पुरंदर, वीर, दि.०५ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, शनिवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा महाउत्सव असतो.
क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसमुदाय "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.
शनिवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी आठ वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटा भेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीचा भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी आल्या.
यावेळी मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटा भेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.
एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री 2 वाजून ३५ मिनिटांनी श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली.
रात्री २:४५ ला लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.
वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत या शाही लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.
पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.
"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत, पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी माहिती श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.
"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची ऊर्जा देणारा महान सोहळा असतो.
No comments:
Post a Comment