वाई, बावधन, दि.१३ : महाराष्ट्रातील सर्वात मोठे बगाड, सातारा जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील, ३५० वर्षांची परंपरा असलेले बावधनचे ऐतिहासिक बगाड. रविवारी बावधनची ऐतिहासिक बगाड मिरवणूक लाखो भाविकांच्या उपस्थितीत,बावधनकरांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे उत्साहात संपन्न झाली. बावधनकर ग्रामस्थांची एकजूट, भैरवनाथ देवस्थान कमिटी व बावधनचे ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ऐतिहासिक बगाड यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
वाई तालुक्यातील, बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक, काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात, भक्तिमय वातावरणात, रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राज्यातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील ही बावधनची बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेते.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर याठिकाणी रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोहोचले.
बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्यापूर्वी बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.
यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ.
या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला.
या बगाड्याला घेऊन हे 20 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढण्यात आले. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या.
साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. या पालख्यांचे भाविकांनी दर्शन घेतले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बगाड वाई - पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पोहचले. सातारा जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला.
काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत आली. बगाड गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या.
"काशीनाथाचं चांगभलं"च्या गजरात रात्री आठ वाजता बगाड मिरवणूक,वाद्यांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात बावधन गावात पोहचली.
"आमच्या बावधनची बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ३५० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या बगाड यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरवात होते.रंगपंचमी दिवशी बगाडाचा उत्सव असतो.भैरवनाथ देवस्थान कमिटी बावधन व बावधन ग्रामस्थ यांच्या एकजुटीने व अत्यंत चांगल्या नियोजनामुळे बगाड यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडतो." अशी प्रतिक्रिया बावधन गावचे ग्रामस्थ, भक्त धनाजी दाभाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
बावधनच्या या ऐतिहासिक बगाड यात्रेसाठी सातारा जिल्हाधिकारी प्रशासन, वाई तालुका प्रशासन, सातारा जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण विभाग तसेच सरकारी विभागांचे सहकार्य मिळाले.
बावधनच्या बगाड यात्रेची "अशी" असते महान परंपरा : -
सातारा जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा.
सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झालेले असतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैल. या उत्सवाला सुरवात होते ती नव्याच्या पौर्णिमेपासून. बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात.
हे कळक तोडण्यासाठी आख्खं गाव जमा होतं. कळकांच्या बेटाजवळ गेल्यानंतर सर्वात मोठं कळक याठिकाणी शोधलं जातं आणि ते कापून वाजत गाजत गावात आणलं जातं. त्यानंतर गावाकरी आपला मोर्चा बाभळीच्या झाडाकडे वळवतात.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
लाकडातील चिवट लाकूड म्हणून बाभळीच्या झाडाकडे पाहिलं जातं. या बगाडासाठी खास बाभळीची लाकडं तोडून तीही वाजत गाजत गावात आणली जातात. आणि ही बाभळीची लाकडं आणण्यासाठी गावातील एकोप्यातील जल्लोष पहायला मिळतो.
फाल्गुन शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण गावातील भक्त मंडळींकडून गावचं मंदिर साफसफाई आणि धुण्याचं काम सुरु होतं. यालाच पाकळणी असं म्हणतात. माघाची पौर्णिमा म्हणजे, भक्तांचा उत्सव आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचं कौतुक. या दिवशी नाथांच्या भगीनी भवानी आई आणि जननी आई यांच्या मंदिरापासून काठ्या निघतात.
बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगीनिंना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे. या दिवशी नाभिक समाजाला खास महत्व दिलं जातं.
मानाचं पान लाभलेला नाभिक समाज दिवटीचं टोक मनगटावर टोचून वाद्यांच्या गजरात काट्या नाचवत या दोन्ही भगिनींना मंदिरात आणतात. मंदिरात आल्यानंतर हे दिवटीच टोक बाहेर काढलं गेलं आणि बोंब ठोकून देवाच्या नावानं जयघोष केला गेला. आणि नंतर सुरु होतो तो हळदीचा कार्यक्रम.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पंचक्रोषीत बारा बलुतेदार आणि मानाच्या महिला या हळदीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हळदीच्या कार्यक्रमात देवाला हळद लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतो.
प्रत्येक वर्षी गावातील लोहाराला एक वेगळा मान असतो आणि यांच्या हातून मानाचा नाल या मंदिराला ठोकला जातो.
सध्या या मंदिरावर असलेल्या नालांची संख्या सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. म्हणजे तीनशे पेक्षा जास्त वर्ष या बगाडाचा उत्सव सुरु असल्याचं सांगितलं जातं. हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि याच दिवसापासून या बगाडाच्या यात्रेची सुरुवात होते.
छान माहिती.... चांगभलं
ReplyDelete