Tuesday, October 29, 2024

"१२ लाखाचे कर्ज फेडणारे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब,लातूरच्या शेतकरीपुत्राचे NEET परीक्षेत उत्तुंग यश,आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून बनणार डॉक्टर; खंडाळ्याच्या शेतकरीपुत्राचे अभियांत्रिकी CET परीक्षेत देदीप्यमान यश, आयटी क्षेत्रातले मोठे स्वप्न, सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन मित्रांच्या जिद्दीचा,यशाचा प्रवास"....


पुणे,दि.२९ : मैत्री हे जगातील खूप सुंदर नाते असते.आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत लाभली तर नक्कीच भविष्यकाळही खूप उज्वल असतो. मराठवाड्यातील लातूरच्या,औसा तालुक्यातील सारंग बिराजदार व सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील हर्षद मांढरे या दोन युवा मित्रांनी जिद्दीने, चिकाटीने व मेहनतीने शैक्षणिक कारकिर्दीमध्ये डॉक्टर बनण्याच्या नीट परीक्षेत व इंजिनियर बनण्याच्या सीईटी परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

मराठवाड्यातील लातूरचा शेतकरी पुत्र सारंग बिराजदार याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी द्यावी लागणारी देशातील कठीण परीक्षा (NEET) नीट या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवुन, वैद्यकीय क्षेत्रातील "एमबीबीएस" या पदवीसाठी भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 

सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील शेतकरीपुत्र हर्षद मांढरे याने इंजिनिअरिंगच्या अवघड असणाऱ्या सीईटी परीक्षेत 98.28 टक्के गुण मिळवून, अहोरात्र मेहनत घेऊन देदीप्यमान यश मिळवून, पुण्यातील नामांकित असणाऱ्या व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याच्या आवडीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश मिळवुन, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

सारंग बिराजदार व हर्षद मांढरे हे दोघेही शेतकरीपुत्र या दोघांचेही कुटुंब पुण्यात मुलांच्या  शिक्षणासाठी स्थायिक झाले. शालेय जीवनापासूनच एकमेकांचे खूप जवळचे असणारे हे दोघेही मित्र खेळाबरोबर अभ्यासातही खूप विशेष लक्ष द्यायचे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

शालेय जीवनापासूनच या दोन्ही मित्रांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगले स्वप्न ठेवून, दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर,आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट व मेहनत घेतली.

आज या दोन्ही मित्रांची त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएस डॉक्टर बनण्यासाठी व कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्यासाठी प्रवेश मिळालेला आहे.

मराठवाड्यातील, लातूरच्या, औसा तालुक्यातील चिंचोली जोगण गावचे शेतकरी असणारे धनराज बिराजदार हे त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर  गावी पूर्णवेळ शेती करत होते. मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंब तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे बिराजदार कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडले.

"मराठवाड्यातील, लातूरच्या किल्लारी परिसरातील 185 उंबऱ्याचे  आमचे जोगन चिंचोली गाव. आमचं अल्पभूधारक शेतकरी कुटुंब, तीन वर्ष शेती केल्यानंतर शेतीमध्ये खर्च जास्त, उत्पन्न कमी, शेतमालाला भाव नसल्यामुळे या दुर्दैवी चक्रात आमच्यावरती 12 लाखाचे कर्ज झाले. त्यानंतर पुणे शहरात येऊन आम्ही स्थायिक झालो. पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेत काम करायला सुरुवात केल्यानंतर, मशाल संस्था, गोखले इन्स्टिटयूट अशा  अनेक सामाजिक  व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांकडेकडे  हंगामी कामे केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व्हेच्या कामांमध्ये झोकून देऊन काम करून, प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला. माझ्या मुलाने केलेले कष्ट, मेहनत यामुळे त्याची भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पदवीसाठी प्रवेश मिळाला. हा आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे." अशी प्रतिक्रिया धनराज बिराजदार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, मिरजेवाडी गावचे शेतकरी असणारे संतोष मांढरे ग्रामीण भागात खूप उत्तम शेती करतात. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संतोष मांढरे यांनी गाव सोडले व पुणे शहरात मुलांच्या उज्वल भविष्यासाठी स्थायिक झाले.

आजच्या स्पर्धेच्या युगात चांगले शिक्षण घेऊन उत्तम कामगिरी केली तरच  मुले या काळात टिकू शकतात. याची जाणीव संतोष मांढरे यांनी आपल्या मुलांना वेळोवेळी करून देऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच हर्षद मांढरे याने अभियांत्रिकीच्या सीईटी परीक्षेत कष्टाने,मेहनतीने देदीप्यमान यश मिळवले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी गावातील आमचे शेतकरी कुटुंब. लग्नानंतरही काही वर्ष पूर्ण वेळ आम्ही शेतीच करत होतो. ग्रामीण भागात शेती हेच आमचे उपजीविकेचे साधन. मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडले आणि पुण्यात स्थायिक झालो, नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असतानाही आमच्या शेतीची नाळ कधीच आम्ही तोडली नाही. मुलांच्या शिक्षणासाठीच आम्ही गाव सोडून पुण्यात आलो याची जाणीव आमच्या मुलांना आम्ही नेहमीच करून दिली. हर्षदने अहोरात्र मेहनत करून, जिद्दीने चिकाटीने  इंजिनिअरिंगच्या सीईटी परीक्षेत खूप चांगले यश मिळवुन, पुण्यातील नामांकित असणाऱ्या व्हीआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला याचा आमच्या कुटुंबीयांना खूप आनंद आहे." अशी प्रतिक्रिया संतोष मांढरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी कष्टाने, मेहनतीने जे देदीप्यमान यश मिळवले याबद्दल त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी तसेच लातूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

सारंग बिराजदार याने पहाटे पाचला उठून सकाळी मेडिटेशनने सुरुवात करून, दिवसभरात 12- 14 तास कष्ट, मेहनत घेतल्यामुळेच त्याची भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी निवड झाली. सारंग बिराजदार याच्या आई पद्मिनी बिराजदार यांचेही सारंगच्या या यशस्वी प्रवासात  महत्त्वाचे योगदान आहे. सारंगचा भाऊ सोहम बिराजदार माध्यमिक शिक्षण घेत असून कलाक्षेत्रात  त्याला आवड आहे.

सारंगने पुणे शहरात राहत असलेल्या आंबेगाव पठार परिसरातील प्रथमा हाईट्स सोसायटीच्या बिल्डिंगच्या टेरेस वरती बसून आठ - आठ तास अभ्यास केलेला आहे. लायब्ररीमध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. आई-वडिलांच्या कष्टाची व मेहनतीची जाणीव असल्यामुळे सारंग बिराजदार याने बारावीनंतर झोकून देऊन अभ्यास केला त्यामुळेच त्याला चांगले यश मिळवता आले.

मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्यात स्थायिक झालेले संतोष मांढरे यांचे कुटुंबही सुशिक्षित व ध्येयवादी विचारसरणीचे. संतोष मांढरे यांनी लहानपणापासूनच मुलांवरती चांगले संस्कार केले. आयुष्यात मोठी प्रगती करायची असेल तर चांगले शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे? याची जाणीव त्यांनी पदोपदी आपल्या मुलांना करून दिल्यामुळेच हर्षद मांढरे याने इंजिनिअरिंगच्या सीईटी परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून, आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे मेहनतीचे चीज करून दाखवले.

हर्षद मांढरे याच्या आई मनीषा मांढरे यांचेही हर्षदला त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले त्यामुळे त्याला हा यशाचा पहिला चांगला टप्पा गाठता आला. हर्षद मांढरे याची बहीण संजना मांढरे ही देखील उच्चशिक्षित असून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे. चांगले शिक्षण घेतले तरच आयुष्यामध्ये चांगली प्रगती करता येते हा विचार मांढरे कुटुंबियांनी उत्तमरीत्या जपलेला आहे.

मराठवाड्यातून पुण्यात येऊन, संघर्ष करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांवर  चांगले संस्कार करून, शिस्त लावून, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कशी चांगली प्रगती करता येईल? हे बिराजदार कुटुंबियांनी सर्वांना दाखवून दिलेले आहे.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून फक्त मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात येऊन, उच्च शिक्षणाचे चांगले संस्कार करून व चांगली शिकवण देऊन, गावाकडच्या शेतीशी नाळ न तोडता, पुण्यात राहून मुलांवरती चांगले संस्कार व चांगले मार्गदर्शन करून शैक्षणिक कारकीर्दीमध्ये कसे चांगले यश मिळवता येते  हे मांढरे कुटुंबीयांनी सर्वांनाच दाखवून दिलेले आहे.

"माझे आई - वडील, शिक्षक यांचे माझ्या यशामध्ये खूप मोठे योगदान आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी पूर्ण झाल्यानंतर मला पुढे एम.डी. करायचे आहे आणि हजारो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे." अशी प्रतिक्रिया सारंग बिराजदार याने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा सर्वांचाच पाठिंबा व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. माझ्या आई वडिलांचे मार्गदर्शन व उच्च शिक्षणासाठीचा भक्कम पाठिंबा यामुळेच मला हे यश मिळवता आले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण झाल्यानंतर, आयटी क्षेत्रामध्ये मोठया कंपनीसाठी चांगले काम करायचे आहे." अशी प्रतिक्रिया हर्षद मांढरे याने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी, जिद्दीने, चिकाटीने, प्रयत्न केले. दहा - दहा ,बारा - बारा तास अभ्यास केला. त्यामुळे या दोन्ही मित्रांना चांगले यश मिळवता आले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

सोशल मीडिया, मोबाईल, चुकीची संगत यामुळे भरकटलेली तरुण पिढी  आजच्या काळात आपल्याला पाहायला मिळते. परंतु आई-वडिलांच्या कष्टाची, मेहनतीची जाणीव ठेवून शैक्षणिक कारकिर्दीमध्ये संपूर्ण आयुष्य झोकून देऊन, कष्ट व मेहनत केली तर नक्कीच आई-वडिलांची व स्वतःची स्वप्न पूर्ण करता येतात हे सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी त्यांच्या या जिद्दीच्या, चिकाटीच्या व या देदीप्यमान यशाच्या प्रवासातून सर्वांना दाखवून दिलेले आहे.

आजच्या आधुनिक काळात शिक्षणाची साधने भरपूर आहेत. करिअरसाठी अनेक पर्याय आहेत परंतु आपली आवड नक्की कोणत्या क्षेत्रात आहे हे आजच्या तरुण पिढीला कळणे खूप गरजेचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट व मेहनत करून आपली ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद एक वेगळाच असतो ही जाणीव आजच्या यशस्वी तरुणाईला नक्कीच असते.

आजच्या काळामध्ये उच्च शिक्षण घेत असताना आई-वडिलांचे संस्कार व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते.

Thursday, October 17, 2024

"कोरोना काळात हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणाऱ्या पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मधुमेही रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न; अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, लोकप्रिय नेते जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात "या" तारखेला होणार 75 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा"


सासवड,दि.१७ : कोरोना काळात हजारो - लाखो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांचे योगदान समाज कधीच विसरू शकणार नाही. पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी कोरोना काळामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तालुक्यातील हजारो रुग्णांना प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे.

अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे  लोकप्रिय नेते मा. आमदार  जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्ताने रविवारी १३ ऑक्टबर २०२४ रोजी पुरंदर तालुक्यातील मधुमेही रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी, मोफत मधुमेह तपासणी भव्य शिबिर पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सासवड येथे संपन्न झाले.

व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव, बदललेली जीवनशैली, अनियंत्रित आहार आदी कारणामुळे मधुमेही रुग्णांची संख्या वाढते आहे. एरव्ही साठीत मधुमेह जडायचा. आता मात्र युवकांनाही तो जडतो आहे आणि प्रारंभीचे काही वर्ष याची जाणीव होत नाही. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

त्यामुळे उपचार होत नाहीत. परिणामी गुंतागुंत निर्माण होते. वेळीच निदान झाल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. ही बाब विचारात घेता ग्रामीण भागात मधुमेह निदान शिबिरे घेण्याची गरज आहे. ही गरज ओळखून पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हे मधुमेह तपासणी शिबिर संपन्न झाले.

पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्यावतीने पुरंदर तालुक्यात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांची सेवा करण्याचा नेहमीच या संघटनेचा प्रयत्न राहिलेला आहे.

या मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे (CAPD) अध्यक्ष  संदीप पारेख व महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे पश्चिम विभागाचे सचिव  दत्तप्रसाद टोपे  यांच्या हस्ते झाले. 

याप्रसंगी पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यकारी सदस्य  धैर्यशील शिंदे,  बाळासाहेब भिंताडे , पुणे जिल्हा महिला कार्यकारी सदस्य शुभांगी जगताप, भूषण ताकवले, पुरंदर तालुका अध्यक्ष  सुकुमार नाझीरकर, उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, सासवड शहर सचिव  विराज सस्ते, सासवडचे उपाध्यक्ष  संदीप घारे तसेच

खजिनदार  प्रितम जगताप, सासवड झोनल अधिकारी  सुमित जगताप, वीर - परिंचे गटाच्या झोनल अधिकारी सुवर्णा रणवरे, जेजुरी शहर अध्यक्ष नितीन नाझीरकर, अधिकारी विक्रम खामकर, ओंकार कदम,  विलास बलकवडे, प्रीतम खोमणे, वृषाली खामकर, उर्मिला नंदकुमार जगताप, तनुजा पाटिल, निकिता धैर्यशील शिंदे, माया शाह, पूजा सुमित जगताप, प्रियांका सागर सस्ते, तृप्ती चाविर, तृप्ती गायकवाड, अरुणा क्षीरसागर,श्रीकांत आंग्रे, सागर सस्ते, निलेश डाकले, अरुण खेनट, अतुल साळुंखे, स्वप्नील पवार, सर्व मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात मधुमेही रुग्णांची तपासणी, जेवणाच्या अगोदरची साखर, नियमित साखर व कोलेस्ट्रॉल मोफत तपासणी केली. या शिबिरास सासवड मधील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 

या शिबिरासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व झोनल अधिकारी यांनी  प्रचंड मेहनत घेतली. सासवड मधील सर्व मेडिकल दुकानदारांनी रुग्णांची नोंद करून घेतली होती.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या शिबिरात  225 रुग्णांची मोफत मधुमेह तपासणी केली गेली.या मोफत रक्त तपासणी शिबिराचा लाभ पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त मधुमेही रुग्णांनी घेतला. 

या शिबिराच्या वेळी अध्यक्ष संदीप पारेख यांनी पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांच्या हिताच्या विविध योजना सांगितल्या तसेच केमिस्ट हृदय सम्राट, अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा आमदार  जगन्नाथअप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त २२ जानेवारी २०२५ रोजी पुण्यामध्ये मोफत 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे असे पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पारेख यांनी यावेळी जाहिर केले.

हा मोफत भव्य सामुदायिक विवाह सोहळा पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कार्यालय तसेच त्यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्याकडे या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

"या सोहळ्यास पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात सर्व केमिस्ट आणि मेडीकल दुकानाची इन्शुरन्स पॉलिसी ही योजना जिल्हा कार्यकारणी कडून करण्यात येणार आहे असे जिल्हा कार्यकारणी सदस्य  धैर्यशील शिंदे यांनी सांगितले."

"ऑनलाइन फार्मसी ,चैन मेडिकल शॉपी, मेड प्लस, वेलनेस फार्मसी या जागतिक भांडवलदार कंपन्यांच्या मेडिकल व्यवसायाच्या स्पर्धेत स्थानिक फार्मसी टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी पुरंदर तालुक्यात वेळोवेळी मोफत रक्त तपासणी शिबिरे घेण्यात येतील. जेणेकरून रुग्ण आणि स्थानिक फार्मासिस्ट यांचं नातं दृढ होईल. त्याचबरोबर रुग्णांचे कौन्सिलिंग करून, रुग्णांना औषधाबाबत सर्व माहिती पुरवली जाईल. रुग्णसेवेचे हे व्रतच आम्हाला आमच्या कामासाठी खूप ऊर्जा देते." अशी प्रतिक्रिया  पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष व मा. नगरसेवक  नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

या मोफत मधुमेह, रक्त तपासणी शिबिराचे खूप सुंदर नियोजन करण्यात  आले.यासाठी ज्या पदाधिकारी आणि केमिस्ट बांधवानी कष्ट घेतले त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले गेले. विशेष करुन महिला केमिस्ट भगिनींनी जास्त संख्येने सहभागी होऊन  चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व महीला फार्मासिस्टचे यावेळी आभार मानले. 

पुणे जिल्हा महिला कार्यकारणी सदस्या सौ शुभांगी  जगताप यांनी पुढाकार घेवून सर्व महिला केमिस्ट भगिनींना कार्यक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल त्यांचेही संघटनेच्या वतीने आभार मानले गेले. पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे EC Member  धैर्यशील शिंदे आणि  बाळासाहेब भिंताडे तसेच  सासवड शहर असोसिएशन यांनी केलेल्या सुंदर नियोजनाबद्दल शुभांगी  जगताप (EC Member) यांनी सर्वांचे आभार मानले.

पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पुरंदर तालुक्यातील लोकांकडून कौतुक करण्यात आले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

आजच्या काळातील बदललेली जीवनशैली, फास्टफूड व ताण - तणाव यामुळे अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे.

Wednesday, October 16, 2024

"महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वाजले बिगुल; राज्यात ९.६३ कोटी मतदार, निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेतील "या" नियमांचे करावे लागणार पालन; नियम मोडल्यावर "ही" कारवाई केली जाते; "या" ॲपच्या माध्यमातून मतदार निवडणूक आयोगाला तक्रार देऊ शकतात"...

नवी दिल्ली, १६ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे.


नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे  पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात पंधरा तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे.


"महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम" 


महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 

1)22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.

2) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर

3) 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. 

4)अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. 

5)20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.



"महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती"


महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर  29 जागा  या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. 


राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत.

यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'


"नांदेड, केरळ आणि  उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित"


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

"भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश,सूचना दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे. "

"विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत  असल्याची खातरजमा, ‘पब्लिक डिफेसमेंट ॲक्ट अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व  सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत."


"निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित"


भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

"ई-ईपीआयसी" हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, "सी-विजिल"  ॲपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते.ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.

उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

भारतात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यात आचारसंहिताही लागू केली जाते. या काळात सरकारी यंत्रणा निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखालीच कार्य करतात. मतदान आणि मतमोजणी झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता उठवली जाते. पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? आणि त्याचे नियम आणि कायदे काय आहेत?  त्यासंदर्भात जाणून घ्या....


"आचारसंहिता काय असते?"


देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम बनवले आहेत. निवडणूक आयोगाच्या या नियमांना आचारसंहिता म्हणतात. लोकसभा/विधानसभा निवडणुकीदरम्यान या नियमांचे पालन करणे ही सरकार, नेते आणि राजकीय पक्षांची जबाबदारी असते.


"आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि किती दिवस लागू राहते?"


निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. देशात दर पाच वर्षांनी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतात. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. 

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. निवडणुकीची तारीख जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणी होईपर्यंत सुरू राहते.



"आचारसंहितेचे नियम काय असतात?"


1)निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. 

2)याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. 

3)आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. 

4)याशिवाय, कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

5) निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. 

6)निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

7)एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्याच्यावर आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते. आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्या संबंधित उमेदवाला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. 

8)उमेदवाराने अथवा राजकीय पक्षाने नियम मोडल्यास गंभीर गोष्ट असेल तर त्या पक्षावर किंवा उमेदवारावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो. इतकेच नव्हे तर संबंधिताला कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

9)आचारसंहितेत राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने वर्तन करावे, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगा आदर्श आचारसंहिता लागू करते. ज्यांचे पालन सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी करणे अनिवार्य असते.


आदर्श आचारसंहितेतील तरतुदी काय आहेत?


1)निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान, मतदान केंद्र, निरीक्षक आणि जाहीरनामा यांसाठी नियमावली निश्चित केली आहे.

2)विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका.धोरणे आणि कृतींवर टीका करा, कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या, कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका.

3)कोणत्याही जाती-पंथाच्या भावनांचा गैरवापर करून मतदान करण्याचे आवाहन करू नका.मंदिर,मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.

4)मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.

5)मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू करण्यात आली आहे.कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने व धरणे करू नयेत.

6)नेते प्रशासनाच्या परवानगीशिवाय झेंडे, बॅनर लावू शकत नाहीत, नोटीस पेस्ट करू शकत नाहीत आणि घोषणा लिहू शकत नाहीत.

7)राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.

8)ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणांजवळ कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"राजकीय सभा/रॅली आणि राजकीय सभांसाठी नियम"..


1)सर्व रॅलीचे ठिकाण याची पूर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी.राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ते ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत तेथे आधीपासून कोणतेही निर्बंध नाहीत याची खात्री करून घ्यावी.

2) सभेत लाऊडस्पीकरच्या वापरासाठी आगाऊ परवानगी घ्यावी.सभेच्या आयोजकांनी कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.


मिरवणुकीसाठी काय नियम आहेत?

1)मिरवणुकीपूर्वी मिरवणूक सुरू होण्याची वेळ, मार्ग आणि समाप्तीची वेळ आणि ठिकाण याची आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी लागेल.

2)तुम्ही ज्या भागातून मिरवणूक काढत आहात त्या भागात काही निर्बंध आहेत का ते आधीच माहित करुन घ्यावेत.वाहतुकीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारे मिरवणुकीचे व्यवस्थापन करणे.

3)एकाच दिवशी आणि एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त राजकीय पक्षांनी मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव मांडल्यास वेळेबाबत आधीच चर्चा करणे.

4)रस्त्याच्या उजव्या बाजूने मिरवणूक काढणे. मिरवणुकीत शस्त्रे किंवा इतर हानीकारक साहित्य बाळगू नये.कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सूचना व सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करावे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'


"मतदानाच्या दिवशी सूचना"


1)राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत कार्यकर्त्यांना बॅज किंवा ओळखपत्र द्यावे.

2)निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचे सहकार्य हवे.मतदारांना दिलेली स्लिप ही साध्या कागदावर असावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह, उमेदवार किंवा पक्षाचे नाव नसावे.

3)मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या ४८ तास आधी दारूचे वाटप कोणालाही करू नये.

4)मतदान केंद्राजवळ उभारलेल्या छावण्यांमध्ये अनावश्यक गर्दी करू नये.कॅम्प जनरल्सवर कोणतेही पोस्टर, ध्वज, बोधचिन्ह किंवा इतर प्रचारात्मक साहित्य प्रदर्शित करू नये.मतदानाच्या दिवशी वाहन चालवण्यासाठी परमिट असणे आवश्यक आहे.

5)मतदान केंद्र: मतदारांशिवाय, ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचा वैध पास नाही अशा कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करू नये.


"सत्ताधारी पक्षाचे नियम"

1)मंत्र्यांनी अधिकृत दौऱ्यात प्रचार करू नये.सरकारी विमाने आणि वाहने पक्षाच्या हितासाठी वापरू नये.

2)सरकारी यंत्रणा व कर्मचाऱ्यांचा पक्षहितासाठी वापर करू नये. हेलिपॅडवर सत्ताधाऱ्यांनी मक्तेदारी दाखवू नये.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

3)सरकारी निधीतून पक्षाचा प्रचार करू नये.केंद्र किंवा राज्य सरकारचे मंत्री, उमेदवार, मतदार किंवा एजंट वगळता इतर लोकांनी मतदान केंद्रात प्रवेश करू नये.

निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी, तसेच सर्वच नागरिकांनी  आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.