वीर, दिनांक 14 : वीर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडा भरापासून पावसाचा जोर वाढू लागल्याने वीर धरण 98.93 टक्के भरले आहे.
गुरुवारी चार फुटांनी उचललेल्या सात दरवाजातून 32 हजार 368 क्यूसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आला होता. शुक्रवारी आज 9 वाजता दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत, धरणाचे पाच दरवाजे चार फुटांनी उचलून 23 हजार 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे अशी माहिती वीर धरण अभियंता विजय नलावडे यांनी दिली.
विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.वीर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे. वीर धरणाच्या पाच दरवाज्यातून 23 हजार 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.
वीर धरण पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या निरा खोऱ्यातील भाटघर धरण 78.91 टक्के, गुंजवणी - 95.81 टक्के, निरा - देवघर 66.07 टक्के भरलेले आहे.
Nice
ReplyDelete