Thursday, January 29, 2026

"महाराष्ट्राचे लोकनेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात; बारामतीचे हृदय हरपले, शोकाकुल वातावरणात 'महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांवर' शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; सहकारातील शिलेदार ते महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र ते शब्दाला जागणारा लोकनेता,विकासपुरुष; बारामतीकरांनो आपल्या अजितदादांचे "हे" स्वप्न पूर्ण करा"...

बारामती,दि.२९ : महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर  शोककळा पसरली. महाराष्ट्राचे दिलखुलास, लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील लाखो - करोडो लोकांना धक्का बसला. लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीकरांचे हृदय हरपले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री,लोकनेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती येथील गोजुबावी परिसरात झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. एका कार्यक्षम प्रशासकाचा, लोकनेत्याचा असा अकाली अंत होणे, ही राज्याच्या राजकीय इतिहासातील मोठी पोकळी मानली जात आहे.

​लोकनेते अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी 'लिअरजेट ४५' या खाजगी विमानाने प्रवास करत होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. 'गो-अराउंड' (पुन्हा हवेत उडणे) करण्याच्या प्रयत्नात तांत्रिक बिघाड झाल्याने, विमान शेतात कोसळले आणि क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांनी प्राण गमावले.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर बारा वाजून आठ मिनिटांनी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो लोकांनी व बारामतीकारांनी अश्रूंचा बांध फोडत,आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.

"ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असणारे लोकनेते, राज्याच्या प्रशासनावर उत्तम पकड असलेले ध्येयवादी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील लाखो लोकांचा काळजाचा ठोका चुकला. हजारो बारामतीकर, लाखो अजितदादा प्रेमी शोकसागरात बुडून गेले."

"माझ्या बारामती शहराला देशातील क्रमांक एकचे विकसित शहर बनवायचे आहे." हे लोकनेते अजित पवार यांचे स्वप्न आता बारामतीकरांनाच पूर्ण करावे लागणार आहे. बारामतीकर जनता ही योग्य नेतृत्वाची निवड करून, बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभी राहते. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची राजकीय कारकीर्द ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रगल्भ आणि कार्यक्षम नेतृत्वाचा प्रवास आहे. सहकार क्षेत्रापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जनसेवेतून पोहोचला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

महाराष्ट्राच्या राजकारणात 'दादा' या नावाने लोकप्रिय असलेले अजित पवार हे एक असे नेतृत्व होते, ज्यांच्या नावाशिवाय राज्याच्या राजकारणाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. निर्भीड,स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि वेळेचे पक्के नियोजन या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांची प्रभावशाली राजकीय कारकीर्द ​: -

सहकारातून सत्तेच्या मुख्य प्रवाहात :

लोकनेते ​अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना त्यांचे काका आणि भारताचे ज्येष्ठ नेते,माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून मिळाले. १९८२ मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) अध्यक्ष झाले, जिथे त्यांनी सलग १६ वर्षे आपली पकड कायम ठेवून सहकार क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले.

संसदीय आणि विधानसभा कारकीर्द : 

​अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र, काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. १९९१ पासून ते आजतागायत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेल्या सात दशकांपासून बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण त्यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर घट्ट केले.

​विक्रमी 'उपमुख्यमंत्री' आणि अर्थमंत्री : 

​अजित पवार यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे – त्यांनी सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली.

​अर्थमंत्री म्हणून दबदबा : राज्याचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनावर त्यांची करडी नजर असायची. कामाचा उरक इतका की, सकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे दौरे आणि बैठका सुरू व्हायच्या.

महत्त्वाची पदे आणि योगदान :

​अजित पवार यांनी जलसंपदा, ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

१. सिंचन क्षेत्र : राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले.

२. पायाभूत सुविधा : बारामती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात, पुणे मेट्रो आणि रिंग रोडसारख्या प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता.

३. प्रशासकीय शिस्त : "फाईलवरची सही आणि जनतेचा प्रश्न" यात विलंब न लावण्याची त्यांची शैली अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण करणारी होती.

​कोणत्याही मोठ्या नेत्याप्रमाणे लोकनेते अजित पवार यांची कारकीर्द वादांपासून, धक्कादायक राजकीय वळणांपासून दूर राहिली नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप असोत किंवा पहाटेचा शपथविधी, त्यांनी अनेकदा राजकीय वादळांचा सामना केला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट आणि त्यानंतर त्यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. राजकीय आयुष्यात कितीही मोठी संकटे, अडचणी आल्या तरी आपण घेतलेल्या राजकीय निर्णयाशी ठाम राहून अजित पवार यांनी लोकांसाठी विकास कामांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला.

​अजित पवार हे केवळ बारामतीचे नेते नव्हते, तर ते विकासाची दूरदृष्टी असलेले महाराष्ट्राचे  लोकनेते होते. 'नियोजन' आणि 'अंमलबजावणी' यांचा संगम त्यांच्या कामात दिसायचा.

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, जो शेवटच्या श्वासापर्यंत राज्याच्या विकासाचा, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा विचार करत होता.

अजित पवार यांची कार्यशैली ही 'शब्द दिला तर तो पाळायचाच' आणि 'कामात कसलीही तडजोड नाही' यावर आधारलेली होती. 

अजित पवार यांनी राबवलेल्या ऐतिहासिक योजना :

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा कायापालट : आज आपण जे आधुनिक पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाहतो, त्याचे नियोजन अजित दादांनीच केले होते. विशेषतः 'नदी सुधार प्रकल्प' आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांना त्यांनी आर्थिक बळ दिले.

​जलयुक्त शिवार व सिंचन प्रकल्प : जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित धरणांची कामे मार्गी लावली. 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'च्या माध्यमातून त्यांनी सिंचनाचे जाळे विस्तारले.

महिलांसाठी विशेष धोरण : अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) १% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्यामुळे राज्यातील हजारो महिलांना फायदा झाला.


पुणे जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासाला - अवकाश संशोधन संस्थेला भेट उपक्रम : महाराष्ट्रातील पहिला असा कार्यक्रम आहे ज्यात ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांना थेट नासा भेटीची संधी दिली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात. २०२५ मध्ये निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली, ज्यात नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम आणि सॅन फ्रान्सिस्कोतील टेक कंपन्यांचा समावेश होता. डिसेंबर २०२५ पर्यंत ते परतले. इस्रो भेटीही ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आल्या.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

बारामती विकास मॉडेल : बारामतीला सौर ऊर्जेवर चालणारे शहर बनवणे, तिथे अत्याधुनिक रस्ते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था (विद्या प्रतिष्ठान) उभारणे, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील प्रगतशील वाटचाल हे त्यांच्या विकासाचे 'मॅजिक मॉडेल' मानले जाते.

अजित पवार यांचे भाषण म्हणजे रोखठोक आणि थेट संवाद असायचा. त्यांच्या भाषणाचे काही खास पैलू :

वेळेचे भान : ते भाषणांमध्ये कधीही वेळ वाया घालवत नसत. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट नेहमी वेळेतच होत असे.

​अधिकाऱ्यांना सज्जड दम : "काम करा, अन्यथा खुर्च्या खाली करा," अशा शब्दांत ते भरसभेतून अधिकाऱ्यांना तंबी द्यायचे, ज्यामुळे जनतेमध्ये त्यांची 'काम करणारा नेता' अशी प्रतिमा तयार झाली.

हजरजबाबीपणा : पत्रकारांनी कितीही अवघड प्रश्न विचारले तरी ते आपल्या खास शैलीत आणि कधीकधी विनोदी अंगाने त्याचे उत्तर देत. "माझं चुकलं तर मी जाहीरपणे मान्य करतो," ही त्यांची वृत्ती त्यांच्या भाषणांमधून अनेकदा दिसून आली.

सकाळी ६ ची वेळ : राजकारणात 'पहाटेचा शपथविधी' जितका गाजला, तितकीच त्यांची 'सकाळी ६ ची वेळ' प्रसिद्ध होती. ते पहाटे ६ वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचे. पुण्यातील पुलांची कामे असोत किंवा रस्त्यांची, अधिकारी त्यांच्या भेटीमुळे नेहमी सतर्क असायचे.

​शिस्तप्रिय स्वभाव : एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उशिरा येणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जाहीरपणे टोकले होते. "जर आपल्याला जनतेने सेवा करण्यासाठी पाठवले असेल, तर आपण वेळेवर पोहोचलेच पाहिजे," असे त्यांचे मत होते.

बारामती ते मंत्रालय : विकासाचा वस्तुपाठ

​बारामतीचा विकास हे अजित पवारांच्या कल्पकतेचे प्रगतशील रूप आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि उद्योग या चतु:सूत्रीवर त्यांनी बारामतीचा कायापालट केला. पण त्यांचे कर्तृत्व केवळ बारामतीपुरते मर्यादित नव्हते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे असताना, त्यांनी राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात निधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मेट्रो असो वा समृद्धी महामार्ग, दादांच्या सहीशिवाय आणि त्यांच्या पाठपुराव्याशिवाय प्रकल्पांना गती मिळणे कठीण असायचे.

कार्यकर्त्यांचा 'दादा' : 

​अजित पवार हे कार्यकर्त्यांसाठी निव्वळ नेते नव्हते, तर ते त्यांचे पालक होते. कार्यकर्त्याच्या घरातील लग्न असो वा दु:खाची घटना, दादांची उपस्थिती तिथे असायचीच. गराडा घालून बसणाऱ्या नेत्यांपेक्षा, थेट फोन उचलून "काय म्हणतोय, काय अडचण आहे?" असे विचारणारे दादा कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

कधीही न भरून निघणारी पोकळी : 

​अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'अघोषित पर्व' संपले आहे. संकटाच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासकीय पकड असलेला असा नेता मिळणे कठीण आहे. विमान अपघाताच्या त्या काळ्या दिवसाने महाराष्ट्राचा एक हिरा हिरावून नेला असला, तरी त्यांनी उभ्या केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून 'अजित दादा' हे नाव महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहील.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात बारामती येथे अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून, अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, खासदार मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरज चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, लाखो लोकांनी  बारामती येथे येऊन त्यांच्या लाडक्या अजितदादांचे अंत्यदर्शन घेऊन,अखेरचा दंडवत केला. 

"विकासाची दूरदृष्टी असलेला जननायक, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारा लोकनेता हरपल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा, प्रमाणिकपणे कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांना बळ देणारा लोकनेता हरपल्यामुळे राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी हळहळ व्यक्त केली. जनसामान्यांचा विकास केंद्रबिंदू  ठेवून प्रचंड कष्ट व मेहनत करणारा महाराष्ट्राचा लोकनेता, राजकारणातील जनसामान्यांच्या विकासासाठी लढणारा कोहिनूर हिरा हरपल्याची भावना हजारो लोकांनी व्यक्त केली."

"दादा परत या"... "अजितदादा अमर रहे"... या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामतीत हजारो कार्यकर्त्यांनी अश्रूंचा बांध फोडला. लोकनेते अजित पवार यांच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या हजारो - लाखो लोकांचे प्रेम, दुःख, आक्रोश आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.

No comments:

Post a Comment