Monday, February 24, 2025

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर नगरीत लाखो भाविक - भक्तांचा जनसागर, 'सवाई सर्जाचं चांगभलं'च्या गजरात, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वीर यात्रा सोहळ्याची लाल रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात, पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"

पुरंदर,वीर, दि. २४ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी,दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक परंपरा जोपासत, रविवारी उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 13 दिवस चालणाऱ्या वीरच्या यात्रेची सांगता झाली.

रविवार पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. 

छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले.  मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली.

तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी  रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने  वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.

या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी भाविक - भक्तांनी गर्दी केली.

या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजल्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो.

या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ,भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.

सकाळपासूनच भाविकांची गर्दी व दर्शनाबारी, पार्किंग, मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करणे याबाबत देवस्थान ट्रस्टने पूर्व नियोजन करीत सर्व विश्वस्त मंडळ जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते. 

या सोबतच महसूल विभाग,   पोलीस प्रशासन, कमांडो स्टाफ (शिल्ड सिक्युरिटी), वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी व पीएमपीएल  बससेवा, विद्यत रोषणाई विभाग, अनिरुद्धा डिझास्टर मेनेजमेंट, होमगार्ड, पोलीसमित्र,हाउसकीपिंग विभाग, गावातील कार्यरत सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट काम करीत आपली सेवा बजावली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले.चालू वर्षाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याकरिता सहकार्य केलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, तसेच कोडीत, कन्हेरी, वाई, सोनवडी, राजेवाडी, भोंडवेवाडी, कसबा(पुणे), वीर पालखी, सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सल्लागार,सहकारी,ग्रामस्थ,पत्रकार बांधव, तसेच श्रीनाथांच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक, देणगीदार, ज्ञात-अज्ञात सर्वांनीच मोलाचे सहकार्य केल्याने यात्रा निर्विघ्नपणे, मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली याचे आम्हाला खूप समाधान आहे." अशी प्रतिक्रिया वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी हे अत्यंत जागृत व भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कलियुगातील दैवत आहे. याची अनेकांनी प्रचिती घेतली आहे. 'खोट्या भ्रष्ट जनावरी ...काळभैरव कोपकरी . जो जो अहंकार करी... श्रीनाथ त्याचा नाश करी.' या उक्तीप्रमाणे श्रीनाथ म्हस्कोबा ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ प्रदान करत असतात. मनुष्य देह हा काम, क्रोध, द्वेष, मोह, मत्सराने सदैव ग्रासलेला असतो परंतु याच्यावरती नामस्मरण,भक्ती हाच सर्वात मोठा उपाय आहे. म्हणून या कलियुगामध्ये काशीकंट काळभैरव श्रीनाथांचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताला श्रीनाथ म्हस्कोबा महाराज सर्व संकटातून मुक्त करून, सदैव आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येत असतात. अशा या भक्तवत्सल श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची कृपादृष्टी सदैव सर्वांवरती राहावी." अशी प्रतिक्रिया  दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो.

No comments:

Post a Comment