Thursday, June 30, 2022

"महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी,राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही"

 


मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं सत्तासंघर्ष, राजकीय नाट्य आज अखेर संपलं आहे. आज महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ शिंदे  यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री  म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीला फाटा देत एकनाथ शिंदे यांनी आज अखेर भाजपशी घरोबा  करत नवं सरकार स्थापन झालं आहे. राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.




महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शनिवारी 2 जुलैला शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल.




एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.




राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिली.




मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"मुख्यमंत्री पदावरुन जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना विश्वासात घेऊन राज्याची पुढची वाटचाल करणार असल्याचे" सांगून श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देण्यात येईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश अशा राज्याच्या सर्वच भागांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 




हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका व राज्याचा विकास या अजेंड्यावर राज्याची पुढील वाटचाल असेल, असेही श्री.शिंदे पुढे म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक-पाणी, जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प आदी विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


समृद्धी महामार्ग राज्याचा गेमचेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी सुरु केलेली जनहिताची कामे पुढे नेण्यात येतील, असेही ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.


Wednesday, June 29, 2022

"महाराष्ट्रात सत्ता संघर्ष चालू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतले "हे" १० मोठे निर्णय; वाचा सविस्तर हे महत्त्वपूर्ण निर्णय"....

 


मुंबई, दि.२९ : आज बुधवारी संध्याकाळी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा देणारे दहा महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत. महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झालेला असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने जनतेसाठी दहा महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.





१)औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता 


औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now




२)नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर  सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.


नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.





३)नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार


निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये झालेल्या निर्णयामुळे बाधित उमेदवारांना संरक्षण देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द केले होते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



४)राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र


राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या  समितीने केलेल्या शिफारशींना तत्वत: मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यामध्ये  मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रʼ कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.




५)अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता


अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या 4 हजार 805 कोटी 17 लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास आज बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा 2 हजार 402 कोटी 59 लाख रुपयांचा 50 टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने देण्यात येईल.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now



६)कर्जत येथे दिवाणी न्यायालय स्थापण्यास मान्यता

 


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


या न्यायालयासाठी 16 नियमित आणि 3 बाह्य यंत्रणेद्धारे 19 पदे निर्माण करण्यात येतील. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी एक कोटी 23 लाख 57 हजार 834 इतका खर्च येईल.  सध्या कर्जत व जामखेड येथील प्रकरणे श्रीगोंदा न्यायालयाकडे सुरु असून कर्जत ते श्रीगोंदा हे अंतर 45 कि.मी. असून जामखेड ते श्रीगोंदा हे अंतर 90 कि.मी. आहे त्यामुळे पक्षकारांची गैरसोय होते.




७)विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठित करणार

 


राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


ही मंडळे पुर्नगठित करण्यासंदर्भातील विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल.  सध्याच्या मंडळाचा कालावधी 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला आहे.




८)ग्रामीण भागात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार


राज्यातील ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


राज्यातील ग्रामीण भागात 20 लाभार्थ्यांकरिता एक वसाहत निर्माण करण्यात येईल.  प्रत्येक वसाहतीस अंदाजे 88.63 लाख खर्च येईल.  या वसाहतींना सर्व नागरी सुविधा असतील.  10 कुटुंबांकरिता प्रति वसाहतीसाठी अंदाजे 44.31 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी 1.20 लाख रुपये निधी अनुज्ञेय असेल.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थी निवडेल.  या आर्थिक वर्षात वसाहतीकरिता तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी 30 कोटी रुपये इतका निधी लागेल.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now



९)जमीन भोगवटादार रुपांतरण अधिसूचनेस दोन वर्षांची मुदतवाढ


वाणिज्यिक किंवा औद्योगिक जमिनीच्या भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतरणाबाबतच्या अधिसूचनेस दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


या निर्णयानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०१९ " यामध्ये ११ सुधारणा करुन भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीचे रुपांतर वर्ग-१ मध्ये करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस ०७ मार्च,२०२२ पासून दोन वर्षाची मुदतवाढ मंजूर करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.




१०)बांद्रा शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या सदनिकांसाठी भूखंड


बांद्रा येथे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मालकी हक्काच्या सदनिका देण्यासाठी भूखंड उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


या सदनिकांसाठी भूखंड उपलब्ध व्हावा अशी परिवहनमंत्री अनिल परब यांनी विनंती केली होती.  यानुसार सदरील प्रस्तावास तत्वत: मान्यता देण्यात आली.


महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा पेच निर्माण झालेला असताना आजच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने जनतेला दिलासा देणारे 10 महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.


Sunday, June 26, 2022

"आरक्षण देणारा पहिला राजा, समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज" - प्रसिद्ध इतिहास संशोधिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख...

 


"आरक्षण देणारा पहिला राजा, समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज" 


२६ जुन १८७४ रोजी  राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला. शककर्ते शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी स्वराज्य रक्षणासाठी झुंज दिली. यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सतत सात वर्षे राजा व खजिन्यात संपत्ती नसताना लढा दिला. याच शूर महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. 




कोल्हापूरच्या राज्यावर चौथे शिवाजी राजे यांचे दत्तक वारस म्हणून श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंतराव उर्फ बाबासाहेब हे सन १८८७ मध्ये संस्थांनचे  अधिपती झाले .छत्रपतींच्या गादीवर शाहू महाराजांचे आगमन ही घटना अतिशय सदभाग्याची  ठरली .राजकोट येथे चार वर्षे राजकुमारांच्या महाविद्यालयात व त्यानंतर त्यांचे गुरु व पालक 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


सर एस .एम .फ्रेजर यांच्याकडे त्यांचे राज्यकारभाराचे शिक्षण घेतल्यानंतर शाहूराजांनी कोल्हापूर संस्थांनच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. 




राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच शाहूराजांनी खेडोपाडी जाऊन प्रजेच्या व शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली . शेतकऱ्यांची स्वतः माहिती करून घेऊन त्यांची गार्‍हाणी ऐकून ती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला..शेतकऱ्यांच्या व प्रजेच्या परिस्थितीची चौकशी करणारे  हे पहिले छत्रपती होय. आधुनिक शेती व औद्योगिक विकासावर त्यांची श्रद्धा होती. या देशातील शांतता, प्रगती ,भरभराट या सर्व गोष्टी शेतकरी मागासवर्गीय व दलित वर्ग यांच्या उन्नती वरच अवलंबुन आहेत असे त्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी पाटबंधाऱ्यांच्या कालव्याच्या योजना केल्या. 




शेती विकासासाठी आजचे राधानगरीचे प्रचंड मोठे धरण बांधले,मोठमोठ्या सहकारी पतपेढ्या स्थापून शेतकर्यांना व कामगारांना आर्थिक सहाय्य करणे यावर महाराजांचा प्रचंड विश्वास होता.या प्रचंड कार्यामुळेच त्यांना "हिंदुस्थानातील हरितक्रांतीचे जनक म्हणतात. "कोल्हापूर येथे शाहूपुरीत स्वतंत्रं गुळाची व्यापार पेठ त्यांनी वसवली .

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मुंबईच्या व्यापार्‍यांना व्यापार करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. सहकारी पतपेढ्या सुरू करून  त्यांना अर्थसहाय्य केले. शेतकरी व कामगार सावकारी पाशातून मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.ज्ञान हे शक्तीचे समृद्धीचे उगमस्थान आहे हे जाणणारे शाहु हे पहिले राजे होते. म्हणून त्यांनी शेतकरी ,दुर्बल ,निरक्षर ,मागासवर्गीय, दलित या बहुजनात शिक्षण प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणात केले. 




राज्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळा काढल्या .त्यांनी ५०० ते १०००   लोकवस्तीच्या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय केली .प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले .त्यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला. जात-पात व धर्म लक्षात न घेता  शिक्षणासाठी प्रवेश देण्यात  येऊ लागले .त्याचा फायदा दुर्बल घटकांना होत नाही हे लक्षात येताच मराठा, मुस्लिम,जैन लिंगायत ,सोनार ,सुतार शिंपी व  मागासवर्गीय विविध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली.




त्यांना खर्चासाठी अनुदान दिले .गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी खुला केला. इतकेच नव्हे तर मराठा विद्यार्थी वस्तीगृहात मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना सामावून घेऊन त्यांनी जातीची बंधने दूर केली .आपल्या संस्थानच्या  बाहेर पुणे नगर ,नाशिक ,अमरावती ,पंढरपूर येथे विद्यार्थी वस्तीगृह स्थापून त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


प्रजेच्या शिक्षणाबाबत एवढे प्रयत्न केलेले राजर्षी शाहू हे एकमेव राजे होते. समाजातील सर्व थरांना जागृत करून त्यांना समतेचा लढा देऊन कार्यकरत्यांना स्फुर्ती  देणारा हा राजा होय.अस्पृश्यांना त्यांनी  सरकारी नोकऱ्या दिल्या .सरकारी नोकरीत मागासवर्गीयांसाठी त्यांनी ५०  टक्के  जागा त्यावेळी राखीव ठेवल्या.सरकारी कचेरीत,रुग्णालयात अस्पृश्यांशी समतेच्या भावनेने न वागणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांनी राजीनामा देऊन जाणे विषयी सांगितले .वतने नष्ट केली .गुन्हेगार जातीची हजेरी बंद केली. 


छत्रपती शाहू राजांनी केलेली सामाजिक क्रांती अपूर्व होती .असे सामाजिक क्रांती करण्याचे धैर्य भारतात कोणत्याही राजाने दाखवले नव्हते. प्रस्थापित व पददलित यांच्यातील अंतर कमी करण्याचे कार्य शाहू राजांनी केले .गरिबांचे व दलितांचे दुःख पाहून ज्यांचे हृदय पिळवटून निघे अशा मोजक्या समाज क्रांतीकारकांपैकी पैकी शाहू राजे होते.विधवा  विवाह ,आंतरजातीय विवाह याबद्दल त्यांनी प्रयत्न केले. 




मराठा व धनगर,तसेच हिंदू व जैन यांच्या विवाहास त्यांनी मान्यता दिली व विवाह घडून यावेत यासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांवरील अत्याचार होताच त्यांचे मन रागाने भडकून उठे. बालविवाह ,बहूविवाह चाल ,मद्यपान स्त्रियांना शिक्षणास प्रतिबंध अशा कालबाह्य रूढीवर ते कडाडून हल्ला करीत. काही स्त्रियांना त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. धर्म,राजनीती  व समाज या तिन्ही मध्ये आपल्या विचारांनी व कृतीने शाहू महाराजांनी मोठी क्रांतिकारक उलथापालथ केली. त्यांनी केलेल्या मेहनतीची मशागतीची फळे शेती, उद्योग ,सहकारी चळवळ ,पुरोगामी समाजव्यवस्थेत आपण आज पहात आहोत.


शाहू राजांचे व्यक्तिमत्व मोठे विलोभनीय होते.त्यांच्या शांत व कनवाळू चेहर्यात मानवतेचे दर्शन होई. त्यांच्या आठवणीने जनता भारावून जात असे.त्यांचे मोठेपण साधेपणाने शोभून दिसत होते.ते राजर्षि होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर त्यांनी गरिबांच्या ,दलित पीडितांच्या ह्रदयात आशेचा दिवा पेटवला.सर्व समाज बरोबर घेऊन जाण्याची भूमिका शाहू राजांनी निभावली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


 राजांनी आपल्या परीने धर्माला मानवतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला ते आपल्या काळातील अनेक नेत्यांपेक्षा नेहमीच पुढे असत.कनिष्ठ वर्गाची उन्नती करण्याची त्यांची तळमळ इतरांपेक्षा जास्त होती. राजकारण व समाजकारण यात छत्रपती शाहू राजा एवढी लोकप्रिय व्यक्ती त्यावेळेच्या संस्थानिकात नक्कीच  नव्हती. वंशपरंपरेने आलेली सत्ता, संपत्ती ,मान त्यांच्याकडे असताना सर्व सामाजिक प्रश्न त्यांनी समर्थपणे सोडवले .नवीन समाज निर्माण करण्याची भूमिका त्यांनी अत्यंत तळमळीने पार पाडली. पूर्वांपार पद्धतीच्या राज्यकारभारात त्यांनी बदल घडवला.


छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय- अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. “एक राजा आपल्या अत्युच्च स्थानावरून समजणे फार अवघड आहे.




एक राजा  दीर्घकाळ वंचित व उपेक्षित स्थितीत राहिलेल्या सामाजिक स्तरातील लोकात मिसळतो, त्यांना समतेच्या भावनेने वागवितो, हे दृश्यच मोठे अद्भभुत व रोमहर्षक होते ! पृथ्वीच्या पाठीवर अनेक सम्राट झाले असतील, अनेक राजाधिराज गाजून गेले असतील, पण समाजाच्या तळच्या मानवतेवर माणूस म्हणून मायेची पाखर घालणारे राजे फारथोडे झाले. 


छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही' या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. 


आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज…


 

लेखिका : - प्रसिद्ध इतिहास संशोधिका, "समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज" या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर .







                    

Thursday, June 23, 2022

"ज्ञानोबा - माऊली - तुकाराम' माऊली - माऊलीच्या जयघोषात पुण्यनगरी दुमदुमली; संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये "लोकशाही वारी", 'स्वच्छ वारी - स्वस्थ वारी', 'निर्मल वारी - हरित वारी"



पुणे, दि. २३ :-  महाराष्ट्राला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान इतिहासाचा वारसा आहे. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीचा सांस्कृतिक वारसाही मोठा आहे. 



कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा खांद्यावर भगवी पताका, डोक्‍यावर तुळशीवृंदावन घेऊन मुखाने अखंड "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष करीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या बुधवारी सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाल्या. वैष्णवांच्या या मेळ्याचे पुण्यनगरीने दिमाखात, उत्साहात स्वागत केले.




संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरात मोठा जनसमुदाय, भक्तगणांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर युवक व खेळ, मंत्रालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी, राष्टीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी' दिंडीचा कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.




स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये ही दिंडी सहभागी होत आहे. 




दिंडीच्या शुभारंभप्रसंगी यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालीनी सावंत, प्र. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, प्र. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



कुलगुरु डॉ. काळे म्हणाले, या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले येणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या दिंडीमध्ये तरुण विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून त्यामध्ये सामाजिक नेतृत्व विकसित होत आहे. 




भारताचा तरुण जागतिक पातळीवर एक आदर्श तरुण ठरावा, देशाच्या तरुणाने सामाजिक आदर्श जोपासावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


उपजिल्हाधिकारी श्रीमती सावंत म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी 'स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी' दिंडीचे आयोजन करण्यात येते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने या वर्षीपासून 'लोकशाही वारी' दिंडी पंढरपूरपर्यंत सहभागी झाली आहे. लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व या दिंडीतून जनतेमध्ये बिंबवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.




यावेळी श्री. पांडे आणि डॉ. चाकणे यांनीदेखील विचार व्यक्त केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


'वारी पंढरीची वारी लोकशाहीची' चित्ररथाचा शुभारंभ
आषाढी वारीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत 'वारी पंढरीची वारी लोकशाहीची' या निवडणूकविषयक जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून शुभारंभ करण्यात आला. 




चित्ररथाच्या माध्यमातून पालखीमार्गावरील गावागावात मतदान नोंदणी विषयक जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी दिंडीचे स्वागत करणार आहेत. या दिंडीसोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून पथनाट्याचे सादरीकरण करुन जनजागृती करणार आहेत.

Sunday, June 19, 2022

"पुरंदर तालुक्यातील 'वीर गावच्या "या" यशस्वी मुलींनी' दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून तालुक्यात मारली बाजी; रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर,श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कुल वीर शाळेचा १००% निकाल"....

 


पुरंदर, वीर, दि.१९ : महाराष्ट्रात यावर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.  यावर्षी राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दहावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. मुलींचा निकाल 97.96 टक्के जाहीर झालाय आणि मुलांचा निकाल 96.06 टक्के आहे. राज्यात एकूण 9 विभागीय मंडळांअंतर्गत परीक्षा पार पडली.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर गावातील रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर व श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयांचा दहावीचा 100% निकाल लागलेला आहे.



श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाच्या समृद्धी संभाजी शेडगे या विद्यार्थिनीने दहावीला 97 .40% टक्के गुण मिळवून, तालुक्यातील परिंचे केंद्रात प्रथम, विद्यालयात प्रथम व  पुरंदर तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले.




याच विद्यालयाच्या श्रावणी संजय चवरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 97% गुण मिळवून परिंचे केंद्रात द्वितीय, विद्यालयात द्वितीय व पुरंदर तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले. याच विद्यालयाच्या प्रणाली किरण जगताप या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के मार्क्स मिळवून परिंचे केंद्रात तिसरा क्रमांक, विद्यालयात तिसरा क्रमांक पटकावून यश मिळवले आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीरच्या दहावीतील यशस्वी विद्यार्थिनींनी दहावीच्या निकालात पुरंदर तालुक्यात बाजी मारल्यामुळे, संपूर्ण तालुक्यात तसेच वीर पंचक्रोशीमध्ये त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.


रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाचाही दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाच्या वैष्णवी चंद्रकांत मोरे या विद्यार्थिनीने 82 .40% टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री राहुल समगीर या विद्यार्थिनीने 79.20%  टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. आर्या महेश चव्हाण या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 77 .20% टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.




रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक धिमधिमे एस. जे. यांनी केले.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत पुरंदर तालुक्यात यश मिळवुन बाजी मारल्यामुळे, या विद्यालयाचे सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच या विद्यालयाचे संस्थापक नितीन धुमाळ, विद्यालयाच्या प्राचार्या वृषाली धुमाळ व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यावरती वीर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन यशस्वी विद्यार्थी घडविल्यामुळे, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर या विद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण तालुक्यात झालेला आहे.


Thursday, June 16, 2022

ब्रेकिंग न्यूज..! "दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, "या" तारखेला दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल "या" अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार; निकालानंतर गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन यासाठी "या" संकेतस्थळावर अर्ज करता येणार"...



मुंबई,दि.१६ : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची लागलेली प्रतीक्षा संपली आहे. उद्या दि. १७ ला दहावीचा निकाल  दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली. त्यांनी समाज माध्यमांवर टि्वट करीत याबाबतची माहिती दिली आहे. 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये  घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण  अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. 




दहावीच्या निकालासाठी अधिकृत संकेतस्थळ : - 


1) www.mahresult.nic.in 

दहावीच्या निकालासाठी या लिंकवर क्लिक करा : -  www.mahresult.nic.in


2) http://sscresult.mkcl.org 


3) https://ssc.mahresults.org.in 


4) https://lokmat.news18.com

 

5)https://www.indiatoday.in/education-today/results 


6) http://mh10.abpmajha.com 


7)https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 38 हजार 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 506 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 458 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.




मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या दृष्टिकोनातुन दहावीचा निकालाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो.