Tuesday, September 26, 2023

"आजी - आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचा बंध समृद्ध करणारा "हा" खास आगळा वेगळा 'आजी - आजोबा दिन' पुरंदरच्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे उत्साहात संपन्न"


पुरंदर, वीर, दि.२६ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील,  तीर्थक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर नेहमीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.



आजी आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचे नाते समृद्ध करणारा "आजी - आजोबा दिन" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे सोमवारी अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.




आजी - आजोबा व नातवंडांमधील बंध अधिक घट्ट होण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर मधील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले. आजी आजोबांच्या चरणांवर फुले वाहून व त्यांना औक्षण करून आजी-आजोबांप्रती आपले प्रेम व्यक्त केले.




शाळेने आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची व फुगे उडवणे या मनोरंजक खेळाचे आयोजन केले. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आजी - आजोबांनी देखील या मनोरंजक खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन  या खेळाचा आनंद लुटला.




या कार्यक्रमामध्ये माधवी धुमाळ, शोभा धसाडे, विमल मोरे या आजींनी आपले मनोगत व्यक्त केले.




या आगळ्यावेगळ्या "आजी - आजोबा दिन" कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका मस्के यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी मर्ढेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी केले.



"विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आमच्या शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो." अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी दिली.


आजी - आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचा बंध फुलवणारे, समृद्ध करणारे असे दिन साजरे होणे  गरजेचे आहेत.


Friday, September 22, 2023

"पुण्यातील "या" गणेशोत्सव मंडळाचा नादच खुळा; बाप्पाला पुस्तकांचा नैवद्य व बालचमुंसाठी विज्ञान प्रदर्शन या आदर्श उपक्रमांमुळे जिंकली पुणेकरांची मने"...


पुणे, दि.२२ : पुण्यातील  अरण्येश्वर नगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळाने "बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य व अनोखे विज्ञान प्रदर्शन" या आदर्श उपक्रमांमुळे गणेश भक्तांची व पुणेकरांची मने जिंकली.




श्री गणेशा विद्येची देवता आणि पुस्तके हे विद्येचे, ज्ञानाचे माध्यम आहे. पुस्तके छोटी असली तरी संपूर्ण जग त्यात सामावलेले असते. अशी ही पुस्तके आपली ज्ञानाची भूक भागवतात. गणेशोत्सव मंडळे नेहमीच अनेकदा अन्नकोट करत असतात. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पण यावेळी व गेली अनेक वर्षे जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या वतीने हीच ज्ञानाची भूक भागवण्यासाठी "पुस्तककोट" उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.




याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे पर्वती विभागातून  एकता मित्र मंडळाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि अनेक स्थानिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होत, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांची, गोष्टींची, सामान्य ज्ञानाची पुस्तके एकता मित्र मंडळाच्या लाडक्या बाप्पाला पुस्तकांचा नैवद्य म्हणून अर्पण केली.




स्थानिक मा. नगरसेविका अश्विनी नितीन कदम व सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी वेगवेगळ्या विषयावरील ३०० पुस्तके, यशातारा सोसायटीमधील अनंतकाका वाघ १०० पुस्तके, अशोक बाणखेले, धमेंद्र बानगुडे, शिवाजी अमराळे, अविनाश खंडागळे, महादेव ढमाले, शेखर मिरघे, मस्जिद शेख, अनिल ढमाले, मंगेश भुजबळ, अमोल जाधव, 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


ऋषिकेश पांढरकामे, सुधीर ढमाले, विनायक इंगवले, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड, शुभम बाणखेले, योगेश मांढरे, संकेत मिरघे, गणेश खाडे, सनी तिवाटणे, आशुतोष अमराळे, दुर्वांकुर ढमाले, आदित्य मिरघे, चैतन्य ढमाले, यश चावट, केशव अमराळे, संकेत आढाव, मानव बाणखेले, आदर्श चावट, प्रथमेश शिंदे,  दर्शन खंडागळे, हर्षद खंडागळे, हेरंब ढमाले, आदिनाथ नाईक, सोमनाथ नाईक, तेजस पवार या सर्वांनी पुस्तके अर्पण करून बाप्पाला नैवद्य अर्पण केला.



एकता मित्र मंडळ व ज्ञान प्रबोधिनी यांच्या माध्यमातून  गुरुवारी  सायं ७:०० ते ९:०० या वेळेमध्ये "विज्ञान प्रदर्शन" (उष्णता आणि इलेक्ट्रॉन व विविध विषयांवर ४०-५० प्रयोग व प्रकल्पांसह) आयोजित करण्यात आले होते. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उपलब्ध सर्व प्रयोगांविषयी सखोल माहिती व प्रश्न विचारत प्रदर्शनकर्त्या सर्व युवकांचे कौतुक केले.




विशेष म्हणजे लहान मुला मुलींनी मोठ्या संख्येने आवडीने पूर्णपणे विज्ञानाची सफर केली. यावेळी पुणे मनपाचे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. नरेंद्र व्यवहारे यांनीही या प्रदर्शनाला भेट देत, "असे स्तुत्य उपक्रम गणेशोत्सवात होत आहेत आणि हे समाजासाठी आवश्यक आहेत... हे नाविन्यपूर्ण कार्य आहे." असे म्हणत एकता मंडळाचे व ज्ञान प्रबोधिनीचे मनभरून कौतुक केले.




 जय गणेश व्यासपीठासोबत संलग्न असलेली वेगवेगळ्या भागातील अनेक मंडळे एकाच दिवशी बाप्पांच्या चरणी पुस्तककोट करत असतात आणि त्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद व नैवद्य म्हणून या पुस्तकांचे गरजू, वंचित, शहर, ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांमध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि तसेच श्रींची आरती झाल्यावर मंडळातील स्थानिक सर्व लहान मुलांना बाप्पाचा नैवद्य म्हणून पुस्तके वाटण्यात आली.


"एकता मित्र मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून पुणेकरांची  सेवा करत असते.  यावर्षीही आमचे मंडळ शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.  कृपया आमच्या मंडळाच्या श्रींच्या दर्शनाला येताना हार व फुले सोबत आणण्यापेक्षा एक वही व पेन बाप्पांच्या चरणी अर्पण करावे. सदर  शैक्षणिक वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोहचविण्यात येतील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर ढमाले  यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच  लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षीच्या मंडळाच्या  शैक्षणिक उपक्रमाचे व आगळ्यावेगळ्या "शैक्षणिक  उपक्रमरुपी नैवेद्याचे"  पुणेकरांनी कौतुक केलेले आहे.

Thursday, September 14, 2023

"मराठा आरक्षणासाठीचे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण १७ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन मागे; मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे"



जालना,दि.१४ : मराठा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी व आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून  मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात उपोषण चालू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर, त्यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पाटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन त्यांचं उपोषण सोडलं. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "माझ्यावर विश्वास ठेवा. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही" असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.




गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली.




त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राजेश टोपे, मंत्री संदीपान भुमरे, आमदार अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.




यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, "आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे."असे मनोज जरांगे यांनी म्हटले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना फळांचा रस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही फळांचा रस दिला.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असं सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.




मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन  मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, चर्चा केली. 


यावेळी त्यांनी  मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याचे सांगितले. ‘सारथी’ तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.




मुख्यमंत्र्याच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटील  यांनी अखेर आज उपोषण सोडले आहे. मात्र असे असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. "मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तशीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचीही आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.




"मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे. हे आरक्षण मिळवल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देवू शकतात असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


मराठा आरक्षणाचा लढा राज्यभर आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून तीव्र होत चाललेला आहे. यामुळे सरकारने गांभीर्य घेऊन सुप्रीम कोर्टात टिकणारे, कायदेशीर भक्कम आधार असणारे मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा राज्यातील मराठा समाज व्यक्त करत आहे.