Monday, May 19, 2025

"पुरंदर तालुक्यातील निर्भीड, कर्तृत्ववान पत्रकार, वीर गावचे भूषण; संघर्षयोद्धे शिवदास शितोळे यांना छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त किल्ले पुरंदरवर आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित; ग्रामीण भागातील सामान्य तरुण ते शिवव्याख्याता,लेखक ते निर्भीड पत्रकार ते संघर्षयोद्धा"....

पुरंदर, वीर, दि.१९ : महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदर तालुका हा शूरवीर, पराक्रमी, कर्तुत्वान महान लोकांच्या महान कामगिरीने पावन झालेला ऐतिहासिक तालुका आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील वीर गावचा तरुण शिवदास शितोळे  प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करून, प्रामाणिकपणे काम करून पत्रकारिता क्षेत्रात जनतेचे गंभीर प्रश्न मांडून,सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करून समाजाची सेवा करतो.हा संघर्षमय प्रवास तरूणाईसाठी प्रेरणादायी आहे.

पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर गावचे भूषण, दैनिक पुढारीचे निर्भीड, वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांच्या निर्भीड, प्रामाणिक पत्रकारितेचा व समाजसेवेचा सन्मान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ल्यावर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने १४ मे रोजी बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत, दैनिक पुढारीचे पत्रकार शिवदास शितोळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन करण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र  वीर या गावचे भूषण, सुपुत्र, शिवव्याख्याते, लेखक, पत्रकार शिवदास शितोळे यांच्या प्रभावशाली लेखणीचा, समाजहितवादी पत्रकारितेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यात त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केला होता. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड, प्रसिद्ध सिनेअभिनेते किरण माने, प्रसिद्ध लेखक देवा झिंझाड तसेच अभिव्यक्ती चॅनलचे संपादक रवींद्र पोखरकर यांच्या हस्ते हा विशेष सन्मान आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी तसेच हजारो शिव-शंभूभक्त यावेळी उपस्थित होते.

शिवदास शितोळे हे शिवव्याख्याते, लेखक, पत्रकार म्हणून अनेक वर्षांपासून काम करत असून, समाजातील सामान्य लोकांना चहुबाजूने त्रास देणाऱ्या कुचकामी व्यवस्थेवरती, चुकीच्या गोष्टींवरती आपल्या लेखणीच्या, पत्रकारितेच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम निष्पक्ष आणि निर्भीडपणे पत्रकार शिवदास शितोळे करत आहेत. 


"गगनभरारी न्यूज तसेच महाराष्ट्र माझा न्युज या युट्युब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेली आहे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्याचेही सदस्य असून नाट्य, चित्रपट, कला क्षेत्राशी ही ते निगडित आहेत." लवकरच ते युवा पिढीसाठी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक बल संपादन करून आपल्या ध्येयापर्यंत कमीत कमी वेळेत कसे पोहोचावे हे शिवविचाराच्या माध्यमातून सांगणारे "राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!" पण कशासाठी? या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. अशी माहिती पत्रकार शिवदास शितोळे यांनी दिली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"भले तरीही देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी मारू काठी." या उक्तीप्रमाणे आपल्या विविधअंगी लेखनातून, दैनिक पुढारीच्या बातमीदारीच्या माध्यमातून शिवदास शितोळे यांनी समाजातील विविध चुकीच्या चालीरीती, अंधश्रद्धा तसेच अवैध व्यवसाय, समाजामध्ये चाललेले बेकायदेशीर व्यवसाय यांच्या विरोधात आपल्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता अभ्यासपूर्ण, निष्पक्ष, निर्भीड आणि कडक शब्दात प्रहार करून प्रशासनाला धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. 

"मराठी माणसाचे मराठी स्वभाव" या एकपात्री विनोदी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण शिवदास शितोळे यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या एकपात्री विनोदी नाटकाचे उद्घाटन पुण्यातील प्रसिद्ध नाट्यगृह बालगंधर्व येथे झालेले होते.

शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या तसेच उद्योजकांच्या  यशोगाथाही त्यांनी त्यांच्या शब्दात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या आहेत.

पत्रकार हा समाज व्यवस्थेचा कणा असतो त्यामुळेच ग्रामीण भागातील  आरोग्य, वीज,पाणी,शिक्षण, ग्रामपंचायत मधील गैरकारभार, देवस्थान ट्रस्टमधील गैरकारभार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेकायदेशीर धंदे यासारख्या वेगवेगळ्या विषयावरती  पत्रकार शिवदास शितोळे यांनी दैनिक पुढारी  वृत्तपत्रात खास बातम्या प्रसिद्ध करून समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सामान्य माणसाचे गंभीर प्रश्न त्यांनी आपल्या सडेतोड लेखणीतून मांडले आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटक  पत्रकार शिवदास शितोळे यांच्याकडे आशेने बघत असून जनतेच्या बाजूने कोणीतरी बोलणारा आपला हक्काचे माणूस आहे. ही भावना सर्वसामान्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे.

पुरंदर किल्ल्यावरती आलेल्या सर्व शंभू भक्तांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाप्रसादाचीही व्यवस्था केली होती. या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे सागर  जगताप, संतोष हगवणे, अजय सावंत, अमोल काटे तसेच विविध पदाधिकारी, शिव-शंभुभक्त यावेळी उपस्थित होते.


"अन्याय करणे पाप आहे तर दुसऱ्याने केलेला अन्याय सहन करणे महापाप आहे. समाजामध्ये आज अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत असून आपण फक्त डोळ्यांनी  मूकपणे पाहत सहन करतो. त्यामुळेच अन्याय करणाऱ्याला बळ मिळत असते. ही भूमी अन्यायाविरुद्ध  लढून कधीही हार न मानणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. या भूमीला शुरांचा ,वीरांचा वारसा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांनी कसलीही भीती न बाळगता चुकीच्या गोष्टींच्या विरोधात ठामपणे उभे राहून त्याचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावे. समाजातील चुकीच्या प्रवृत्ती विरोधात, भ्रष्ट प्रवृत्ती विरोधात कायदेशीररित्या लढून घटनेच्या चौकटीत कठोर कायदेशीर कारवाई करता येते. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी आपण चित्रण करून प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला कळवू शकतो. फक्त मनामध्ये हवी थोडी धमक. परंतु दुर्दैवाने या शूरवीरांच्या भूमीमध्ये आज अनेक जण भित्रेपणाने अन्याय सहन करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.तरीही काही जण आज चुकीच्या गोष्टींच्या विरोधात दंड थोपटून मोठा प्रहार करत आहेत हेही आशादायकच म्हणावे लागेल." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार, लेखक शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त  पत्रकार शिवदास शितोळे यांना मिळालेल्या आदर्श पत्रकारितेचा पुरस्कारामुळे आम्हाला विशेष आनंद आहे. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या निर्भीड, प्रामाणिक कार्याचा हा सन्मान आहे. समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या आदर्श पत्रकारितेसाठी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. आपल्या पुरंदर तालुक्यातील निर्भीड व कर्तृत्ववान पत्रकार शिवदास शितोळे यांचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार देऊन या सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आला. समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या पाठीवरती ही दिलेली कौतुकाची थाप असते. पत्रकार शिवदास शितोळे यांच्या पत्रकारितेतील प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे मा. आमदार,लोकप्रतिनिधी संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक  तरुण, अभ्यासू पत्रकार समाजातल्या सर्व घटकांचे प्रश्न निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, पोट तिडकेने मांडून प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून, समाजाची सेवा करतो हे पत्रकार शिवदास शितोळे यांनी त्यांच्या कर्तुत्वातून सिद्ध केलेले आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीची बदनामी करणारा, चारित्र्यहनन करणारा एक वर्ग असतो याची तमा न बाळगता निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे यांनी प्रामाणिकपणे जनतेच्या समस्यांवरती दैनिक पुढारीच्या माध्यमातून खास बातमीदारी करून लोकांची मने जिंकलेली आहेत. राज्यातील प्रसिद्ध सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेडने पत्रकार शिवदास शितोळे यांचा केलेला हा सन्मान अभ्यासू, वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांच्या प्रामाणिक व समाजहितवादी पत्रकारितेचा सन्मान आहे. सामान्य माणसाचे शोषण, पिळवणूक  करणाऱ्या समाजातील भ्रष्ट व कुचकामी व्यवस्थेविरुद्ध निर्भीडपणे लढण्यासाठी पत्रकार शिवदास शितोळे यांना मनापासून शुभेच्छा" अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.


महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील प्रसिद्ध सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड ही समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम नेहमीच राबवत असते. संभाजी ब्रिगेडने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा केलेला हा सन्मान प्रत्येक व्यक्तिमत्त्वांच्या प्रगतशील वाटचालीसाठी ऊर्जा देणारा असेल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरती संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार सोहळ्याने शंभू भक्तांची मने जिंकलेली आहेत.