Sunday, September 6, 2020

वाकीचा तलाव ओव्हरफ्लो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे शेतकरी वर्ग, बारामतीकर आनंदित...

 

वाकी, दिनांक ६ : बारामती तालुक्यातील शेतीसिंचनासाठी महत्वाचा असलेला वाकी गावचा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाकी परिसरातील शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.




बारामती तालुक्यातील जिरायत भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बारामती तालुक्यातील वाकी गावात शेती सिंचनाची सोय नसल्यामुळे वाकीच्या तलावात पाणी सोडण्याची अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी होती. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी वाकीच्या तलावात कायमस्वरूपी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळून पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत खडकवासला कालव्याचे पाणी वाकीच्या तलावात सोडण्यात आले होते.




आज तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे वाकी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आनंदित झाले आहे.वाकी गावातील पाटबंधारे तलाव  102 एम.सी.एफ. टी. क्षमतेचा असून यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी आणि पिण्यासाठी होणार असून, चोपडज, वाकी, मूर्टी, मोराळवाडी, कानाडवाडी, वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.




बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर, वाकी गावचे सर्व ग्रामस्थ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळ्ल्यामुळे वाकीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून याचा खूप मोठा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.




 "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुक प्रचारावेळी दिलेला शब्द पाळल्यामुळे आज वाकी गावचा तलाव पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला आहे,वाकी पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाला याचा खूप फायदा होणार असून,या भागातील शेतकरी वर्ग खूप आनंदित झाला आहे अशी प्रतिक्रिया बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी दिली. वाकीचा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे वाकी गावातील सर्व ग्रामस्थांनी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.





No comments:

Post a Comment