परिसरातून, पुणे शहरातून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

"पुणे शहरात पाणीपुरवठा विभागात लोकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्यरत असतो. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना, कुटुंबातील आमच्या कन्येचे यश निश्चितच प्रेरणा देऊन जाते. सईने प्रामाणिकपणे केलेला अभ्यास, जिद्द, चिकाटी यामुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. पुणे शहरातील लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर साहेब व धनकवडी प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका वर्षाताई तापकीर यांनी  सईचा सत्कार करून तिच्या यशस्वी वाटचालीबद्दल दिलेली कौतुकाची थाप तिला प्रेरणा देणारी आहे." अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा विभागाचे शिलेदार,सईचे वडील उदय जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"कुठल्याही पालकाला आपल्या मुलांचे यश हे नेहमीच आनंद देत असते. सई पहिल्यापासूनच अभ्यासू विद्यार्थिनी असल्यामुळे, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा मनापासून केलेला अभ्यास, प्रचंड मेहनत, शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन व योग्य दिशेने केलेले प्रयत्न यामुळे तिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. तिचे भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी तिला मनापासून शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया सई जाधवच्या आई, आदर्श शिक्षिका मनीषा जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"मला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या यशात माझे आई-वडील व शिक्षक यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. माझ्या आयुष्यात माझ्या आईची प्रेरणा व वडिलांचे मार्गदर्शन नेहमीच ऊर्जा देणारे आहे. भविष्यात अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, स्पर्धा परीक्षा देऊन, प्रशासकीय अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे." अशी प्रतिक्रिया सई जाधव हिने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

आजच्या काळातील मुले माध्यमिक शिक्षण घेत असताना व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन, चांगले यश मिळवत असतात. पालकांचे, शिक्षकांचे व समाजाचे मार्गदर्शन व पाठिंबा असेल तर हीच मुले उद्याच्या विकसित भारताचे स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकतात.