Sunday, September 19, 2021

पुरंदर तालुक्यातील "या" गावातील 'शाळकरी मुलांच्या मंडळाने' "केदारनाथ मंदिर" हा आकर्षक देखावा सादर करून जिंकली गणेशभक्तांची मने; पहा "केदारनाथ मंदिर" या आकर्षक देखाव्याचा व्हिडिओ या खास बातमीत...

 


पुरंदर,वीर, दि.19 : - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावातील बहुतांश शाळकरी मुले असलेल्या शिवतेज मित्रमंडळ वीर - समगीरवाडी  येथील  या  मंडळाने यंदा "केदारनाथ मंदिर" हा आकर्षक देखावा सादर करून गणेशभक्तांची मने जिंकली.  या हलत्या देखाव्यात महादेवाच्या पिंडीवरून पडणारे पाणी व खाली केदारनाथ मंदिर असे सुंदर दृश्य असून हा सुंदर देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरला आहे.




हा देखावा उभारण्यासाठी जेमतेम गोष्टी वापरल्या असून, निरुपयोगी पुठ्ठे, बारदाना, शाडूमाती इत्यादी कमीत कमी साहित्यात लहान मुलांच्या मदतीने हा देखावा उभारण्यात आला. 


Flipkart...Best Offer... Headphones Under Rs 499 Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                              Buy Now


"केदारनाथ मंदिर" या आकर्षक देखाव्याचा व्हिडिओ : - 




"हिमालयाच्या पायथ्याशी असलेले "केदारनाथ धाम" हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. पौराणिक ग्रंथांमध्ये या धामशी संबंधित अनेक कथा सापडतात. महादेवांनी स्वतः येथे पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला होता, म्हणूनच हिंदू धर्मात केदारनाथ हे मोक्षस्थळ मानले जाते."


"खेडोपाड्यातील लोकांना या तीर्थक्षेत्राला जाता येत नाही म्हणून शिवतेज मंडळाने ही संकल्पना अमलात आणली आहे. या पूर्वी कैलास पर्वत, महाभारत यासारखे देखावे या मंडळाने साकारले होते. गेल्यावर्षी वीर धरणाचा हलता देखावा सादर केला होता." अशी माहिती शिवतेज मित्रमंडळाचे  मार्गदर्शक अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




गणेश उत्सवाच्या निमित्ताने शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना विरंगुळा म्हणून शिवतेज मंडळ दरवर्षी नेहमी आग्रही असते. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                Buy Now

हा देखावा उभारण्यासाठी मोठ्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी असणारी शाळकरी मुले : -


स्वयम समगीर - इयत्ता ६ वी

ओम समगीर - इयत्ता ७ वी

आयुष समगीर - इयत्ता ९ वी

रोहित समगीर - इयत्ता १० वी

अक्षय समगीर - इयत्ता ८ वी

ईश्वर समगीर - इयत्ता ३ री


लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेश मंडळांनी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शाळकरी मुलांच्या पंखांना बळ देणे गरजेचे आहे.



BIG BAZAAR BIG SAVING SALE... Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                Buy Now





Wednesday, September 15, 2021

"सगळं तुमच्या तुम्ही करा.नांगरा,कोळपा, पेरा, धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या; कोणाच्या सुपीक डोक्यातुन ही कल्पना निघाली म्हणायची ई पीक नोंदणी;" 'सोलापूरच्या संतप्त शेतकऱ्याने' सरकारच्या 'ई पीक पाहणी' उपक्रमाविषयी मांडली व्यथा....

 


पुणे, दि.15 : - महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई पीक पाहणी उपक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांची नोंदणी ई पिक पाहणी या ॲप वर करत असताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, कामगार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई पीक पाहणी अंमलबजावणी करण्याकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करु नये तसेच शासकीय यंत्रणेद्वारे पीक पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. 




सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी शिवाजी हळणवार यांनी सरकारच्या "ई पीक पाहणी" उपक्रमाबद्दल रोखठोक मत व्यक्त करून आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे रोष व्यक्त केला आहे.




सोलापूरचे प्रगतशील शेतकरी शिवाजी हळणवार यांचा ई पीक पाहणी या सरकारच्या उपक्रमाबाबतचा अनुभव व रोखठोक प्रतिक्रिया  : - 


"सरकारने परवा परिपत्रक काढल.१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान शेतात जा. मोबाईल काढा. त्यावर E - पीक पहाणी ॲप डाऊनलोड करा. त्यात माहिती भरा. सुरुवातीला आलेला ४ अंकी OTP कायमचा लक्षात ठेवा. कोणतं पीक आहे हे त्यात लिहा.पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा.तलाठी ( भाऊसाहेब ) हे काम करणार नाहीत...!!


   "सगळ तुमच्या तुम्ही करा...!'नांगरा कोळपा,पेरा ,धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या...!!कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली म्हणायची. ई पीक नोंदणी ...तरीपण शासनाच्या विरोधात जायचं नाही म्हणून" ....


  "सकाळी सहा वाजता शेतात गेलो. मोबाईल काढला. ई पीक पाहणी ॲप  डाऊनलोड केलं. आणि माहिती भरायला सुरुवात केली.ओटीपी आला पटकन डायरीत लिहून घेतला .आमच्या जन्मतारखा आमच्या लक्षात राहत नाहीत. पण हा ओटीपी आता कायमचा लक्षात ठेवायचा. त्यानंतर माहिती भरायला सुरुवात केली." 

     

 "नाव ,गाव, गट नंबर, सर्वे नंबर सगळ टाकून झालं.टोमॅटो ( लालचिखल)सोबत उभारून फोटो काढला (दर नसल्याने २ एकरावर रोटर मारला ,जे दिसतंय ते उद्या रोटरतोय ,तो भाग वेगळा) पण डाउनलोड होईना कारण रेंज नव्हती .आता ही तक्रार कोणाकडे करायची. ? भर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रेंज आली."




    "शेतात ५-६ तास थांबून रेंज येत नसेल तर शेतकऱ्यांनी शेतीची काम ठेवून हेच करत बसायचं का ? मग प्रशासन काय काॅग्रेस, गवत उपटणार आहे का...? मन उद्विग्न करणारे प्रसंग समोर येतात जर ही माहिती नाही भरली तर .आपल्याला ७/१२ मिळणार नाही .आपल्याला विमा मिळणार नाही (तसा तो ३ वर्षांपासून मिळतच नाही)...आपल्याला कोणतीही शासकीय योजना राबवता येणार नाही."...! (शेतकऱ्यांसाठी योजना फक्त कागदावरच असतात म्हणा....)




      "या देशात शेतकरी म्हणून जन्माला आलो हा आमचा दोष आहे का ? त्यांनीच दिलेल्या 02025712712 या हेल्पलाईन नंबरला फोन लावला फोनच लागत नाही . भारत हा शेतीप्रधान देश म्हणून डंका पिटला जातो. आता नेमकं मी काय करायचं ,मी सुद्धा हतबल झालो आहे. माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांची ही अवस्था तर सामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं?


 असा सवाल प्रगतशील शेतकरी शिवाजी हळणवार यांनी राज्य सरकारला विचारून शेतकरी वर्गाची  व्यथा मांडली आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                    Buy Now


राज्य सरकारच्या ई पीक पाहणी उपक्रमाचा उद्देश चांगला असला तरी राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून राज्य सरकारने शेतकरी हिताचा योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.



BIG BAZAAR BIG SAVING SALE... Hoto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                Buy Now









Tuesday, September 7, 2021

"महाराष्ट्रातील "या" आदर्श शिक्षकाने 'कोरोना विधवांच्या मुलांना' मदतीची हात देऊन साजरा केला आगळा वेगळा 'शिक्षकदिन'; बारामतीच्या आदर्श शिक्षकाचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम"....



बारामती, दि. 7 : - कोरोना महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून समाजातील दुर्लक्षित घटकांना, पीडित घटकांना मदत करणारे फार कमी लोक आज समाजात आहेत. दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षक वेगवेगळे उपक्रम करत असतात. कोरोना विधवांच्या प्रश्नावर संवेदनशील असणारे, सामाजिक जबाबदारीचे भान कृतीतून दाखवून देणारे  बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांनी यावर्षी कोरोना विधवांच्या कुटुंबांला मदतीचा हात देऊन सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून शिक्षक दिन साजरा केला. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                   Buy Now

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मराठी विद्यालयात लक्ष्मण जगताप शिक्षक म्हणून  कार्यरत आहेत. शिक्षक दिना दिवशीच लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस असतो. प्रत्येक वर्षी या दिवशी बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून शिक्षक दिन व त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात. 



यावर्षीचा वाढदिवस व शिक्षक दिनाचे औचित्य लक्षात घेऊन त्यांनी अतिशय गरीब कुटुंबातील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी  तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० रुपयांची ठेव पावती दिली. त्यातून या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाला मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भिगवन येथील प्रसाद धनाजी घोरपडे. बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील प्राची राजेंद्र जगताप व बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिमटेक येथील शंभू दादा खंडाळे  या ३ विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला.




"या मुलांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची आई मजुरी करते. हे विद्यार्थी बालमजुरीत ढकलले जाऊ नयेत व किमान त्यांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी यासाठी लक्ष्मण जगताप  यांनी हा निर्णय घेतला. कोरानातील उध्वस्त झालेल्या कुटुंबांना शिक्षक दिनाच्या दिवशी व आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी ठेव पावती ची मदत करणारे लक्ष्मण जगताप सर हे शिक्षक नव्हे तर समाज शिक्षक आहेत. त्यांच्या  या कृतीला करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वंदन. अशीच भूमिका समाजातील सर्वांनी घेतली तर कोरोनात उजाड झालेले संसार नक्कीच सावरले जातील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली.


Flipkart...Best Offer... Headphones and Speakers Upto 80% Off...Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                     Buy Now

"प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस व शिक्षक दिन आम्ही साजरा करत असतो. समाजातील गरजू व्यक्तींना मदत मिळावी हा प्रामाणिक उद्देश असतो. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच  मदत करत असतो अशी प्रतिक्रिया बारामतीचे आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


समाजातील गरजू व पीडित घटकाला सर्वांनीच मदत करणे गरजेचे आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस व शिक्षक दिन साजरा करणे कौतुकास्पद व प्रेरणादायी उपक्रम आहे.


Ajio Fashion Brand...Best Offer... Get 8 T-Shirts @ Rs 135 Each.... HERE'S HOW:
Add 8 T-shirts To Cart Worth Rs 196 to Rs 200 Use  Code: SUMMER2021 to get Flat Rs 500 Off + Free Shipping SHOP NOW For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                      Buy Now







Monday, September 6, 2021

"महाराष्ट्रातील 'कोरोनाची तिसरी लाट' रोखण्याच्या उपाययोजनांबाबत आयोजित "माझा डॉक्टर" वैद्यकीय परिषदेत "या" तज्ज्ञांनी मांडल्या मार्गदर्शक सूचना; कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी "या" गोष्टींची 'दक्षता' घेण्याचे केले आवाहन"...

 


मुंबई, दि. 6 : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज  ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.


कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


… तर कोविड पसरण्याची शक्यता – डॉ. मेहुल मेहता

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.



Flipkart...Best Offer... Deos Starting at Rs 105 Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                 Buy Now



प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घेण्याची गरज - डॉ. संजय ओक

संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.




दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.  दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.



Ajio Fashion Brand...Best Offer... Upto 90% Off | Starting at Rs 49 SHOP NOW For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                     Buy Now


प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी - डॉ. शशांक जोशी

मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली.  राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.



BIG BAZAAR Sabse Badi Savings: 2L Oil Free on Orders over Rs 3000 Shop Now!  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                     Buy Now                                 


लक्षणे दिसताच चाचणी करा - डॉ. राहुल पंडित

फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.



Flipkart...Best Offer... Headphones and Speakers Upto 80% Off...Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                           Buy Now


कोविडपश्चात जीवनशैली चांगली ठेवा - डॉ. अजित देसाई

डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.


Ajio Fashion Brand...Best Offer... Get 8 T-Shirts @ Rs 135 Each.... HERE'S HOW:

Add 8 T-shirts To Cart Worth Rs 196 to Rs 200 Use  Code: SUMMER2021 to get Flat Rs 500 Off + Free Shipping SHOP NOW For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                            Buy Now


पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण- डॉ. सुहास प्रभू

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.



Flipkart...Best Offers... Upto 80% Off Across Categories

Limiter Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                 Buy Now


ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.