Saturday, December 30, 2023

"कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा? देशावर 205 लाख कोटी कर्ज; 6000 रुपयांचे गाजर दाखवून शेतकरी उद्धवस्त, विरोधी पक्ष संपवणे हेच तुमचे ध्येय" - विकास लवांडे



पुणे, दि.३० : "भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी तथाकथित अर्थव्यवस्था आहे. पण त्याचबरोबर देशावरील कर्जाचा बोजाही वाढत आहे हे भीषण वास्तव आकडेवारी सांगत आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.



विकास लवांडे म्हणाले, "चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज वाढून 2.47 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 205 लाख कोटी रुपये झाले आहे.कधी नव्हे इतका देश कर्ज बाजारी केला, कधीच नव्हती इतकी बेरोजगारी आज आपल्या देशात वाढलेली आहे. प्रचंड महागाईने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे."

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"6000 रूपयेचे गाजर दाखवून शेती व शेतकरी उध्वस्त केला , देशभर धार्मिक तेढ वाढवला , धर्म व देवाच्या नावाने जनतेच्या श्रद्धा व भावनेशी रोज खेळ खेळता, शिवाय ठरवल्याप्रमाणे संसदीय लोकशाहीला नख लावले." अश्या शब्दात विकास लवांडे यांनी मोदी सरकारवर टीका केली.




"तुम्ही प्रथम निवडून आला तेव्हा संसदेच्या पायरीवर डोकं ठेवले होते मात्र त्या संसदेची तुम्हाला जरा ही किंमत नाही हेच आजपर्यंत तुम्ही गैरहजर राहून व संसदेत सतत फक्त प्रचारकी भाषण करत आलात. आपण प्रधानमंत्री होऊन फक्त गुजरात आणि भाजपचेच राहिलात  सतत पक्ष प्रचार करत राहिलात पण तुम्ही देशाचे कधीच झाला नाहीत हे तुमच्या दहा वर्षात दिसले. अशा कडक  शब्दात विकास लवांडे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर टीका केली.



"मा.मोदी साहेब आपण कायम मन की बात ऐवजी एक तरी राष्ट्रीय पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी. सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करून देशाचे वाटोळे करू नका. विरोधी पक्ष संपवणे हेच तुमचे ध्येय आहे कारण तुम्हाला देशाचा हुकूमशहा व्हायचं आहे ना ? असा सवाल विकास लवांडे यांनी उपस्थित केला.




समस्त सुशिक्षित युवा पिढी या सर्व गंभीर विषयांवर विवेकी विचार करेल काय ? हा प्रश्न विकास लवांडे यांनी युवा पिढीला विचारला आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"नॅशनल क्राईम रेकॅार्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये, महिलांविरोधातील अत्याचाराच्या देशभरात एकूण 4,45,256 केस दाखल झाल्या. 2021 च्या तुलनेत ही महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे. यापेकी 31.4 % प्रकरणं ही कौटुंबिक हिंसाचाराची आहेत.यात गुन्हे नोंद न झालेल्या घटना किती असतील त्याचा अंदाज आपण करावा." अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"तरी ही देश मोदींच्या हातात सुरक्षित आहे असे बोलणारे किती थापाडे व लाचार आहेत ते समजते. कुठे गेला महिला आयोग ?  कुठे गेल्या भाजपाच्या सर्व महिला आघाडीच्या नेत्या ? सीतामाई कितीही अडचणीत असली तरी पण फक्त जय श्रीराम म्हणा! सीतेला न्याय मिळेल की नाही हे विचारू नका. अशी स्थिती आहे. असे मत विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


देशातील महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने गांभीर्याने काम करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment