Saturday, October 24, 2020

पुरंदरचा युवा दिग्दर्शक,वीरचा सुपुत्र रोहित धुमाळ यांची "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला....

 

पुरंदर, दि. 24 : पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, युवा दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी दिग्दर्शित केलेली "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज नुकतीच माळरान प्रोडक्शन या युवट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विषय,वास्तव हे आगळ्या,वेगळ्या पद्धतीने मांडून विनोदातून प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी केला आहे.




पुरंदरचे तरुण दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. या विनोदी वेबसिरीजचे खास असे पीक पाणी, शेतकऱ्यांची व्यथा, पाहुणे आले गावात हे तीन भाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, माळरान प्रोडक्शन या युवट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झाले आहेत. ग्रामीण, अस्सल, रांगड्या भाषेतील संवादाने सजवलेली, विनोदातून प्रबोधन करणारी ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय मांडणाऱ्या या वेबसिरीजला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.



महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील निसर्गरम्य, अस्सल ग्रामीण  वातावरणात या वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. रोहित धुमाळ यांनी ग्रामीण भागातील नवीन  तरुण कलाकारांना या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनयाची संधी दिली.




"मनोरंजनासाठी वेगवेगळ्या विषयांवर वेबसिरीजची निर्मिती केली जाते पण आपल्या ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय,आपल्या मातीतली ग्रामीण संस्कृती आगळ्या, वेगळ्या पद्धतीने, विनोदातून प्रबोधन करण्यासाठी 'गावचा सातबारा' ही वेबसिरीज मी दिग्दर्शित केली. असे युवा दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना सांगितले.




ग्रामीण भागातील मित्रांची फौज घेऊन,उपलब्ध कमी साधनसामग्रीचा,तंत्रज्ञानाचा वापर करून  ग्रामीण शेतकऱ्यांच्या विषयावर वेबसिरीज बनवण्याचे धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. अजित धुमाळ यांनी कॅमेरामन म्हणून या वेबसिरीजचे उत्तम चित्रीकरण केलेले आहे. 




या वेबसिरीजमधील तरुण कलाकार वैभव चव्हाण, रोहित धुमाळ,सिद्धेश गवारे,प्रजवल बुणगे,संकेत गवारे,शिव शिर्के व गोविंदा ढमढेरे यांनी उत्तम अभिनय करून कथानकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोहित धुमाळ व श्रेयस गवारे यांनी कथानकाचे अप्रतिम लेखन केल्यामुळे ही वेबसिरीज ग्रामीण लोकांना आपलीशी वाटते.




"ग्रामीण भागातील तरुण दिग्दर्शक ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय आगळ्या, वेगळ्या, खास पद्धतीने वेबसिरीजच्या माध्यमातून मांडतोय हे खूप कौतुकास्पद पाऊल आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या या विनोदातून प्रबोधन करणाऱ्या 'गावचा सातबारा' या वेबसिरीजच्या सर्व टीमला सर्वांनी प्रोत्साहित केले पाहिजे." असे आव्हान महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले. महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या टीमने माळरान प्रोडक्शन प्रस्तुत "गावचा ७/१२" या टीमला शुभेच्छा देऊन कौतुक केले.



Sunday, October 11, 2020

महाराष्ट्राचा प्रेरणादायी सामाजिक योद्धा, खरा देवमाणूस, गरिबांचा कैवारी, जनसामान्यांचा लोकनेता - विकास लवांडे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास....रविवार विशेष लेख...

 

महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात मोठा सामाजिक व राजकीय वारसा मिळालेली अनेक तरुण  नेतेमंडळी मिळालेल्या अनमोल वारस्याचा, पद, पैसा, प्रसिद्धी, घराणेशाहीने मिळालेल्या मोठया राजकीय ताकदीचा योग्य उपयोग करून समाजकारणात व राजकारणात मोठी ताकद निर्माण करून चांगले स्थान निर्माण करतात. पण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सामान्य माणसाला समाजकारणात, राजकारणात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. प्रस्थापित श्रीमंत सरंजामदारांविरोधात खूप मोठी लढाई लढावी लागते. जनतेच्या न्याय हक्कांसाठी, गंभीर प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे अन्यायकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी फार कमी लोक समाजात असतात. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विकास लवांडे यांचा  प्रस्थापित अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा प्रवास, सामाजिक चळवळीतील व समाजहितवादी राजकीय जीवनातील संघर्षमय प्रवास तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.




 कोरोना महामारीने समाजातील सर्वच घटकांना खूप मोठा फटका बसलेला आहे. कोरोना महामारीने भारताच्या व महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडायचा प्रयत्न केला. लाखोंच्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांनी महाराष्ट्र हादरला. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मिळत नव्हते,व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते,ऑक्सिजन बेड व ॲम्बुलन्स मिळत नव्हती म्हणून शेकडो लोकांचा मृत्यू झाला. श्रीमंतांनी मोठया हॉस्पिटलचे आयसीयू बेड 3 महिने बुक केले होते. खाजगी हॉस्पिटलवाले सरकारी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना उपचार देण्यास नकार देत आहेत.  खाजगी हॉस्पिटलवाले अवाजवी, जास्त बिल आकारून सामान्य लोकांची लूटमार करत आहेत  अश्या गंभीर आणि भयानक परिस्थितीत महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून आलेला हा देवमाणूस, गरिबांचा कैवारी, सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा खरा लोकनेता विकास लवांडे. 



कोरोना महामारीच्या काळात एखादया गंभीर रुग्णाला जेव्हा हॉस्पिटल मिळत नाही, हॉस्पिटल मिळाले तरी  व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, या सर्व सुविधा मिळुनही गंभीर अवस्थेतील रुग्ण वाचेल की नाही याची भीती असते,  अश्या परिस्थितीत ज्यावेळेस हॉस्पिटलचे अवाजवी बिल भरायला त्या रुग्णाच्या कुटुंबीयांकडे पैसे नसतात त्यावेळेचा संघर्ष फार भयंकर आणि वेदनादायी असतो. अश्या शेकडो कुटुंबियांना विकास लवांडे यांनी  मदत करून सरकारी योजनेतून मोफत उपचार मिळवून दिले. खाजगी हॉस्पिटलच्या लुटारू व्यवस्थापनाशी संघर्ष करून विकास लवांडे यांनी अनेक लोकांचे अवाजवी, जास्तीचे बिल कमी करून घेतले तसेच सर्वसामान्य , गरीब लोकांना महात्मा फुले योजनेतून कोरोना व इतर गंभीर आजारांसाठी मोफत उपचार मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही जिल्ह्यातुन, कुठल्याही तालुक्यातुन आरोग्यसेवेसाठी फोन आला तरी विकास लवांडे यांनी सर्वांना खूप मदत केलेली आहे.




महाराष्ट्राचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली युवक क्रांती दलाच्या सामाजिक चळवळीत विकास लवांडे यांनी  सलग 14 वर्ष पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून राज्यभर जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी अनेक यशस्वी आंदोलने व उपोषणे केली. दारूबंदीची चळवळ असो की व्यसनमुक्तीची चळवळ असो विकास लवांडे यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन करून, आंदोलने करून, उपोषणे करून, प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून अनेक गावांमध्ये दारूबंदी केली आणि  हजारो माता - भगिनींचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवले.




एक दिवस जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायचे म्हटले तरी अनेकजण घाबरतात पण विकास लवांडे यांनी जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी, डीएड शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, जनसामान्यांच्या विविध गंभीर प्रश्नांसाठी पुण्यात फुटपाथवर  रात्रंदिवस मुक्काम करून 14 दिवस, 16 दिवस, 26 दिवस, 58 दिवस अन्यायग्रस्तांना घेऊन दीर्घकाळाची धरणे आंदोलने यशस्वी करून दाखवली. 




विकास लवांडे यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांनवर  8 दिवसांची, 10 दिवसांची अशी वेगवेगळी उपोषणे केलेली आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते, समाजसेवक डॉक्टर मोहन धारिया यांच्याबरोबर शेतकरी कर्जमाफीसाठी विकास लवांडे यांनीही 7 दिवसांचे उपोषण केले होते त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी उपोषण स्थळी  येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवले होते.






ग्रामविकासाचे ध्येय बाळगलेल्या विकास लवांडे यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदेवाडी या गावचे सरपंच म्हणून पाच वर्षे उत्तम रित्या विकास कामे करून गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आणि गाव दारूमुक्त, हुंडाबळीमुक्त, हागणदारीमुक्त, तंटामुक्ती करून ग्रामीण भागात एक आदर्श निर्माण केला. विकास लवांडे यांनी ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांसाठी हिंगणगाव - शिंदेवाडी येथे लोकनेते दादा जाधवराव ही विनाअनुदानित माध्यमिक शाळा स्थापन करून आजअखेर आदर्श  शाळा म्हणून यशस्वीपणे चालवली आहे. मकरंद अनासपुरे सारख्या प्रसिद्ध कलाकाराने तसेच आदर्श मंत्री बच्चू कडू यांनी या आदर्श शाळेला भेट देऊन गौरव केलेला आहे.




महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी अनेक आंदोलनात विकास लवांडे यांनी सक्रिय सहभागी घेऊन महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असा थेऊर सहकारी साखर कारखान्याचा भ्रष्टाचारी कारभारा विरोधात आवाज उठवून शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठीही विकास लवांडे यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. शेतकरी असो की शेतमजूर,  कामगार असो की शिक्षक, कष्टकरी महिला असो की सुशिक्षित तरुण  कुणीही विकास लवांडे यांच्याकडे कुठलीही गंभीर समस्या घेऊन आले तरी विकास लवांडे माणुसकीने, आपलेपणाने आणि गांभीर्याने ती गंभीर समस्या  समजून घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.  जिल्हाधिकारी,जिल्हाअधीक्षक,विभागीय आयुक्त, सचिव, विविध खात्यांचे मंत्री यांच्या भेटी घेऊन, संपूर्ण पाठपुरावा करून  विकास लवांडे जनतेच्या विविध गंभिर समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.




पुणे जिल्ह्यातील अनेक गावांच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना विकास लवांडे यांनी यशदा आणि जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम केलेले आहे. राज्यभरातही विविध सामाजिक विषयांवर शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. 2011 ते 2015 पर्यंत समाजसत्ता या लोकप्रिय साप्ताहिकाचे संपादक म्हणून विकास लवांडे यांनी उत्कृष्ट कार्य केले. केंद्रीय मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांच्या हस्ते या साप्ताहिक समाजसत्ताचे उद्घाटन झाले होते. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न  विकास लवांडे यांनी साप्ताहिक समाजसत्ताच्या माध्यमातून केला.




समाजकारणासाठी राजकारण हा मूळ पिंड असलेले विकास लवांडे यांनी राजकीय शिक्षण म्हणून जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका अपक्ष म्हणून लोकवर्गणीतून लढवल्या. 2014 ला विकास लवांडे यांनी समविचारी, पुरोगामी विचारसरणीच्या वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 




राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर विकास लवांडे यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचवण्याचा प्रयन्त केला त्यामुळेच अल्पावधीतच विकास लवांडे यांची नियुक्ती पुणे जिल्हा सरचिटणीस पदावर झाली. महाराष्ट्रातील सामाजिक कार्याचा 15 - 20 वर्षांचा अनुभव असलेल्या विकास लवांडे यांनी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा सरचिटणीस झाल्यावर पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. 





 विकास लवांडे यांचे सामाजिक चळवळीतील कार्य आणि पक्षातील प्रामाणिक कार्य पाहून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यातील निवडक 100 युवती व युवक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लोकसंवाद व्यासपीठ निर्माण करण्याची आणि तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी विकास लवांडे यांच्याकडे दिली. 




हे काम यशस्वी केल्यामुळे राज्यभरातील निवडक कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी विकास लवांडे यांच्याकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील निवडक 120 युवक,युवती,महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना 6 महिने लोकसंवाद व्यासपीठाच्या माध्यमातून विकास लवांडे यांनी प्रशिक्षण दिले. राज्यभरातील सर्व जिल्हा स्तरावर निवडक कार्यकर्त्यांना कार्यकर्ता शिबिरात विकास लवांडे यांनी प्रशिक्षण दिले. यातील अनेक राष्ट्रवादी चे कार्यकर्ते महाराष्ट्रात विविध महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.





विकास लवांडे यांचे पक्षातील प्रभावशाली कार्य पाहून 2016 ला पक्षाने विकास लवांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदी निवड केली. विरोधी पक्षाचे प्रवक्ते असताना देखील विकास लवांडे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय चॅनेलवर पक्षाची भूमिका आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडली.





2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक दिगग्ज नेते सोडून जात होते. पक्षातील परिस्थिती गंभीर झाली होती. अश्या प्रतिकूल परिस्थितीतही विकास लवांडे यांनी पक्षाची ध्येयधोरणे, कार्य व भूमिकामहाराष्ट्रात विविध चॅनेलवर खंबीरपणे आणि प्रभावशाली पद्धतीने मांडली. शेतकऱ्यांचे प्रश्न,कामगारांचे प्रश्न, समाजातील विविध घटकांचे प्रश्न विकास लवांडे यांनी विविध चॅनलवरील चर्चेत आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडले. जनतेच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणाविरोधात विकास लवांडे यांनी अनेक वेळा आवाज उठवला.





 जनतेच्या न्याय हक्कांसाठीही विविध आंदोलनाच्या माध्यमातून विकास लवांडे रस्त्यावरची लढाईही लढतच होते. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात यवतमाळ ते नागपूर 259 किमी काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेतही विकास लवांडे सक्रिय सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस मधील तरुण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विधायक कार्यासाठी विकास लवांडे नेहमी मार्गदर्शन करत असतात.




भारतीय संविधानावर पूर्ण निष्ठा असणारे आणि पक्षकार्य निष्ठवंतपणे करणारे विकास लवांडे यांची सामाजिक चळवळीत जडणघडण झाल्यामुळे समाजातील सर्व घटकांसाठी ते प्रामाणिकपणे काम करत असतात. 25 - 30 वर्षांचे प्रभावशाली सामाजिक कार्य करणाऱ्या विकास लवांडे यांच्यासारख्या लोकनेत्यांची खरी गरज महाराष्ट्राला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विकास लवांडे यांनी जी आरोग्य चळवळ सुरू केली आहे ती खूप कौतुकास्पद आहे. पक्षकार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठावंतपणे करणाऱ्या विकास लवांडे यांचे मागील 25 - 30 वर्षातील सामाजिक कार्य फार मोठे आणि प्रेरणादायी आहे




 कुठलाही सामाजिक विषय हातात घेतला तरी कितीही अडचणी येऊद्यात, कितीही संकटे येउद्यात पण विकास लवांडे तो विषय तडीस नेल्याशिवाय राहत नाहीत. सामान्य माणसाची वेदना त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. कुठल्याही प्रसिद्धीची, पदाची अपेक्षा न ठेवता हा जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा देवमाणूस सामान्य माणसाचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून प्रयत्न करतो आणि जनसामान्यांच्या हृदयात मोठे स्थान निर्माण करतो. विकास लवांडे या महाराष्ट्राच्या प्रेरणादायी सामाजिक योद्धयाला  भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली तर महाराष्ट्राचे दुसरे आर. आर. पाटील साहेब आपल्याला बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, आदर्श सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.


लेखक - पत्रकार : अजित श्रीरंग जगताप

संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.






Friday, October 2, 2020

सामाजिक बांधिलकी जपत छावा स्वराज्य सेना यांनी पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबाला केली जीवनावश्यक विविध वस्तूंच्या किटची विशेष मदत....

 

पुरंदर, दि. 2 : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीवादक वीर गावचे  अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ, अंध बहिणीची गंभीर दुखापत, विकलांग बहिणीची वेदनादायी अवस्था या संवेदनशील विषयावरील स्पेशल रिपोर्ट, व्हिडीओ महाराष्ट्र गर्जना न्यूज चॅनेलच्या माध्यमातून  प्रसारित झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनाला हा गंभीर विषय भिडला. महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेली छावा स्वराज्य सेना यांनीही पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेत जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट मदत म्हणून कुडाळकर कुटुंबाला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा विशेष प्रयत्न केला.




पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांचे कुटुंब उपासमारीशी आणि घरातील गंभीर आजाराशी संघर्ष करत होते. महाराष्ट्र गर्जना न्यूजने कुडाळकर यांच्या कुटुंबातील गंभीर परिस्थितीवर, गंभीर समस्येवरती स्पेशल रिपोर्ट बनवून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर या गंभीर विषयाची लोकप्रतिनिधींनी जशी चांगली दखल घेतली, तसी छावा स्वराज्य सेने सारख्या प्रामाणिक सामाजिक संघटनांनीही चांगली दखल घेतली.




कुडाळकरांच्या कुटुंबाची गंभीर,वेदनादायी परिस्थिती पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले, माणुसकीच्या नात्याने आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आमच्या संघटनेच्या माध्यमातून नक्की करू असे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




छावा स्वराज्य सेनेच्या टीमने थेट पुरंदर तालुक्यातील वीर गावातील कुडाळकरांच्या कुटुंबाची भेट घेऊन सर्व सत्य परिस्थिती जाणून घेऊन कुडाळकर कुटुंबाला जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट माणुसकीच्या नात्याने मदत म्हणून दिले. या जीवनावश्यक विविध वस्तूंच्या किटमध्ये 80 किलो तांदूळ, 10 किलो तेल, 2 किलो मीठ, साबनांचा मोठा बॉक्स आणि बिस्किटांचा मोठा बॉक्स  कुडाळकर कुटुंबाला मदत म्हणून छावा स्वराज्य सेनेकडून देण्यात आला. 




यावेळी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री राम घायतिडक पाटील, प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र पडवळ, पिंपरी चिंचवड शहर(विद्यार्थी विभाग)अध्यक्ष श्री अनिकेत बेळगावकर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश चांदणे, श्री नितिन पवार उपस्थित होते.




महाराष्ट्र गर्जना न्यूजने आमच्या कुटुंबातील गंभीर समस्येला वाचा फोडल्यानंतर अनेक लोकांनी मदतीसाठी फोन केले. लोकप्रतिनिधी तसेच अनेकांनी मदतही केली त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. छावा स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने आमच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेत माणुसकीच्या नात्याने आमच्या कुटुंबाला जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट देऊन मदत केली  याबद्दल मनापासून आभारी आहे असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




छावा स्वराज्य सेना ही सामाजिक संघटना नेहमीच समाजातील दुर्लक्षित,पीडित,समस्यांग्रस्त घटकांना मदत करण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असते. कुडाळकर कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने मदत करून चांगली सामाजिक बांधिलकी जोपासली असे वक्तव्य महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक श्री अजित जगताप यांनी केले.





जगाने प्रेरणा घेतलेल्या क्रांतिकारी गांधीविचारांची आज तीव्र गरज - तरुण लेखक संकेत मुनोत यांचा गांधीजयंती विशेष लेख...



 गांधीविचारांची आज तीव्र गरज...


काही लाख इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर राज्य करू शकले त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे जात-पात , धर्म-वर्ग यात विभागलेला समाज. 

काही लोक लढायचे पण त्याला म्हणावा तितका पाठिंबा मिळत नसे. शिवाय सामान्यांना व पददलित वर्गाला तर त्याने काही फरकच पडत नसे. त्यांच्यावर इंग्रजांनी राज्य केले काय, मोगलांनी केले वा पेशव्यांनी केले, त्यांचे तर सगळीकडे हालच होत.


पण जेव्हा महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी काय केले तर  जात ,धर्म, पंथ, वर्ग, लिंग आदी सर्व भेद विसरून देशासाठी लढण्यासाठी एकत्र केले. त्यांच्यात सुराज्य मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जो त्यापूर्वी कोणी निर्माण केला नव्हता.

आज पुन्हा जेव्हा जाती जातीचे मोर्चे पाहतो तेव्हा गांधीविचारांची तीव्रतेने गरज जाणवते.



गांधीजी -जात आणि धर्म

गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात .

एका जातीतील कट्टर लोकांना  पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात.

कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक  गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे  सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.

पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून  गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.

कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे.




गांधीजी आणि जागतिक प्रभाव

त्यांचा भारतावरच नाही तर पूर्ण जगावर प्रभाव आहे हे आपणास माहीतच नसते. 

जगभर २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 130पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापिठ सुरु केली आहेत.


शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत. ( आईनस्टाईन हा मानवी इतिहासातील सर्वात बुध्दीमान माणसांपैकी एक आहे ),


ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो? मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अलीकडचे स्टीव्ह जाॅब्ज, दलाई लामा, आॅंग साॅन स्यु की , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी, अभय बंग, सुधा-नारायनमूर्ती,प्रकाश आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला आणि आजही बदलत आहेत.




गांधीजी व समकालीन महापुरुष


स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.

सर्व महापुरुषांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता त्यांचे मार्ग जरी वेगळे असले तरी ध्येय एकच होते.


आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर नेताजींनी त्यात ज्या  तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते. आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते तर सुभाषचंद्र बोस ना प्रथम नेताजी म्हणणारे गांधीच होते.



शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.




गांधीजी राष्ट्रपिता


‘ गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.


गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते त्यामुळे ते मनुवादी होते असा काही मंडळींचा आरोप असतो


 सत्य - गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..




महात्मा गांधी आणि गोसेवा - 

महात्मा गांधी गोसेवक होते पण गोरक्षणाच्या नावाखाली माणसाला मारायला व माणसा-माणसात भेद पडायला त्यांनी कडाडून विरोध केला होता.

 25 जुलै 1947 सालच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या वेळी गांधींजीनी गोहत्याबंदीसाठी करत असलेल्या उपोषणकर्त्या मित्राला आपल्या भाषणातून खडसावले होते "भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल.जोपर्यंत एखादा माणूस गोहत्या न करण्यास प्रवृत्त होत नाही, तोवर मी त्याला बळजबरी कशी करू? भारतात फक्त हिंदूच नाहीत तर मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोकही राहतात. आता भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे."




गांधीजी आणि अहिंसा- 


एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि  दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही. काश्मीरमध्ये  दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसरकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.  




संघ आणि गांधी


संघातील मंडळी अश्या बाता मारतात कि गांधीजीनी संघाचे कौतुक केले होते म्हणून पण गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्या व तिसर्या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."


(सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद)


कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .

कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.

सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते, बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते .......,खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते तेव्हा हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?


मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?

आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे. 

देशाच्या सरहद्दीवर हजारो सैनिक भगव्या किंवा हिरव्यासाठी लढत नाहीत तर तिरंग्यासाठी लढत आहेत देशाचे ऐक्य तुटेल असे काही करु नका.




शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो


त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य 

मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली

आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.

पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी 

नुसतीच हिकमत पुरी पडत नाही

त्यासाठी ताकदही लागते

भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"

"ज्याला तो क्रूस वागवता येतो 

त्याच्या सोबत बारा अनुयायी असले 

तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.

पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला 

तरी त्याचा महंत होतो.

आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.

मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत


लेखक - 

          या गांधीजयंती विशेष लेखाचे तरुण लेखक संकेत मुनोत हे गांधीवादी विचारसरणीचे लेखक असून  "एक धैर्यशील योद्धा - गांधी" या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि संकलक असून  गांधीवादी विचारसरणीचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार देखील आहेत. चांगले विचार आणि नोविंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स समूहांमार्फत गांधीजींच्या विचारांचा प्रसार करून अनेक उत्तम सामाजिक उपक्रम राबवित असतात.




संपर्क क्रमांक - ८०८७४४६३४६

Knowing Gandhism Global Friends

changalevichar1@gmail.com


Thursday, October 1, 2020

पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर कुटुंबाची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली संपूर्ण जबाबदारी; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचेही विशेष सहकार्य; महाराष्ट्र गर्जना न्यूज इम्पॅक्ट...




पुरंदर, दि. १ : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीवादक वीर गावचे  अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ, अंध बहिणीची गंभीर दुखापत, विकलांग बहिणीची वेदनादायी अवस्था या संवेदनशील,गंभीर विषयावरील स्पेशल रिपोर्ट, व्हिडीओ महाराष्ट्र गर्जना न्यूज चॅनेलच्या माध्यमातून  प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांनी तातडीने हा गंभीर विषय खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहचवला आणि कार्यक्षम खासदार सुप्रिया सुळे यांनी कुडाळकर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी घेतलेली असून मदतीची कार्यवाही सुरू झाली आहे. 






कोरोना महामारी,लॉकडाऊन मुळे समाजातील सर्वच घटकांना मोठा फटका बसलेला आहे. पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांचे कुटुंब उपासमारी आणि कुटुंबातील गंभीर आजाराशी संघर्ष करत होते. कुडाळकरांच्या कुटुंबात  वेदनादायी अवस्था असलेली एक दिव्यांग बहीण आणि एका अंध बहिणीच्या पायाला झालेली गंभीर दुखापत आणि कुटुंबावर आलेली  उपासमारीची वेळ या गंभीर समस्येला महाराष्ट्र गर्जना न्यूज ने वाचा फोडली. पिंटू बाबा कुडाळकर यांनी स्वतः ही  गंभीर परिस्थिती महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या स्पेशल रिपोर्टच्या,व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मांडली. पिंटू बाबा कुडाळकर आणि वीरचे तरुण कार्यकर्ते मयूर मोरे यांनी या गंभीर समस्येविषयी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी संपर्क साधून सर्व गंभीर परिस्थिती सांगितल्यानंतर या गंभीर  विषयावरील, समस्येवरील  स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र गर्जना न्यूजने समाजमाध्यमांवर प्रसारित केला. 




राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हा स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत हा गंभीर विषय पोहचवला. यानंतर सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष देऊन कुडाळकर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून कुडाळकर कुटुंबाचे सर्व प्रश्न आणि अडचणी सोडवणार आहेत असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना सांगितले. पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले की खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातून मला फोन आला होता, सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. सर्व अडचणी सोडवण्यात येतील असे सांगितले आहे. विकास लवांडे यांनीही मला फोन करून सांगितले की सुप्रिया ताई सुळे यांनी तुमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतलेली असून तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यात येतील आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत मिळेपर्यंत मी समन्वयक म्हणून पाठपुरावा करेन. असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजला सांगितले.



शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये पिंटू बाबा कुडाळकर यांची बहीण राणी कुडाळकर या पायाच्या गंभीर जखमेवरील उपचार घेत असून यासाठीची आर्थिक मदत खासदार सुप्रियाताई सुळे करणार आहेत असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.




अंध कलाकार कुडाळकर यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची शासकीय मदत मिळण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्व जिल्हा यंत्रणा आणि तालुका यंत्रणा यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत असे विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजला सांगितले.




कुडाळकर कुटुंबाच्या गंभीर परिस्थितीवरचा स्पेशल रिपोर्ट,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांचे मदतीसाठी फोन आले, काही लोकांनी आर्थिक मदतही केली पण सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्या संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन मदत केल्यामुळे खूप मोठा आधार मिळाला असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.


महाराष्ट्र गर्जना न्यूजने आमच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेऊन हा विषय जनतेपर्यंत आणि लोकोप्रतिनिधींपर्यंत पोहचवुन मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे सहकार्य केले असल्याचे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.



पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन मदत करणाऱ्या आदर्श खासदार सुप्रिया ताई सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते,सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे, आणि ज्या ज्या लोकांनी मदतीसाठी फोन केले, मदतही केली अश्या सर्वांची मदत कुडाळकर कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची असून, समाजातील दुर्लक्षित,पीडित कुटुंबाला सर्वांनीच मदत केली पाहिजे असे आव्हान महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले.