Wednesday, January 29, 2025

"ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष,भारतातील केमिस्ट शिलेदारांचे आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विश्वविक्रमी रक्तदान; एका दिवसात देशभरातून ७५ हजारांवर बाटल्यांचे संकलन, केमिस्ट शिलेदारांचा प्रेरणादायी महासंकल्प, पुरंदरच्या केमिस्ट शिलेदारांनी आयोजित महारक्तदान शिबिरातही उत्स्फूर्तपणे रक्तदान"....

पुरंदर, सासवड,दि.२९ : रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीचा खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देशभरातील केमिस्ट शिलेदारांनी एका दिवसात 75000 रक्ताच्या बाटल्या संकलित करून, भारतीय समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. भारतीय आरोग्य व्यवस्थेसमोर रक्ताची कमतरता ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. आजही आपल्या भारतात रुग्णांना उपचाराप्रसंगी रक्त मिळत नाही यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.

ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, केमिस्ट बांधवांचे आधारस्तंभ,मा. आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी देशभरातील केमिस्ट बांधवांच्या कल्याणासाठी मागील 40 वर्ष सातत्याने केलेल्या प्रामाणिक कार्यामुळे त्यांच्या कार्याला एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी देशभरातील हजारो केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून 75000 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करून देशभरात एक मोठा विश्वविक्रम करून, समाजाला दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम राबवलेला आहे.

एक आपत्कालीन, सामाजिक, नैतीक गरज डोळ्यासमोर ठेवून हा भव्य - दिव्य उपक्रम संघटनेने हाती घेतला. भविष्यात देशामध्ये अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्धभवली आणि मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासल्यास देशातले सर्व केमिस्ट मोफत रक्तदान करून ही परिस्थिती योग्य प्रकारे पूर्ण करतील यासाठीच हा महासंकल्प हाती घेतला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

संपूर्ण देशात दिनांक 24 तारखेला एकाच वेळी रक्तदान करण्याचा उपक्रम हाती घेऊन केमिस्ट बांधवांनी समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.  पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट संघटनेच्या वतीने या महारक्तदान शिबिराचे सासवड, जेजुरी, निरा येथील सर्व केमिस्ट बंधू, भगिनींनी आयोजन केले. 

या शिबिरात पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, तरुण शिलेदार, सामाजिक कार्यकर्ते,महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.याप्रसंगी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, श्री राम कारंडे आणि सर्व आरोग्य अधिकारी यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. 

जेजुरी शहरात डॉ कैलास सुपेकर पुरंदर तालुक्याचे जिल्हा कार्यकारी सदस्य धैर्यशील शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.तसेच निरा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास कदम आणि डॉ अजय निगडे यांनी या शिबिरात मोलाचे सहकार्य करून जास्तीत जास्त रक्तदान करून घेतले.

संघटनेचे उपाध्यक्ष योगेश जठार, दत्तात्रय कर्णावर, राजेंद्र भोईटे, निखिल काकडे, नरेंद्र जैन यांनी जनजागृती करून  मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. 

पुरंदर मेडिकल असोसिएशन वतीने अध्यक्ष डॉ प्रविण जगताप, डॉ सचिन निरगुडे, डॉ वृषाली जगताप, डॉ अश्विनी जगताप यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.सध्या आपल्या देशात रक्त पुरवठा खुप कमी झाला आहे त्याअनुषंगाने संपूर्ण पुरंदर तालुक्यात सर्व केमिस्ट बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

पुरंदर तालुका  केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधी श्री धैर्यशील शिंदे, श्री बाळासाहेब भिंताडे, सौ शुभांगी जगताप(महिला जिल्हा कार्यकारी सदस्या),ज्येष्ठ सभासद श्री कृष्णा शेट्टी, तालुका अध्यक्ष श्री सुकुमार नाझीरकर,मा नगरसेवक श्री नंदकुमार जगताप, सौ उर्मिला जगताप, श्री भूषण ताकवले , श्री निलेश डाकले, श्री संतोष ढमाळ तसेच

श्री विराज सस्ते, श्री सुमित जगताप, श्री अजित शेंडकर, श्री सागर सस्ते, श्री संदिप घारे, श्री मनोज जगदाळे, बाबुराव जगदाळे, अवधुत जगताप,सौ सुवर्णा रनणवरे,सौ ललिता जगताप,सौ तनुजा पाटील,माया शहा, सौ तृप्ती बोराडे,सौ तृप्ती संदेश गायकवाड,श्री विक्रम खामकर तसेच

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

श्री नितीन नाझीरकर, श्री रामदास कदम, श्री निखिल काकडे, श्री मनोहर क्षीरसागर , श्री मायदेव, श्री चेतन डाकले यांनी या रक्तदान महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. पुरंदर तालुक्यात सामाजिक वारसा जपत वज्र पुरंदर ग्रूपने सर्वात जास्त सहभाग नोंदवला. अध्यक्ष मा नगरसेवक संदिप राऊत, उपाध्यक्ष योगेश आबा जगताप, नाना कुंभारकर, जितेंद्र कामथे, विजय काळे, अतुल निगडे, गणेश चौरे, बाबासाहेब पिलाने, बाबू कुंभार, चकित जगताप, योगेश कोलते यांनी रक्तदान करून सहकार्य केलं.

"महारक्तदान शिबिरामध्ये सर्व केमिस्ट, फार्मासिस्ट व सहकाऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेत, हे रक्तदान शिबिर यशस्वी केले.या रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने तळागाळातील बांधवांकडून रक्तदान चळवळ राबवली तसेच सर्व ग्रामीण व शहरी भागातील सर्व सभासदांनी आप्पासाहेब व संघटनेवर दाखवलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शतशः आभारी आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा रक्तदानाचा उच्चांकी आकडा गाठून विश्वविक्रम करत आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वर प्रचंड प्रेम दाखवत देशाप्रति निष्ठा जपली आहे. प्रतिकूल परिस्थिती व संघर्षातून देशव्यापी सर्व समावेशक नेतृत्व अप्पासाहेबांच्या रूपाने आपल्याला लाभले. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, केमिस्ट, फार्मासिस्ट ,सभासद, सहकारी, मित्रपरिवार यांनी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल त्या सर्वांना लाख लाख धन्यवाद व सर्वांचे मनापासून आभार." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी धैर्यशील शिंदे यांनी दिली.

"पुरंदर तालुक्यातील महारक्तदान शिबिरात  आमच्या संघटनेचा प्रत्येक सभासद मनापासून रक्तदान करण्यासाठी प्रयत्न करत होता. ग्राहक हा आपला अन्नदाता आहे ही भावना मनात ठेवून आपल्या अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी आलेली ही संधी साधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता. प्रत्येक सभासद आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ जगन्नाथ आप्पा शिंदे यांचा देशात गौरव वाढवण्याचा अंतःकरणा पासुन झटत होता. या महारक्तदान शिबिरात 90 % रक्तदान हे केमिस्ट व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केले आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान.रक्तदान केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानणे म्हणजे ती खुप छोटी गोष्ट ठरेल. पुरंदर तालुक्याच्या वतीने सर्व  रक्तदात्यांना समाजसेवेचा लाल सलाम" अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका ड्रॅगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष, माजी नगरसेवक नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशन समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.

रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.

Thursday, January 23, 2025

"महाराष्ट्राच्या विकासासाठी १५.७० लाख कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार; टाटा समूह ३०००० कोटींची गुंतवणूक करणार, रिलायन्स व ॲमेझॉन उद्योगसमूह महाराष्ट्रात करणार 'इतक्या' लाख कोटींची गुंतवणूक; लार्सन अँड टुब्रो कंपनीची 'इतक्या' हजार कोटींची गुंतवणूक"...

दावोस, दि. 23 :  दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने  दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.


बुधवारी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान  दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार झालेले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या जागतिक आर्थिक परिषदेत भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच श्री. शर्मा यांनी केले.


मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.


टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.


सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे : -

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली


2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी


3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200


4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर


5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली


7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर


8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड


9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे


10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर


12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर


13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर


14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर


15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000


17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे


18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000


19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर


20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300


21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : नागपूर


22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 24,437 कोटी

रोजगार : 33,600

कोणत्या भागात : रत्नागिरी


23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : 30,000 कोटी


24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : 10,000 कोटी


25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 15,299 कोटी

रोजगार : 4000


 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 15,000 कोटी

रोजगार : 1000


27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 6500 कोटी

रोजगार : 1300


28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: 20,000 कोटी

रोजगार : 20,000


29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक: 3000 कोटी

रोजगार : 1000


30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण.


दि. 21 जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

एकूण रोजगार : 1,53,635.


दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार : -

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: 3,05,000 कोटी

रोजगार : 3,00,000


32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 10,319 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात : चंद्रपूर


33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : 42,535 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : नागपूर


34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : 21,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : रायगड


35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: 10,200 कोटी

रोजगार : 3000

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: 8641 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 1039 कोटी

रोजगार : 450

कोणत्या भागात : अहिल्यानगर


39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : 10,000 कोटी

रोजगार : 2500


कोणत्या भागात : तळेगाव

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: 450 कोटी

रोजगार : 1100

कोणत्या भागात : एमएमआर

 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : 12,780 कोटी

रोजगार : 2325

कोणत्या भागात : नागपूर


42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : 14,652 कोटी

रोजगार : 8760

कोणत्या भागात : नागपूर


43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : 300 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : जालना


44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 5000 कोटी

रोजगार : 1300

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र


45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : बुटीबोरी

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 1200

कोणत्या भागात : अहिल्यानगर


47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 51,600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 8600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर


50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : 71,795 कोटी

रोजगार : 83,100

कोणत्या भागात : एमएमआर


 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर


52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर


53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर


दि. 22 जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी. एकूण रोजगार : 15.75 लाख.


महाराष्ट्रातील तरुण पिढी हुशार, मेहनती व वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणारी आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी चांगली रोजगार निर्मिती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

बेरोजगारी हा भारतातील तरुण पिढीसमोर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील मोठ - मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली तर निश्चितच महाराष्ट्रातील तरुण पिढीला त्याचा फायदा मिळेल.

Sunday, January 5, 2025

"बीडचे सरपंच संतोष देशमुख क्रूर हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ पुण्यात विराट जनआक्रोश मोर्चा; 'बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान करून ठेवलाय, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि आमच्या मुलाला न्याय द्या' : आमदार सुरेश धस"

पुणे, दि.५ : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात जनक्षोभ उसळलेला आहे. महाराष्ट्राच्या समाजमनाला काळिमा फासणारी ही खूप क्रूर व अमानवी हत्याकांडाची घटना आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या  घटनेनंतर राज्यात जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. परभणीच्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच बीडच्या संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. पुणे शहरात आज झालेल्या विराट जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो लोकांनी सहभागी होऊन, या क्रूर घटनेचा संताप व निषेध व्यक्त केला व या संतोष देशमुख हत्याकांड घटनेतील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी ही मागणी केली.

या बीडच्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरून  राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राजकीय वर्तुळासह राज्यभरातून होत आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीड, बुलढाणा, परभणीनंतर आज रविवारी पुणे शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

पुण्यातील या जनआक्रोश मोर्चावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी या मोर्च्यात सहभाग दर्शवत मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्व, राजकारण या विषयांवरून मंत्री धनंजय मुंडे व बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले व बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप असलेल्या वाल्मीक कराडवर कडाडून प्रहार केला.

इतकंच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं." ‘वाल्मिक कराड आण्णा उर्फ आक्का 17 मोबाईल नंबर वापरतात. बीडच्या एसपी आणि सीआयडीच्या आयजींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून 17 मोबाईल नंबर वापरतात. हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब झाले आहे. त्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी कोणाकडून किती माल घेतला, याचे सगळे पुरावे 17 मोबाईल मध्ये सापडतील’ "असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 

पुढे सुरेश धस असेही म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो… "अजित दादा फार प्रामाणिक माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि ते कधीच चुकीच्या लोकांना मदत करणार नाही. राष्ट्रवादीत 2005 पासून 2015 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. 

"मी त्यांच्याबरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्यापाशी."असा सवालही आमदार सुरेश धस यांनी केला तर हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली तर मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल." असं आव्हान देखील सुरेश धस यांनी दिलं.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं. "

"बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय" अशी जहरी टीका आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील जनआक्रोश मोर्चात केली केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

"संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, "माझा रंगही काळा आहे. तुम्ही म्हणाल तर घाना देशात जाऊन राहतो. पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?"

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी  केली. 

सुरेश धस म्हणाले की, "मी अजितदादावर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. ते लायकवान माणसं नाहीत. अजितदादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे ते. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्यता समोर येईल."

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"तो सूरज चव्हाण माझ्यावर बोलला. अरे तो अजून बालवाडीतही नाही. तुम्ही काय बोलायचं ते बोला, मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. मला संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवायचं नाही. "असे आमदार सुरेश धस म्हणाले.

"फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण अठरापगड जाती या संतोष देशमुख यांच्यासोबत आहेत. वंजारी समाजातील काही लोक सोडली तर सगळ्यांना ही गोष्ट पटली नाही. तुम्ही जाती-जातीत का अंतर पाडताय? एखादी जात आम्ही टार्गेट करत नाही. त्या जातीतील चुकीचे नेतृत्व करत आहेत त्यांना सोडायचं नाही." असं सुरेश धस म्हणाले.

याच जनआक्रोश मोर्चातून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी आकाचा आका कोण? असा सवालही अरविंद शिंदे यांनी केला. 

"पुण्यातील जनआक्रोश मोर्चावेळी काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना थेट संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांसह धनंजय मुंडे यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली आहे. ‘मराठा समाज हा न्याय देण्याच्या भूमिकेत होता, आज तो समाज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला आहे. हे कुणी केली? त्या आकाचा आका कोण? त्यालाही रस्त्यावर आणलं पाहिजे आणि मारेकऱ्यांसह, धनंजय मुंडे यांचाही सहभाग असेल तर यांनाही फाशी झाली पाहिजे’, अशी मागणीही अरविंद शिंदे यांनी  यावेळी केली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडानंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावरती येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाले पाहिजे. अशा भावना महाराष्ट्रातील लाखो लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण  गांभीर्याने घेऊन, या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी योग्य ती पावले लवकरात लवकर उचलणे गरजेचे आहे.