Thursday, July 30, 2026

"25 किलोमीटर चालत जाऊन हिऱ्याच्या कारखान्यात मजुरी करणाऱ्या कामगाराच्या मुलाची यशस्वी भरारी; परिस्थितीसमोर न झुकलेला अभिजीत; वडिलांचे स्वप्न पूर्ण करून, मराठी माध्यमात शिकून वकील बनलेला अभिजीत या "सामाजिक ध्येयासाठी" कार्यरत राहणार"



पुणे,दि.30 : परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत व संयम आणि सातत्य असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो,” याचाच एक जिवंत आणि प्रेरणादायी वस्तुपाठ पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या निकालातून समोर आला आहे. आयुष्यात अनेक मोठी संकटे,अडचणी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ३२ वर्षीय  अभिजीत अशोक मोरे यांनी सामाजिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून, २०२६ मध्ये पुणे विद्यापीठातून प्रचंड मेहनतीने उत्तम गुण मिळवून, आपली LL.B (कायद्याची पदवी) पूर्ण केली असून, वकील म्हणून अधिकृतपणे पदवी संपादन केली आहे. 



अपयशाने खचून न जाता ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर यशाचे शिखर कसे सर करता येते, याचे अभिजीत मोरे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहेत.



ध्येयाची सुरुवात आणि स्पर्धा परीक्षांचा टप्पा :

समाजासाठी काहीतरी भरीव करण्याची आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची तीव्र इच्छा अभिजीत यांच्या मनात बालपणापासूनच होती. समाजसेवेचे हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीला स्पर्धा परीक्षांच्या (MPSC/UPSC) माध्यमातून प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाजसेवेचे ध्येय पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला होता. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. स्पर्धा परीक्षांमधील त्यांचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी होऊ शकले नाहीत. स्पर्धा परीक्षेत आलेले हे अपयश कोणत्याही तरुणाला खचवून टाकणारे ठरले असते, परंतु अभिजीत यांनी हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता त्यांनी समाजसेवेचा एक नवा आणि तितकाच प्रभावी मार्ग निवडण्याचे ठरवले, तो मार्ग म्हणजे 'कायदा आणि न्याय व्यवस्था'.


बालपण आणि वडिलांचा सायकलवरून सुरू असलेला संघर्ष :

अभिजीत मोरे यांचा हा प्रवास अत्यंत साध्या, गरिबीच्या आणि संघर्षमय परिस्थितीतून सुरू झाला. त्यांचे मूळ कुटुंब अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीत जगत होते. त्यांचे वडील अशोक मोरे हे हिऱ्याच्या कारखान्यात एक साधे मजूर म्हणून काम करत असत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर अपार कष्ट उपसले. हिऱ्याच्या कारखान्यात कामाला जाण्यासाठी ते दररोज तब्बल २० ते २५ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत असत. ऊन असो, पाऊस असो की थंडी, कोणत्याही ऋतूत न थकता वडिलांनी केलेले हे कष्ट आणि त्यांचा प्रामाणिकपणा हाच अभिजीत यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आदर्श आणि प्रेरणास्थान ठरला. वडिलांच्या या संघर्षाची जाणीव ठेवूनच अभिजीत यांनी शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही.


आर्थिक चणचण, मुंबई ते पुणे प्रवास आणि कोचिंग क्लासेसचा आधार :

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत अभिजीत यांनी मुंबईतील एका मराठी शाळेत आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर, स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी पुण्यात येऊन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये एका शिष्यवृत्तीच्या (Scholarship) मदतीने त्यांनी पुण्याची वाट धरली.


पुण्यात आल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या नामांकित क्लासेसची भरमसाठ फी भरणे त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या पलिकडचे होते. यामुळे त्यांनी कोणत्याही क्लासवर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीवर आणि 'सेल्फ स्टडी' (Self-study) च्या जोरावर अभ्यास करण्याचा धाडसी निर्णय घेतला.


 पुण्यासारख्या शहरात राहण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च आणि दैनंदिन राहणीमान सांभाळणे हे एक मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी त्यांनी लहान मुलांचे कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी) घेण्यास सुरुवात केली. दिवसभर स्वतः अभ्यास करणे आणि संध्याकाळी क्लासेस घेऊन स्वतःचा खर्च भागवणे, असा त्यांचा दुहेरी संघर्ष पुण्यात सुरू राहिला.


कौटुंबिक संकटांची मालिका आणि भावाचा खंबीर पाठिंबा :

अभिजीत यांच्या संघर्षाचा काळ एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. २०१७ मध्ये त्यांचे वडील अशोक मोरे यांना अचानक अर्धांगवायूचा (Paralysis) तीव्र झटका आला. वडिलांच्या या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंब हादरले. अशा अत्यंत संवेदनशील काळात स्वतःच्या करिअरची आणि स्वप्नांची पर्वा न करता, अभिजीत यांनी अभ्यासाला काही काळ बाजूला ठेवले आणि वडिलांची अहोरात्र सेवा केली.


वडिलांची प्रकृती हळूहळू सुधारत असतानाच, २०१९ मध्ये त्यांच्या मातोश्रींचे अचानक निधन झाले. आईच्या जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक विवंचना आणि आईचे छत्र हरपल्यामुळे कुटुंब पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर होते. अशा अत्यंत कठीण आणि आणीबाणीच्या काळात अभिजीत यांचे लहान भाऊ आशिष अशोक मोरे हे कुटुंबासाठी ढाल बनून उभे राहिले. आशिष यांनी घराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि अभिजीत यांना त्यांच्या ध्येयापासून मागे न हटण्याचा सल्ला दिला. भावाच्या या खंबीर आधारामुळेच अभिजीत पुन्हा एकदा उभे राहू शकले.


कायद्याचा मार्ग आणि वकिली पदवीवर मोहर :

स्पर्धा परीक्षांमध्ये यश हुकले असले तरी, समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करण्याची अभिजीत यांची भावना तसूभरही कमी झाली नव्हती. प्रशासकीय सेवेत जाता आले नाही तर काय झाले, कायद्याच्या चौकटीत राहूनही सामान्य माणसाला, गरीबांना न्याय मिळवून देता येऊ शकतो, या विचाराने त्यांनी विधी शाखेत (Law) प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठातून त्यांनी LL.B चा अभ्यासक्रम सुरू केला.

हा प्रवासही सोपा नव्हता.


 कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ओढाताण आणि अभ्यासाचा ताण या सर्वांचा ताळमेळ घालत त्यांनी दिवस-रात्र एक केली. सातत्य, कठोर परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अखेर २०२६ मध्ये पुणे विद्यापीठातून विधी पदवी (LL.B) यशस्वीरित्या प्राप्त केली आणि आपले वकील बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.


कुटुंबियांची साथ आणि यशाचे श्रेय :

अभिजीत यांच्या या संपूर्ण संघर्षमय आणि खडतर प्रवासात त्यांच्या कुटुंबियांची साथ अत्यंत मोलाची ठरली आहे. त्यांचे भाऊ राहुल मोरे, लहान भाऊ आशिष मोरे आणि त्यांच्या मोठ्या चुलती यांनी प्रत्येक चढ-उताराच्या टप्प्यावर अभिजीत यांना मानसिक आणि भावनिक प्रोत्साहन दिले. कुटुंब पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, अशा भावना अभिजीत यांनी व्यक्त केल्या. 


आज अभिजीत मोरे यांचा हा प्रवास केवळ एका पदवीपुरता मर्यादित नसून, प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता आपल्या स्वप्नांसाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक मोठी प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.


"अभिजीत मोरे यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. अथक प्रयत्न, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी संघर्षातून यश मिळवले आहे. त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, पण परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी वकिलीची पदवी मिळवली, ही खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. अभिजीत मोरे हे फक्त स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी, तरुणाईसाठी एक आदर्श आहेत.त्यांची मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक विचारसरणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. अशी प्रतिक्रिया पुण्यातील प्रसिद्ध विधीज्ञ अ‍ॅड. सोनाली काळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



“लहानपणापासूनच अभिजीत मेहनती आणि जिद्दीने काम करणार आहे. परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेले स्वप्न अभिजीतने प्रचंड कष्टाने पूर्ण केले.अभिजीत लहानपणापासूनच खूप मेहनती आणि जिद्दी स्वभावाचा आहे. परिस्थितीमुळे त्याला उच्च शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, याची खंत मनात होती. मात्र त्याने कधीही हार मानली नाही. आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर आज त्याने ते अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. घरात आई नसतानाही मुलांनी परिस्थितीची जाणीव ठेवत सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडल्या. अडचणीच्या काळात एकमेकांना साथ देत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. आज अभिजीतने मिळवलेले यश पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आज त्यांची आई असती तर तिचे मन आनंदाने भरून आले असते.”

“अभिजीतचा संघर्ष, सातत्य आणि ध्येयासाठीची तळमळ हीच त्याची खरी ओळख आहे. त्याने स्वतःच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत समाजासाठी काहीतरी करण्याचा मार्ग निवडला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” अभिजीतचा  प्रवास हा जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याचे प्रेरणादायी उदाहरण असल्याची प्रतिक्रिया अभिजीतचे वडिल अशोक मोरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली. 


"समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून संघर्षाच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या अभिजीत मोरे यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि ध्येयासाठी केलेल्या प्रयत्नांचा जवळून अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे.

 “अभिजीत सरांचा प्रवास हा फक्त यश मिळवण्याचा प्रवास नाही, तर संघर्ष, सातत्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या विचारांचा प्रवास आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून विचलित न होता पुढे जाण्याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली.”

“सरांनी आम्हाला केवळ अभ्यास शिकवला नाही, तर आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि मोठी स्वप्ने पाहण्याची शिकवण दिली. त्यांच्या संघर्षातून विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचे महत्त्व समजते.”

अभिजीत सरांची समाजसेवेची तळमळ आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द ही अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच अनेकांना नवीन दिशा देणारा आहे." अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. नितीन चव्हाण यांनी महाराष्ट्र  गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


पुढील ध्येय: न्याय क्षेत्रात प्रभावी काम करण्याचा संकल्प :

समाजातील गरजू आणि वंचित लोकांना कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे हेच आता अभिजीत मोरे यांचे मुख्य ध्येय आहे. केवळ वकिली व्यवसाय करणे हा त्यांचा उद्देश नसून, समाजसेवेचे त्यांचे जुने स्वप्न आता ते कायद्याच्या माध्यमातून साकार करणार आहेत. आपल्या पुढील वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना आता LL.M (कायद्याव्यतिरिक्त पदव्युत्तर पदवी) पूर्ण करायची आहे. उच्च शिक्षण घेऊन न्याय क्षेत्रात अधिक प्रभावी भूमिका बजावणे आणि समाजातील शेवटच्या घटकाला कायदेशीर मदत मिळवून देणे, हाच त्यांचा पुढील संकल्प आहे.


अभिजीत मोरे यांचा हा प्रवास थॉमस अल्व्हा एडिसन यांच्या एका सुप्रसिद्ध विचाराची आठवण करून देतो “स्वप्न मोठे असेल तर अडथळेही मोठे असतात; पण जिद्द आणि मेहनत असेल तर यशाचा मार्ग नक्की खुला होतो.” एडिसन यांचे हे वाक्य अभिजीत मोरे यांनी आपल्या कर्तृत्वाने तंतोतंत खरे करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख, अडचणी येत असतात परंतु अशा अडचणींमुळे, संकटांमुळे खचून न जाता, जिद्दीने, चिकाटीने मेहनत केली तर तुम्ही तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता.

Wednesday, July 22, 2026

"देशातील नीट परीक्षेतील पेपरफुटी व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात पुरंदरमधील सासवडमध्ये जनआक्रोश; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, पेपर फुटी करणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पुरंदर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी; पुरंदरमध्ये जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी नेहमीच प्रामाणिक लढा देणारे शिवसेनेचे शिलेदार अभिजीत मधुकर जगताप यांचा विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी आक्रमक उपोषणातून प्रेरणादायी लढा "...


सासवड, दि.22 : देशात नीट (NEET), टीईटी (TET) यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये लागोपाठ समोर आलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील लाखो तरुण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कठीण समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या विरोधात व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात आज भारतात लाखो विद्यार्थी, तरुणाई, रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून उतरलेली आहे.


भ्रष्टाचाराच्या या धगीत अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी आत्महत्यांसारखी अत्यंत दुर्दैवी पावले उचलली आहेत. या निष्काळजी कारभाराला आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूस थेट जबाबदार असणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पुरंदर तालुक्यात जनआक्रोश निर्माण झाला. 


"पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचे शिलेदार अभिजीत मधुकर जगताप नेहमीच जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी लढा देताना दिसतात. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने कृतीत आणून समाजातील सर्व घटकांसाठी ते नेहमीच लढा देताना दिसतात. यावेळी देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी व नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या विरोधात, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  अभिजीत मधुकर जगताप यांनी पुरंदर तालुक्यात उपोषणाच्या, आंदोलनाच्या माध्यमातून आक्रोश निर्माण केला. या आंदोलनाला समाजातील सर्व घटकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला."


भारतातील कठीण समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या विरोधात, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिजीत मधुकर जगताप व सहकाऱ्यांच्या व सर्व आंदोलकांच्या वतीने सोमवारी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. 


देशाची बौद्धिक संपदा जपणाऱ्या आणि तरुणाईच्या अहोरात्र मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व समाजसेवक  सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या या संघर्षाला नैतिक व सक्रिय पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, पुरंदर तालुक्यातील समविचारी राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड नगरपालिका इमारतीसमोर १७ जुलै २०२६ पासून दररोज सकाळी १० वाजता चक्री उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनाला पुरंदर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण, शिक्षक, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, समाजातील सर्वच घटकांनी आंदोलनात सहभागी होऊन, पाठिंबा दिला.


NEET गैरव्यवहार प्रकरणी सासवडमध्ये जनक्षोभ; साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांतून मोठा पाठिंबा : 
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ आणि पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी सासवड नगरपालिका समोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा  दुसरा दिवस अभूतपूर्व पाठिंब्याने गाजला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, पुरंदर तालुक्यातील समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, पालक व विद्यार्थ्यांनी हे शांततापूर्ण लोकशाही आंदोलन उभारले.


आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक  अभिजित मधुकर जगताप आणि  लक्ष्मण झुरंगे यांनी दिवसभर कडक उपोषण केले. 


"विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. परीक्षेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे," असा आक्रमक सूर या वेळी आंदोलकांकडून उमटला.


पुरंदर मधील या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांची एकजूट आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पारगाव व विमानतळ विरोधी कृती समितीचे नेते  पांडुरंग मेमाणे, सरपंच ज्योतीताई मेमाणे, माजी सैनिक बबन मेमाणे यांच्यासह कुंभारवळणच्या सरपंच  मंजुषाताई गायकवाड उपस्थित होत्या.


आम आदमी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय कड, छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सागरनाना जगताप, पुरोगामी संघर्ष परिषदेचे डॉ. सुभाष वायदंडे, राष्ट्रीय सेवा दलाचे देवा भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण तात्या भिंताडे व रामदास जगताप  यांनी आंदोलनाला उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला.


वैद्यकीय, व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गाचा पाठिंबा :
विशेष म्हणजे पुण्याहून आलेल्या डॉ. सुवर्णा माने, डॉ. सुभाष नप्ते, डॉ. तुषार घोरपडे यांच्यासह स्थानिक व्यापारी वर्गातील गिरीषजी कर्नावट (महावीर कलेक्शन), सतीश कुंभारकर यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.


"हा कोणा एकाचा नव्हे,तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा लढा आहे.त्यामुळे सर्व पालक,विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या शांततापूर्ण लोकशाही आंदोलनात सहभागी होऊन आपला पाठिंबा या ऐतिहासिक आंदोलनातून दर्शवला.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सासवड येथील नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात असलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पहिल्या दिवशी जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते रावसाहेब अण्णा पवार,साहित्य परिषदेचे  देशमुख,विशेष करून पुण्याहून आलेले बी एम सी सी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री वसंत धिवार हे सहकुटुंब उपस्थित होते.


या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख  उल्हास तात्या शेवाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तालुकाध्यक्ष  माणिक झेंडे पाटील,काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष  संभाजीराजे जगताप, राहुल गिरमे, महेंद्र घोडके, महेश खंडेराव जगताप, संभाजी जगताप,आर पी आय तालुकाध्यक्ष  बळीराम सोनवणे, कालिदास उबाळे, तुषार झुरंगे उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांमध्ये शेतकरी संघटनेचे  संजयनाना जगताप,राष्ट्रसेवा दलाचे अतिश जगताप, लक्ष्मी शंकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक,मा. नगरसेवक  सोनुकाका जगताप,बहुजन हक्क परिषदेचे  सुनीलतात्या धिवार, कैलास  धिवार,परिवर्तन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष  अमोल लोंढे,अठरा पगड बारा बलुतेदार संघांचे  अप्पासाहेब भांडवलकर,दादा नागरी सहकारी पतसंस्थेचे  विनायक पवार उपस्थित होते.


याप्रसंगी आयोजक या नात्याने  या साखळी उपोषणस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  सुरेशदादा कामठे, बाळासाहेब लोळे, सुदाम भाऊ शिनगारे,उपतालुका प्रमुख  राजाभाऊ क्षीरसागर, राजेंद्र जगताप, संतोष भोसले, पोपट कुमकर, संतोष खैरे, संतोष भोंगळे, दादासाहेब झिंजुरके, गिरीश जगताप, विश्वास गद्रे, अभिजीत पवार हे उपस्थित होते,


विविध संस्थांचे शिक्षक,विद्यार्थी,तसेच शिक्षिका जयश्री शिंदे आणि विद्यार्थिनी ऐश्वर्या भुजबळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले,


साखळी उपोषणकर्ते म्हणून  अभिजित मधुकर जगताप आणि  लक्ष्मण झुरंगे यांनी दिवसभर उपोषण केले.शिक्षिका जयश्री शिंदे आणि विद्यार्थिनी ऐश्वर्या भुजबळ यांनी मांडलेल्या व्यथेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


आयोजक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  सुरेशदादा कामठे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. हा लढा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याचा आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी यात सहभाग घेतला.


साखळी उपोषणाचा तिसरा दिवस  तीव्र आंदोलनाचा इशारा :
सासवड येथील या साखळी उपोषणाचा तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार बांधव, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

या आंदोलनावेळी उपस्थितांना संबोधित करताना आंदोलकांनी सांगितले की, "परीक्षांमधील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवणे ही सरकार आणि संबंधित परीक्षा यंत्रणांची पहिली घटनात्मक जबाबदारी आहे.कर्जाचे डोंगर उभे करून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या पालकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल."


देशातील नीट घोटाळ्याच्या विरोधात व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पुरंदर मधील  शिलेदारांनी सोमवारी तहसीलदार   विक्रम राजपूत यांना दिलेल्या निवेदनांमधील प्रमुख ७ मागण्या : 

१. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा : लागोपाठ होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

२. मनुष्यवधाचा गुन्हा व कठोर शिक्षा : पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढून दोषींना फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा द्यावी, किंवा सरकारच्या प्रचलित नियमांनुसार दोषींची घरे पाडून टाकावीत.

३. शिक्षण व्यवस्थेत समूळ पारदर्शकता : संपूर्ण शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीमध्ये तातडीने पारदर्शकता आणली जावी.

४. केजी टू पीजी मोफत शिक्षण : 'KG to PG' संपूर्ण शिक्षण मोफत करण्यात यावे आणि अवाच्या सव्वा फी आकारणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करण्यात यावी.

५. खासगी अकॅडमींवर बंदी : समांतर शिक्षण व्यवस्था उभी करून पालकांना दुप्पट आर्थिक भुर्दंड देणाऱ्या खासगी अकॅडमी तात्काळ बंद कराव्यात.

६. शिक्षकांची अवांतर कामांतून सुटका : अवांतर कामांतून शिक्षकांची होणारी फरफट थांबवून, त्यांच्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कालानुरूप विद्यार्जनाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात यावी.

७. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवणे : शिक्षणातील वाढते व्यापारीकरण आणि बाजारीकरण पूर्णपणे रोखले जावे.


आंदोलनाला प्रमुख नेत्यांची उपस्थिती व पाठिंबा :
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या साखळी उपोषणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुरंदर तालुका प्रमुख  अभिजीत मधुकर जगताप आणि  लक्ष्मण झुरंगे यांनी दिवसभर कडक उपोषण केले.


"देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी असणाऱ्या या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा मा. नगरसेवक  नंदुबापू जगताप, सामाजिक कार्यकर्ते अनिलतात्या जगताप, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड आणि  काकडे यांनी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती केलेल्या लाठीचार्जचा निषेध करून, या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला."


तसेच आयोजक पक्षाच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  सुरेशदादा कामठे, उपतालुका प्रमुख  राजाभाऊ क्षीरसागर,  शुभम झिंजुरके आणि  विजय झुरंगे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


"हा विद्यार्थ्यांचा, तरुणाईचा लढा कोणा एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून, देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सर्व पालक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिक या शांततापूर्ण लोकशाही आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. आजची भारताची तरुण पिढी ही उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. नीट परीक्षेतील घोटाळा, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारामध्ये ढकलले गेले आहे. यामुळे देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांचे, तरुणांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन सोडवले पाहिजेत." अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुका प्रमुख  अभिजीत मधुकर जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यातील, पुरंदरची भूमी ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूमी आहे. स्वराज्याच्या लढाईपासून ते आधुनिक काळातील कला, क्रीडा, विज्ञान, समाजकारण, राजकारण,प्रशासन, संस्कृती सर्व क्षेत्रातील कर्तुत्वान शिलेदारांनी या भूमीचे नाव देशभरात उंचावले आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"पुरंदर तालुक्यातील तरुणाईने, विद्यार्थ्यांनी या उपोषणात, आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दिला. सरकारने विद्यार्थ्यांचे, तरुणांचे प्रश्न गांभीर्याने समजून घेऊन, प्रामाणिकपणे सोडवले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या, तरुणाईच्या न्याय व हक्कांसाठी दिल्ली येथे सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात सुरुवातीला ज्या ज्या ठिकाणी आंदोलने सुरू झाली, त्यामध्ये "पुरंदरच्या आंदोलनाचा इतिहास" नक्कीच नोंदला जाईल. पुरंदरची महान भूमी ही शूरवीर योद्धयांची, कर्तुत्वान शिलेदारांची आहे. या महान भूमीने नेहमीच देशाच्या सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिलेले आहे"


नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या विरोधात व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभरातून लाखो तरुणाई  रस्त्यावरती उतरलेली आहे. विद्यार्थ्यांचे, तरुणाईचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घेऊन जर सोडवले नाहीत तर भविष्यामध्ये हेच आंदोलन खूप उग्र स्वरूप धारण करेल त्यामुळे लवकरात लवकर सरकारने विद्यार्थ्यांचे, तरुणांचे प्रश्न सोडवले पाहिजेत.

Wednesday, July 15, 2026

"श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात भक्ती,शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम; भारतातील 16 हजारांहुन अधिक शाळा व वीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' संस्थेचे शिलेदार मिलिंद माने मित्र परिवारातर्फे श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांना रेनकोट वाटप करून, सामाजिक वसा जपण्याचा "या" चार जिवलग मित्रांचा अनोखा सामाजिक उपक्रम"

सासवड, दि.15 : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सासवड येथून श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान करून, श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा  रविवारी १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यातील, पांगारे येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

"टाळ-मृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "श्री संत सोपानदेव महाराज की जय" या जयघोषाने अवघा पुरंदर तालुका व पांगारे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.या पालखी सोहळ्याचे नेटके, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारे विविध सामाजिक उपक्रम हे या वर्षीच्या वारीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत."

"पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या चार मित्रांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन या वारीत पहायला मिळाले. सेवा, भक्ती, शक्ती, आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या श्री संत सोपानकाका महाराज पालखी  सोहळ्यात पाहायला मिळाला. महाराष्ट्राची महान परंपरा असलेल्या या वारीच्या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या भक्ती आणि शक्तीच्या ऊर्जेची अनुभूती प्रत्येक भाविक - भक्ताला आल्याशिवाय राहत नाही""

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात विठूनामाचा गजर घुमत असून, महाराष्ट्रातील महान संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या भक्तीच्या महासागरात केवळ विठ्ठलनामाचा गजरच नाही, तर सेवेचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये अशाच एका निस्सीम सेवाभावाची प्रचिती आली, जेव्हा समाजातील चार यशस्वी मित्रांनी एकत्र येत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी हक्काची सावली निर्माण केली.

भारतात शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य करणाऱ्या आणि देशातील १६ हजारांहून अधिक शाळांमधील तब्बल २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या 'लेंड अ हॅन्ड इंडिया' (Lend-A-Hand India) या नामांकित संस्थेचे शिलेदार मिलिंद माने आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.

या पालखी सोहळ्यात लेंड अ हँड इंडिया या सामाजिक संस्थेचे शिलेदार मिलिंद माने व यांच्या मित्र परिवाराने श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे.

"पावसाची संततधार आणि वाढती थंडी लक्षात घेऊन, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांच्यासह पुण्याच्या उद्योग जगतातील प्रसिद्ध नाव आणि 'ओव्हन फ्रेश'चे मालक प्रमोद बाक्रे, अग्रगण्य इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर किरण सामल आणि जिम साहित्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योजक संजय सावंत या चार मित्रांनी श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात सेवाभावी वृत्तीतून शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप केले."

आपला व्यवसाय आणि दैनंदिन व्यस्ततेमधून वेळ काढत, वारीतील शेवटच्या घटकाची काळजी घेण्याच्या उद्देशाने या चार मित्रांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. 

वारीदरम्यान कोसळणाऱ्या पावसातही वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास अविरत सुरू राहावा, त्यांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे रेनकोट जणू माऊलींची मायेची शाल ठरले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. या वारीत विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या या वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर चालत असताना भक्ती आणि अध्यात्मिक ऊर्जेची आम्हाला अनुभूती मिळाली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान,आनंद आणि या महान पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे," अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.

भक्ती, शक्ती आणि सामाजिक सेवेचा हा अनोखा मेळ पाहून संपूर्ण पालखी सोहळ्यात या चारही मित्रांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, "अशाच समाजसेवेतून खऱ्या अर्थाने विठ्ठल सेवा घडते," अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी दिली.

पारंपरिक रिवाज आणि शिस्तबद्ध नियोजन -

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख  त्रिगुण महाराज गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीचे रिवाज जपत आणि कोणताही विस्कळीतपणा येऊ न देता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालखीचे मार्गक्रमण सुरू आहे.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या वारीचे हेच नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वरूप दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत असते. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यंदाही श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याला कडक सुरक्षा आणि स्वयंसेवकांच्या चोख नियोजनात दिंड्यांचे पांगारे येथे शांततेत, भक्तीमय वातावरणात आगमन झाले.

'फूल ना फुलाची पाकळी' सेवाभावी वृत्तीतून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप - 

आषाढ महिन्यातील संततधार पाऊस आणि बदलत्या हवामानाचा विचार करून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक सेवाभावी संस्था आणि भक्तांचे कर्तव्य ठरते. याच उदात्त भावनेतून, पालखी सोहळा प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून 'फूल ना फुलाची पाकळी' या भावनेने शेकडो वारकऱ्यांना दर्जेदार रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमामध्ये एलआयसी ऑफ इंडियाचे भारतातील प्रसिद्ध अधिकारी, भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणारी सामाजिक संस्था "लेंड अ हॅन्ड इंडिया" या संस्थेचे शिलेदार मिलिंद माने, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक किरण सामल, प्रमोद बाक्रे, संजय सावंत यांनी भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ मदत न करता हे सर्व मित्र स्वतः वारीच्या भक्तीमय वातावरणात दंग झाले. 

त्यांनी वारकऱ्यांसोबत सासवड ते पांगारे या पालखी सोहळा मार्गावर टाळ धरत, वारीमध्ये पायी प्रवास केला आणि वारीचा अलौकिक सोहळा अनुभवला. 

रेनकोट वाटपासारख्या पवित्र कार्याची आणि वारकरी सेवेची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मित्र परिवाराने  श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पांगारे येथील या मुक्कामादरम्यान पालखी सोहळ्यातील सर्व १२६ नोंदणीकृत दिंड्या, त्यांचे प्रमुख, वारकरी भाविक, विणेकरी आणि चोपदार यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.

पुणे येथील मित्र परिवाराने सोपानदेवांच्या चरणी लीन होऊन, सर्व वारकऱ्यांना पुढील वारीचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि सुरक्षित होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पांगारे येथील ग्रामस्थांच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला वर्गाने श्री संत सोपानकाका महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. सोमवारी पहाटे महापूजा आणि आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचा हा अनोखा सोहळा पंढरीच्या दिशेने विठूनामाचा गजर करत पुढे वाटचाल करत आहे.

‘वारी’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा, देदीप्यमान आणि जिवंत उत्सव आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो वारकऱ्यांनी भक्ती भावाने पायी चालत जाण्याची जी शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी ही 'वारी' लाखो वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करते.

वारी करणाऱ्या लाखो श्रद्धाळू वारकऱ्यांना भक्तीची ही ऊर्जा वर्षभर मिळत असते. ​हा केवळ एक धार्मिक प्रवास नाही, तर तो समता, बंधुभाव आणि भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा आहे.