Tuesday, August 10, 2021

"महाराष्ट्रातील 'या' ऐतिहासिक भूमीत पुरंदर किल्ल्यावरील 'स्वराज्याच्या पहिली लढाईच्या' गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा ३७३ वा 'शौर्य दिन' साजरा; 'महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप' यांची स्वराज्याच्या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील 'शौर्यगाथा' प्रेरणादायी"...



सासवड, दि.10 : - युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलेल्या महान स्वराज्यासाठी अनेक शिलेदारांनी, पराक्रमी सरदारांनी, मावळ्यांनी गौरवशाली कामगिरी करून प्रामाणिकपणे व निष्ठावंतपणे साथ दिली. 




पुरंदर किल्ल्यावरील १० ऑगस्ट १६४८ रोजी झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत महापराक्रमी सरदार वीर गोदाजीराजे जगताप यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या फौजेचा पराभव करून  फत्तेखानाच्या फौजेतील प्रमुख सरदार मुसेखानाला ठार केले.


 


स्वराज्याच्या या पहिल्या लढाईत वीर सेनापती बाजी पासलकर, सरदार सुभानराव शिळीमकर, वीर यलजी गोते यांनी मोठा पराक्रम दाखवून स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले. महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी  गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुरंदरच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा शौर्यदिन हा सासवड येथील वीर बाजी पासलकर यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून व महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून हा गौरवशाली 373 वा शौर्यदिन कोरोनाचे नियम पाळून, उत्साहात साजरा केला.




यावेळी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे खंबीर सभासद मा. नगराध्यक्ष  श्री प्रमोद दादा जगताप, श्री अजयकुमार जगताप, श्री दिलीप दादा जगताप, श्री अनिल तात्या जगताप, श्री दीपक आप्पा जगताप, श्री कैलास जगताप, श्री नंदकुमार जगताप, श्री निलेश जगताप, श्री संतोष दादा जगताप, श्री सुनिल जगताप, श्री शेखर जगताप, श्री संदीप नाना जगताप,श्री संतोष जगताप, श्री गणेश जगताप उपस्थित होते.


"स्वराज्याच्या या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील विजयाने दूरगामी परिणाम झाले. स्वराज्यातील रयतेचा व सैन्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाजीराजेंना स्वराज्य स्थापनेसाठी पाठिंबा वाढला व स्वराज्यस्थापनेची वाट सुकर झाली. आजच्या तरुणपिढीने या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अजय कुमार जगताप यांनी दिली.




युगपुरुष शिवाजीराजे यांचे महान स्वराज्य कार्य, गौरवशाली महान इतिहास व स्वराज्याच्या शिलेदारांचा महान इतिहास महाराष्ट्रासाठी तसेच भारत देशासाठीही खूप प्रेरणादायी आहे.


No comments:

Post a Comment