"महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण की दिल्लीची कावेबाज मुसंडी, तरुणाईचे ज्वलंत प्रश्न की जनतेची महागाईने झालेली होरपळ; महाराष्ट्राला 'नवा' ध्येयवादी राजकीय नेता मिळेल का?"
जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने व महान इतिहासाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्राची महान भूमी. देशाला पुरोगामी विचार देणारी, प्रगतीची दिशा दाखवणारी ही महाराष्ट्राची महान भूमी. आजचे महाराष्ट्रातील स्वार्थी, सत्तापीपासू व गलिच्छ राजकारण पाहून सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय,संताप आल्याशिवाय व वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रातील हजारो लोकांनी "मतदानकार्ड विकणे आहे." यासारख्या पोस्ट, मीम्स सोशल मीडियावरती शेअर केल्या. व्हाट्सएप स्टेट्सला ठेवल्या.
मागील 4 वर्षांतील महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा तथाकथित राजकीय भूकंपामुळे खूपच घसरलेला आहे. सत्तापीपासू पक्षीय राजकारण, पक्ष फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण, ईडी - सीबीआय या केंद्रीय संस्थांचा राजकारणासाठी गैरवापर झालेला आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राजकीय पक्षांच्या अभद्र, अनैसर्गिक युत्या, आघाड्या तसेच राजकारणात अनेक वर्ष एकमेकांवरती कडाडून राजकीय प्रहार करणारे,कठोर टीका करणारे, एकमेकांचे राजकीय वाभाडे काढणारे,
कट्टर विरोधक असलेले राजकीय नेते आज सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसून तथाकथित विकासाचे व्हीजन दाखवण्यात मश्गुल असणारी आजची राजकीय परिस्थिती व आपल्या राजकीय विचारसरणीला, पक्षीय धोरणांना या नेत्यांनी दिलेली तिलांजली या सगळ्या गोष्टी पाहून सामान्य मराठी माणसाचा राजकीय व्यवस्थेवरचा, स्वार्थी राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आज महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणूस महागाईने, बेरोजगारीने, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, तरुणाईचे ज्वलंत प्रश्न, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती, खराब रस्ते, आरोग्याचे गंभीर प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, पाण्याचे गंभीर प्रश्न यामुळे होरपळत आहे.
आज पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये राहणारा सामान्य माणूस असो की, ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात राहणारा सामान्य माणूस असो घरातून बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी जावो की व्यवसायासाठी, ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस भरपूर वेळा आपल्या शहरात, आपल्या गावात खराब रस्ते, वाईट झालेली गटार वाहिनीची अवस्था,कचरा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, सरकारी शाळांची दयनीय अवस्था, सरकारी दवाखान्यातील भोंगळ कारभार, विजेचा प्रश्न यासारख्या अनेक गंभीर समस्यांशी तोंड देत सामान्य माणूस संघर्ष करत आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
केंद्र सरकार असो की राज्य सरकार सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घ्यावेत हीच सामान्य माणसाची माफक अपेक्षा असते. 80 रुपयाचे पेट्रोल ज्यावेळेस 117 रुपये पर्यंत जाते. 500 रुपयाचा घरगुती गॅस ज्यावेळेस 1150 रुपये पर्यंत जातो त्यावेळेस सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही.
सामान्य माणसाच्या आयुष्यात खरोखरचे "अच्छे दिन" येण्यासाठी खरंच केंद्र सरकार व राज्य सरकार योग्य धोरणं राबवते का? मनापासून प्रयत्न करते का? हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.
आई-वडील आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज काढून, काबाडकष्ट करून मुलांना इंजिनियर करतात. आज महाराष्ट्रातील लाखो इंजिनियर तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. निराशेच्या गर्देत अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नांमुळे तरुणाईला संघर्ष करावा लागतोय हे भयानक वास्तव आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
सरकारी विभागातील क्लार्क, शिपाई, चतुर्थ श्रेणी पदासाठी देखील उच्चशिक्षित लाखो तरुणाई का अर्ज करते? हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस बेरोजगारीची खरी समस्या कळेल.
महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो मुलांच्या स्पर्धा परीक्षा वेळेवर होत नाहीत. निकाल वेळेवर लागत नाहीत. परीक्षेच्या अभ्यासक्रमा विषयी अडचणी असतात, निकाल लागल्यानंतर अधिकारी पदांच्या नेमणुका लवकर होत नाहीत. यामुळे हजारो तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
"जगाच्या स्पर्धत टिकायचे असेल तर तरुणांना जागतिक पातळीवरचे दर्जेदार उच्च शिक्षण, व्यावसायिक कौशल्य मिळालेच पाहिजे. भारतातील आयआयटी व आयआयएम या दर्जेदार संस्थांमधील दर्जेदार शिक्षण महाराष्ट्रातील किती इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये मिळते? हा देखील संशोधनाचा प्रश्न आहे."
बेरोजगारीने ग्रासलेला मराठी उच्च शिक्षित तरुण ज्यावेळेस एखाद्या नवीन व्यवसायासाठी कर्ज काढून प्रयत्न करताना दिसतो त्यावेळेस त्याची काय अवस्था होते? त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"घरच्यांच्या विरोधापासून ते व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापासून ते मार्केटमधल्या असलेल्या जीवघेणी स्पर्धेपासून ते या व्यवसायातून चांगले उत्पन्न चालू होईपर्यंत धोक्याची टांगती तलवार त्याच्यावर असते. त्याची काय अवस्था होत असेल? हे त्या तरुणांशी संवाद साधल्या शिवाय तरी कसे कळणार."
महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व सर्वच राजकीय पक्षांनी व सर्व सामाजिक संघटनांनी तरुणाईच्या ज्वलंत प्रश्नांबाबतीत व सामान्य माणसांच्या गंभीर प्रश्नाबाबत गांभीर्याने काम केले पाहिजे.
दिल्लीत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा सुरू करू शकतात तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरकारी शाळा का सुरू होऊ शकत नाहीत?
आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळांची काय दयनीय अवस्था आहे? शहरातील अनेक सरकारी शाळांची काय वाईट अवस्था आहे? हे राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सरकारी शाळांची पाहणी केल्यानंतर नक्कीच लक्षात येईल.
सरकारी शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले तर खाजगी शिक्षण संस्थाचालक श्रीमंत होणार नाहीत आणि सामान्य लोकांचा शिक्षणावरचा अवाजवी खर्चही वाचेल.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
दिल्लीत केजरीवाल यांनी सुरू केलेल्या "मोहल्ला क्लिनिक्स" या सरकारी दवाखान्यामुळे गरीब आणि वंचित लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनामूल्य आरोग्य सल्ला, औषधे, निदान आणि शेकडो पॅथॉलॉजिकल चाचण्या मोफत होत असल्यामुळे जनसामान्यांना याचा खूप फायदा होत आहे.
"दिल्लीत सरकारी दवाखान्यात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळतात. दिल्लीतील नागरिकांना 200 युनिट पर्यंत मोफत घरगुती वीज मिळते.मोफत दर्जेदार शिक्षण मिळते तर महाराष्ट्रातील मुलांना सरकारी शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण, महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारी दवाखान्यात दर्जेदार मोफत आरोग्यसेवा, 100 युनिट पर्यंत मोफत वीज का नाही मिळू शकत?"
महाराष्ट्रातील सर्वच पक्षात अभ्यासू,हुशार, मातब्बर नेते असताना देखील हे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? हा खरा सामान्य मराठी माणसाला पडलेला गहन प्रश्न आहे.
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशात आघाडी वरती आहे. देशाला सर्वात जास्त कर देणारे महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील मोठी अर्थव्यवस्था आहे. राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचे 20% योगदान आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही ध्येयवादी राजकीय नेत्याने इच्छाशक्ती दाखवली, धोरणात्मक निर्णय घेऊन प्रामाणिक प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारी दवाखान्यात जागतिक दर्जाच्या मोफत आरोग्यसेवा व 100 युनिट पर्यंत मोफत घरगुती वीज व मुलांना सरकारी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत शिक्षण मिळू शकते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जगातील व भारतातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही ताकदवान असे मोठे पक्ष फोडलेले आहेत हे आता जग जाहीर झालेले आहे. दिल्लीतील विशिष्ट राजकीय गटाने नेहमीच महाराष्ट्रातील मराठी नेत्याने देशाच्या राजकारणात मोठे होऊ नये यासाठी अडचणी निर्माण करून, पंख कापण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून केलेले आहे.
प्रगतशील महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ते आजच्या भारतीय राजकारणातील प्रभावशाली लोकनेते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांनाच या दिल्लीतल्या राजकीय लॉबीने राजकीय खेळया, कटकारस्थान करून नेहमीच अडचणीत आणण्याचा आणि त्यांची देशाच्या राजकारणातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
"भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागील 75 वर्षात एकही मराठी माणूस भारताचा पंतप्रधान का होऊ शकला नाही? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच दिल्लीकरांचे कावेबाज राजकारण सगळ्यांच्या लक्षात येईल."
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तापीपासून राजकारण, फोडाफोडीचे स्वार्थी,कपटी राजकारण,गलिच्छ राजकारण पाहून सामान्य माणसाच्या मनात नक्कीच विचार येतो की महाराष्ट्रातील जनतेचे गंभीर प्रश्न सोडवणारा व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, देशाला अभिमान वाटेल असे खरे विकासाभिमुख राजकारण करणारा एक तरी चांगला ध्येयवादी राजकीय नेता महाराष्ट्राला मिळेल का?"
महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीमध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते सहकारमहर्षी वसंतदादा पाटील, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक, लोकनेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लोकनेते शरद पवार यांच्यापर्यंत अनेक महान नेत्यांचे योगदान आहे.
महाराष्ट्राला अनेक महान राजकीय नेत्यांचा वारसा आहे. पण आजची महाराष्ट्रातील सत्तापीपासू, स्वार्थी राजकीय खेळ्या करून बरबटलेली, नैतिकता हरवलेली, जनतेची दिशाभूल करणारी, लोकशाहीला घातक असलेली राजकीय परिस्थिती पाहून...
"महाराष्ट्रातील जनतेचे गंभीर प्रश्न सोडविणारा, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा व दिल्लीच्या गादीवर मराठी माणसाचा झेंडा फडकवणारा "नवा ध्येयवादी राजकीय नेता" महाराष्ट्राला मिळेल का? असा प्रश्न सामान्य मराठी माणसाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही."
असाच ध्येयवादी, प्रामाणिक, "विकासाभिमुख नवा" राजकीय नेता लवकरच महाराष्ट्राला मिळो हाच आशावाद ठेवुयात.
लेखक : पत्रकार - अजित जगताप, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
No comments:
Post a Comment