Saturday, February 19, 2022

"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज" - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक श्रीमंत कोकाटे यांचा विशेष लेख....



"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज"


धर्मनिरपेक्षता यालाच इंग्रजीमध्ये सेक्युलॅरिझम म्हणतात. ही संकल्पना आधुनिक असून तिचा उदय युरोपमध्ये झाला. आणि वासाहतिक राष्ट्रात तिचा प्रसार झाला. भारत हे ब्रिटिशांचे वासाहतिक राष्ट्र होते. 


पूर्वीपासूनच भारतात बहुसांस्कृतिक समाजरचना आहे. प्राचीन काळापासून अनेक पंथ, संप्रदाय आणि विचारधारा येथे आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील होत्या.




शिवाजी महाराजांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता. परंतु अनिष्ठ परंपरा, चुकीच्या चालीरीती त्यांनी जाणीवपूर्वक नाकारल्या. 




त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज आणि सनातनी व्यवस्था यांच्याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, यांच्याविरुद्ध राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


तो धार्मिक कारणांसाठी नव्हे, धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा संघर्ष सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता. तो राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रकर्षाने पुढे आला. आर्थिक आणि जमीन धारणेसाठी वतनदार - सरंजामदार विरुद्ध त्यांना लढावे लागले. त्यांचा संघर्ष तीन आघाडीवर होता हे स्पष्ट होते.




शिवरायांनी अफझलखान, शाहिस्तेखान यांना धडा शिकवला ते मुस्लीम होते म्हणून नव्हे, तर ते स्वराज्याचे शत्रू होते म्हणून. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाला मारले त्याप्रमाणेच त्याचा वकील कृष्णा कुलकर्णी आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला देखील मारले. यावरून स्पष्ट होते की शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती. 




तर ती अन्याय - अत्याचाराविरुद्ध होती. याउलट खानाच्या मुलांना प्रेमाने वागवले व त्याची कबर बांधण्याचा मदत केली.


आदिलशाहीत दुष्काळ असताना त्यांनी ज्वारी मदत म्हणून पाठवली. दक्षिण दिग्विजयच्या प्रसंगी शिवाजीराजे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला  म्हणाले, "तुम्ही माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ." 




यावरून स्पष्ट होते की तत्कालीन संघर्ष हिंदू - मुस्लीम संघर्ष नव्हता. तो तसा असता तर सर्व हिंदू शिवरायांसोबत आणि सर्व मुस्लिम मोगल - आदिलशहा सोबत असायला हवे होते. 


वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात व प्रशासनात अनेक मुस्लीम होते. त्यांच्या पदरी 700 पठाणांची फौज होती. त्यांचे काही अंगरक्षक मुस्लिम होते.



पायदळात नूरखान बेग होता. सिद्दी हिलाल, सिद्धी वाहवा होता. दर्यासारंग दौलतखान आरमार दलाचा प्रमुख होता.


शिवाजीराजांचे चित्र रेखाटणारा मीर महंमद होता. शिवरायांनी स्वधर्माप्रमाणेच इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांना व धर्मग्रंथांना अभय दिले. 




सुरत मोहिमेच्या प्रसंगी त्यांनी सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आणि धर्मगुरू यांना इजा पोचणार नाही याची काळजी घेतली. "ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा" ही त्यांची भूमिका होती.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पोर्तुगीज व्हाईसरॉय त्याच्या देशातील राजाला पाठवलेल्या पत्रात कळवतो की, "पूर्वेकडच्या जगातील शिवाजी महाराज हे पराक्रमी, मुत्सद्दी आणि धोरणी राजे आहेत. ते आणि त्यांची प्रजा जरी मूर्तिपूजक असली तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांना ते आपल्या राज्यात नांदू देतात.


परधर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांवर त्यांनी आक्रमण केले नाही. आपल्या धार्मिक संकल्पना इतर धर्मियांवर त्यांनी लादल्या नाहीत. स्वधर्माचा अभिमान बाळगताना बहुसांस्कृतिक धोरणाचा आदर - सन्मान करणारा, मध्ययुगीन काळातील प्रगल्भ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 




ज्या काळात युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता या संकल्पनेने बाळसंही धरले नव्हतं; त्या काळात शिवाजीराजांच्या स्वराज्यात धर्मनिरपेक्षतेचा वटवृक्ष झालेला होता. त्या सावलीत हिंदू-मुसलमान आनंदाने नांदत होते. असे महाकवी वामनदादा कर्डक एका काव्यात म्हणतात.



लेखक : - शिवचरित्राचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेष्ठ अभ्यासक, पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक, डॉक्टर श्रीमंत कोकाटे





No comments:

Post a Comment