Thursday, July 24, 2025

"पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचा ओम जगताप व सार्थक गाढवे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले; आई - वडिलांना दिलेला शब्द ओम जगतापने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकून,यशस्वी भरारी घेऊन पाळला"....

पुणे,दि.२४ : महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया चांगल्या प्रकारे भक्कम करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचा इयत्ता पाचवीचा गुणवंत विद्यार्थी ओम अजित जगताप  व इयत्ता आठवीचा गुणवंत विद्यार्थी सार्थक प्रवीण गाढवे या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून, दोघेही जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत.

"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या  ओम अजित जगताप या गुणवंत विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवुन, शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकून शाळेचे व पालकांचे नाव उंचावलेले आहे."

"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या सार्थक प्रवीण गाढवे या गुणवंत विद्यार्थ्याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवून, शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत  झळकून शाळेचे व पालकांचे नाव उंचावलेले आहे."

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. पुणे शहरात संपूर्ण देशभरातून व जगभरातून अनेक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी येत असतात. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुणे शहरातील दक्षिण उपनगरांमधील, धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शन विद्यामंदिर प्रशाला ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे अनेक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवून चमकलेले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील हॉलीबॉल या खेळाच्या स्पर्धेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेची मुले राष्ट्रीय स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पोहचून विविध पदके, बक्षिसे मिळवलेली आहेत.प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे क्रीडाशिक्षक संदीप भोसले यांनी अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडवलेले आहेत.

"आई ही जगातील खूप मोठी मार्गदर्शक, आधारस्तंभ असते. ओम जगताप या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतशील वाटचालीमध्ये त्याची आई मंजुषा जगताप यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या इयत्ता पाचवीच्या ओम अजित जगताप या गुणवंत विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशामध्ये ओम जगताप याचे कष्ट, मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन व  त्याच्या आई-वडिलांचे संस्कार, प्रेरणा व मार्गदर्शन याचे खूप महत्त्वाचे योगदान आहे."

"मला कितीही अभ्यास करावा लागला तरी चालेल. कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. पण यावर्षी मी पाचवीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत, गुणवत्ता यादीत झळकणारच. मी शिष्यवृत्तीधारक बनणारच." हा शब्द ओम जगताप याने आपल्या आई- वडिलांना दिला आणि पाळला व राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश संपादन करून शब्द पूर्ण केल्यामुळे ओम जगतापवरती शाळेतील शिक्षकांनी व नातेवाईकांनी,पुणे शहरातील नागरिकांनी, मित्रपरिवारांनी कौतुकाचा वर्षाव केला."

शालेय जीवनात लहान मुलांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालेले यश जरी शालेय जीवनात छोटे वाटत असले तरी मोठ्या यशाची सुरुवाती ही छोट्या यशानेच होत असते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

शालेय जीवनामध्ये शिक्षकांचे विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असते. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवलेला सार्थक प्रवीण गाढवे याच्या यशामध्ये सार्थक गाढवेने केलेले कष्ट, मेहनत व त्याच्या आई-वडीलांचे मार्गदर्शन व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्गाचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक गाढवे याला मिळालेल्या देदीप्यमान यशामुळे सार्थक गाढवे वरती त्याच्या शाळेतील शिक्षक वर्ग, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

"महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे वैदही विजयकुमार थोरात, ओम अजित जगताप, सारा अशोक गलांडे, आराध्या विशाल जगताप हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ओम जगताप हा विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकला."

"पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आंचल गणेश पाटील, सोहम धनराज बिराजदार, सार्थक प्रवीण गाढवे व जान्हवी अशोक गलांडे हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि सार्थक गाढवे हा गुणवंत विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकला."

"दक्षिण पुण्यातील धनकवडी परिसरातील असलेल्या आमच्या प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातच सुखद अशा घटनेने झाली आणि ती म्हणजे राज्यस्तरीय शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल होय. यंदाच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले. आमच्या प्रशालेतील विद्यार्थी ओम अजित जगताप याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवुन, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये झळकुन आमच्या प्रशालेचा गौरव वाढवला तर आमच्या प्रशालेच्या सार्थक प्रवीण गाढवे या विद्यार्थ्याने माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळवून, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकून शाळेचे नाव उंचावले आहे. या आमच्या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या व पालकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळून आमच्या प्रशालेचा यशाचा आलेख उंचावला आहे. हे यश निश्चितच सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. आमच्या प्रशालेच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या आदर्श मुख्याध्यापिका राजश्री निंगुणे/दिघे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहेत. या परीक्षा भविष्यात देण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा पाया समजला जातो. अशा परीक्षेमध्ये आमच्या प्रशालेतील ओम अजित जगताप इयत्ता पाचवी व सार्थक प्रवीण गाढवे इयत्ता आठवी यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान संपादन करून शाळेचा व पालकांचा गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे दोन्ही विद्यार्थी आमच्या प्रशालेचे चमकते तारे आहेत.अशा परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसले पाहिजे." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी माध्यमिक विद्यामंदिरच्या आदर्श मुख्याध्यापिका, रूपाली मालुसरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा दिल्या पाहिजेत. आमच्या ओमची जिद्द, चिकाटी, मेहनत व ओमच्या वडिलांचे मार्गदर्शन व प्रेरणा व ओमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ओमला शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश मिळाले. ओमने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकून शिष्यवृत्तीधारक बनणारच हा आम्हाला दिलेला शब्द  पूर्ण करून दाखवला याचे आम्हाला खूप समाधान आहे. आई म्हणून त्याच्यावरती केलेले संस्कार व त्याला केलेले मार्गदर्शन यामुळे तो शालेय जीवनात चांगली प्रगती करतोय याचे खूप समाधान आहे. प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. आपल्या मुलांनी आपल्यापेक्षाही खूप मोठे व्हावे.चांगली प्रगती करावी हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो." अशी प्रतिक्रिया ग्रेट सक्सेस अकॅडमीच्या संचालिका, ओमच्या आई मंजुषा जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


शालेय जीवनामध्ये मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील कलागुण जोपासावेत तसेच शालेय जीवनात अभ्यासातही चांगली प्रगती करावी यासाठी प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचा संपूर्ण शिक्षक वर्ग प्रामाणिकपणे कार्यरत असतो.

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रियदर्शी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळावे म्हणून मुख्याध्यापक संघाच्या कार्यशाळा,उपक्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"आमच्या प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे अनेक गुणवंत विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करून,मेहनत करून उज्वल यश मिळवत असतात. महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीच्या ओम अजित जगताप व इयत्ता आठवीच्या सार्थक प्रवीण गाढवे या गुणवंत विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून, आमच्या शाळेचा व शिक्षकांचा गौरव वाढवलेला आहे. आमच्या प्रशालेसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे यश आमच्या प्रशालेतील मुलांना प्रेरणा देईल." अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श कलाशिक्षक सुनील सोनवणे  यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


पुणे शहरातील अनेक आदर्श मराठी शाळांनी मराठी संस्कृतीचा गौरव वाढवलेला आहे. मुलांचे मातृभाषेतील शिक्षण बौद्धिक, मानसिक व भावनिक विकास करते. पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून, मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते.


महाराष्ट्र राज्य परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता आठवी अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06% लागला आहे. इयत्ता पाचवीचा निकाल 23.09 टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के लागला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकालांमधील 31 हजार 786 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील 16,693 विद्यार्थ्यांचा तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ लाख 44 हजार 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख 66 हजार 368 तर इयत्ता आठवीसाठी तीन लाख 78 हजार 95 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी नऊ लाख 13 हजार 268 विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख 47 हजार 504 तर इयत्ता आठवीतील 3 लाख 65,754 विद्यार्थ्यांचा समावेश होतो. या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला.

गुणपडताळणीसाठी शाळांकडून 25 एप्रिल ते 4 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परिषदेने या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्तायादी जाहीर केली. परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील एक लाख तीस हजार 846 आणि इयत्ता आठवीतील 70 हजार 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06% इतका लागला असून, इयत्ता पाचवीचा निकाल 23.09% तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30% इतका लागलेला आहे. तसेच शासनमान्य मंजूर संचानुसार शिष्यवृत्तीसाठी पाचवीतील 16 हजार 693 विद्यार्थी तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारी ही शिष्यवृत्ती एक चांगले प्रोत्साहनपर पाऊल आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षासाठी वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षासाठी वार्षिक साडेसात हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.

"महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसतात. त्यामधून जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून स्वप्नांचा पाठलाग करणारे यशवंत विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात. आणि आपल्या शाळेचे, पालकांचे गावाचे, शहराचे नाव मोठे करतात व अभिमानाने उंचावतात."

पुणे शहराच्या दक्षिण उपनगरातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक वर्षांनी, ओम जगताप व सार्थक गाढवे हे दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

महाराष्ट्रातील लाखो - करोडो मुलांच्या आयुष्यात शिक्षकांचे, शाळेचे, पालकांचे योगदान खूप महत्त्वाचे असते. राज्यस्तरीय विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, कला क्षेत्रातील स्पर्धा या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्त्वाच्या असतात.

Sunday, July 13, 2025

"जगाला प्रेरणा देणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे "हे" १२ ऐतिहासिक किल्ले जगप्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात; रायगड,शिवनेरी, सिंधुदुर्गसह बारा ऐतिहासिक किल्ल्यांचा जागतिक गौरव; गड - किल्ले संवर्धन काळाची गरज, शालेय विद्यार्थ्यांनी "या" ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊन प्रेरणादायी शिवकाळ अनुभवा"....

मुंबई, दि. 13 : जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा ऐतिहासिक  किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल जगभरातील करोडो शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचे व महान पराक्रमाचे स्मरण करून देणारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड - किल्ले हे लहान मुलांपासून ते तरुणाई ते अबाल वृद्धांपर्यंत भारतातील व महाराष्ट्रातील लाखो - करोडो लोकांना नेहमीच प्रेरणा देणारे आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

युनेस्को सारख्या जगातील प्रसिद्ध व मोठ्या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड - किल्ल्यांचा, मराठा साम्राज्याचा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचा एवढा मोठा गौरव करणे हे महाराष्ट्रासाठी व भारतासाठी खूप अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.

"जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान गड -  किल्ले राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजेत. प्रत्येक गड - किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व महान पराक्रमाने पावन झालेले शिवनेरी,रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा,राजगड, विजयदुर्ग यांसारखे शेकडो गडकिल्ले शालेय विद्यार्थ्यांनी व तरुणाईने पाहिले पाहिजेत. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी तसेच तरुणाईने राज्यातील शेकडो ऐतिहासिक गड - किल्ल्यांवरती जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास, महान जीवन कार्य समजून घेतले पाहिजे,अनुभवले पाहिजे. गड - किल्ल्यांवरील महान इतिहासातून प्रेरणा घेऊन आपलं जगणं समृद्ध केले पाहिजे."

आजच्या काळातील जीवनशैली, ताणतणाव यामुळे काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये व  तरुणांमध्ये नैराश्य जाणवत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन, जगातील खूप मोठ्या संकटावरती मात करून जिद्दीने, चिकाटीने, एकजुटीने रयतेचे कल्याणकारी राज्य कसे निर्माण करता येते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाने दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व गड - किल्ले पाहिल्यानंतर याच महान इतिहासाला उजाळा मिळतो व  स्फूर्ती मिळते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार मावळ्यांना संघटीत करुन महाराष्ट्राच्या मातीत रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. रयतेचं राज्य स्थापन करण्याचा ध्यास घेऊन लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याच ऐतिहासिक गड - किल्यांनी भक्कम साथ दिली होती. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, मराठी मावळ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील. ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या बारा किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्यांचं संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचं महत्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगडधोंड्यांचे बांधकाम नाही, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे भक्कम बुरुज आहेत. आज त्यांना जागतिक दर्जा मिळाल्याने स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यातील दुर्ग दुर्गेश्वर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले शिवकालीन सामरिक रणनीती, अद्वितीय स्थापत्यकौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहेत. या यशासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने प्रस्ताव तयार केला होता. प्रधानमंत्री कार्यालयाने “मराठा लष्करी स्थापत्य” प्रस्तावाची निवड करून युनेस्कोकडे पाठवली. या यशात राज्य सरकारच्या प्रयत्नांबरोबरच केंद्र सरकारच्या नेतृत्वात झालेल्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना मोलाचे यश मिळाले आहे." अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील 'जिंजी' किल्ला अशा एकूण १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी ही प्रत्येक नागरिक, शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे. 

हे केवळ एक ऐतिहासिक यश नाही, तर स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढलेल्या या गडकोटांना जागतिक स्तरावर मिळालेलं मान्यतेचं शिक्कामोर्तब आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले हे किल्ले  स्वराज्याच्या शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे सजीव साक्षीदार आहेत.

"आज या गडकिल्ल्यांना मिळालेला जागतिक दर्जा म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि सांस्कृतिक ठेव्याच्या समृद्धतेची कबुली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, युद्धनीतीचा आणि राज्यकारभाराच्या विचारसरणीचा अभ्यास आता जागतिक पातळीवर चर्चेचा, अभ्यासाचा आणि प्रेरणेचा विषय ठरणार आहे."

"या गौरवाच्या क्षणी एक मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपते ती म्हणजे या ऐतिहासिक वारशाचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. किल्ल्यांची केवळ भेट देणं, फोटो काढणं आणि जयघोष करणं पुरेसं नाही तर त्यांच्या स्वच्छतेची, सुरक्षिततेची आणि ऐतिहासिक मर्यादेची जाणीव ठेवणं ही खरी शिवभक्ती आहे. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर तो स्मरणातच नव्हे तर कृतीत उतरवावा लागतो. कारण, संवर्धनाशिवाय वारसा फक्त आठवण बनून राहतो."

या ऐतिहासिक क्षणाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग, इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी जनतेचे सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. 

आपल्या गडकोटांना मिळालेला हा सन्मान केवळ अभिमानाचा क्षण नाही, तर पुढील पिढ्यांसाठी त्यांना सन्मानाने जपण्याच्या संकल्पाचा क्षण आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही, तर ती पर्यटन, स्थानिक रोजगार, संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील गडकोटांभोवती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी नवीन अर्थव्यवस्था निर्माण होण्याची दिशा या निर्णयामुळे निश्चित झाली आहे."

"शिवकालीन गडकोटांना युनेस्कोकडून मिळालेली मान्यता ही आपल्या संस्कृतीचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जागतिक स्वीकार आहे. हे महाराष्ट्रासाठी एक तेजस्वी पर्व आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेली ही दुर्गशक्ती आता जागतिक मंचावर मानाने झळकणार  आहे."


या जागतिक मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) यांचा समावेश होता.

युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या “अद्वितीय वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value)” या निकषांवर हे किल्ले खरे उतरले. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकारमार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाने युनेस्कोकडे पाठविण्यासाठी निवडला होता.

या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली यांनी या १२ किल्ल्यांची स्थळ भेट घेतली आणि जिल्हाधिकारी व वनविभागांनीही सहकार्य केले.

या जागतिक मानांकनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या  महानिर्देशकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि पुरातत्व संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"हे जागतिक मानांकन केवळ ऐतिहासिक किल्ल्यांचे गौरवगान नाही, तर पर्यटन, संशोधन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णायक टप्पा आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य, स्थापत्य परंपरा आणि स्वराज्यरचना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झाली आहे."

“छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. ‘युनेस्को’चा दर्जा हा त्या ऐतिहासिक समृद्धतेला जागतिक मान्यता देणारा आहे.” असे मत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले आहे.

"छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. मराठा साम्राज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गड किल्ल्यांचा हा गौरव प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा आहे. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग,सुवर्णदुर्ग,खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांना "अद्वितीय वैश्विक मूल्य" म्हणून जागतिक वारसा यादीत(world heritage list) अंतर्भूत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक नेतृत्वातील मराठ्यांचं शौर्य,पराक्रम आणि स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास जगभरातील नागरिकांना,पर्यटकांना परिचित होण्यास यामुळे मदत होणार आहे.यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राज्य व केंद्र सरकार आणि युनेस्कोला मनस्वी धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाला मानाचा सलाम" अशी प्रतिक्रिया मा. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय दूरदृष्टीचा आणि पराक्रमाचा अमिट ठसा म्हणजे त्यांचे दुर्गराज – किल्ले. या किल्ल्यांमध्ये इतिहास, स्थापत्यकला, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्याचे सत्त्व सामावले आहे. आज गर्वाने सांगावेसे वाटते की महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अभिमानास्पद कामगिरी आहे. या मान्यतेमुळे जागतिक स्तरावर आपल्या दुर्गसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे केवळ ऐतिहासिक स्मारक नसून ते प्रेरणास्थान आहेत. या निर्णयामुळे या किल्ल्यांचे संवर्धन आणि जागतिक पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मोठा हातभार लागेल. ही ऐतिहासिक घडी शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना आणि सर्व भारतीयांना अभिमानाची आहे. आम्ही शासन आणि युनेस्कोचे मनापासून आभार मानतो आणि या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहोत." अशी प्रतिक्रिया प्रहारचे जनशक्ती पुणे जिल्हा उपाअध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद  क्षण आहे. गड - किल्ले संवर्धन ही एक अशी महत्वपूर्ण बाब आहे की आपल्या पूर्वजांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कायम समजत रहावा म्हणून त्यांचे जतन आणि त्याचा वारसा हा जपला गेलाच पाहिजे.अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांची योग्य काळजी घेत, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास, सामाजिक जाणीव जागृती, जनसमुदाय सहभाग, कायदेशीर संरक्षण, शिक्षण आणि जनजागृती, तंत्रज्ञानाचा वापर, नियम आणि योजना, योग्य विचार व योग्य अंमलबजावणी केल्यास आपला महाराष्ट्र हा कायम एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून जगामध्ये नावलौकिक कमवत राहील" अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचा, महान पराक्रमाचा व महान गड - किल्ल्यांचा गौरव जगप्रसिद्ध युनेस्कोने केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केल्यामुळे जगभरातील लाखो - करोडो शिवभक्तांची मान अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा, भारतातील प्रत्येक भारतीय माणसाचा जगभरात सन्मान वाढवणारा ही गौरवास्पद क्षण आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच गड - किल्ल्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करून, जगभरातील लाखो पर्यटक महाराष्ट्रातील शेकडो गडकिल्ले पाहण्यासाठी यावेत यासाठी गडकिल्ल्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्राची महान संस्कृती व महान इतिहास जगभरात पोहचण्यासाठी सरकारने व तरुण पिढीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगातील कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवण्यासाठी तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन, जिद्दीने चिकाटीने, निष्ठेने काम केले तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उच्चतम पातळीवरती निश्चितच पोहोचू शकते. 

"भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने देशभरातील व महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास, महान जीवनकार्य एक चांगले शैक्षणिक धोरण म्हणून  शिकवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो गड - किल्ल्यांचे संवर्धन राज्य सरकारने, भारत सरकारने, महाराष्ट्रातील लाखो - करोडो शिवभक्तांनी एकजुटीने करणे गरजेचे आहे."

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या विविध सामाजिक संघटना गड - किल्ले संवर्धनाचे खूप चांगले काम करत आहेत. सरकारने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहाणे खूप गरजेचे आहे.