Thursday, June 27, 2024

"पुरंदरच्या डोंगररांगातील "या" आदिवासी पाड्यावर,शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाचे "हे" महत्वपूर्ण शेतकरी प्रशिक्षण; फळबाग लागवड योजना, अनुदान व कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी हिताच्या "या"योजनांचे मार्गदर्शन"...


पुरंदर, दि.२७ : शेतकरीराजा व शेती हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. संपूर्ण देशाची भूक भागवणारा शेतकरी राजा कष्ट, मेहनत करून, प्रामाणिकपणे शेती व्यवसाय करून देशाची सेवा करत असतो. आधुनिक शेती करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन, शेतकरी राजाला त्याचा फायदा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग कार्यरत आहे.


महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्यावतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील, पुरंदर किल्ल्याच्या भोवती असलेल्या  मिसाळवाडी, आदिवासी पाडा येथे पुरंदर तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.


मिसाळवाडी हे संपूर्ण गाव आदिवासी समाजाचे आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी सहाय्यक दिनेश धायगुडे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आंबा, सिताफळ, बांबू लागवड , आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान बाबत माहिती दिली. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या कार्यक्रमात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत  ट्रॅक्टर , पॉवर टिलर, पावर विडर ,पेरणी यंत्र, कुट्टी मशीन इत्यादीसाठी मिळणारे अनुदान याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.


या शेतकरी हितांच्या योजनांबाबत मार्गदर्शन करून या योजनांचे अर्ज ऑनलाईन महा-ई-सेवा केंद्रावर करण्याविषयी शेतकऱ्यांना सांगितले.


कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी शेतकऱ्यांना भात शेतीमधील "चार सुत्री भात शेती" बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच भात रोपवाटिकेमध्ये जास्त पाणी साठवून देऊ नये .जास्त पाणी झाल्यास पाणी बाहेर काढून द्यावे. रोपवाटिकेत खोडकिडा, खेकडे यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दाणेदार फोरेट, दहा टक्के, किंवा दाणेदार क्लोरोपायरीफॉस दहा टक्के, प्रती हेक्टरी दहा किलो या प्रमाणात शेतात द्यावे.


रोपवाटिकेत रोपांना करपा, कडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कारबेनडिझीम किंवा हेक्झांकोण्याझोल यासारखे बुरशीनाशक दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात ,मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

मिसाळवाडी आदिवासी पाडा,  चिवेवाडी  पाडा या ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भाताची रोपे चांगली उगवून आली आहेत. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

इंद्रायणी या तांदळास सरासरी साठ रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे या परिसरामध्ये इंद्रायणी या भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते.


"कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांनी शासनाच्या आंबा, नारळ, सिताफळ या फळझाड लागवडी सोबतच बांबू लागवड योजनेचाही लाभ घ्यावा." अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



"महाडीबीटी योजनेमधून यांत्रिकीकरण व इतर योजनांचे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करावेत आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा." असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी केले.


"पिकामध्ये रोपांची नियंत्रित लागवड करावी व  युरिया ब्रिगेड या खताचा वापर करावा." अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी अनिल  धुरगुडे यांनी दिली.


"आत्ता रोपे दहा ते बारा दिवसाची झाली असून ,अजून दहा ते पंधरा दिवसांनी लावणीस योग्य होतील." असे कलिका अंकुश मिसाळ यांनी सांगितले.



यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत एकात्मिक गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत , नॅशनल सीड कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे ,सूर्यफूल KBSH -८५ या वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी माजी सरपंच श्री. नारायण धोंडीबा पवार , माजी सरपंच श्री.अनिल श्रीरंग रांजणे, उद्धव दिवाणजी दरेकर, बाळासो धोंडीबा पवार, ईश्वर झुका दरेकर, अनंता साहेबराव नाईलकर, गणेश मिसाळ, कलिका अंकुश मिसाळ व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

पुरंदर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर  जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, शेतकरी हिताच्या वेगवेगळी योजनांची माहिती देणे. या उपक्रमाविषयी शेतकऱ्यांकडून पुरंदर कृषी विभागाचे कौतुक केले जात आहे.


शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

Sunday, June 23, 2024

"मराठा आरक्षणासाठी, सगे सोयरे अधिसूचना अंमलबजावणीसाठी पुरंदर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मराठा समाजातील मुला - मुलींचे शिक्षण 100% मोफत करण्याची मागणी"...


पुरंदर,सासवड,दि.२३ : मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नामुळे संपूर्ण राज्यभर करोडो मराठा युवकांमध्ये अस्वस्थता आणि आक्रोश निर्माण झालेला आहे. पुरंदर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नांसाठी ऐतिहासिक आंदोलने केलेली आहेत.


मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला सगे - सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे बाबत मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने आढावा बैठक ऐतिहासिक शिवतीर्थ, सासवड येथे घेण्यात आली . 

महाराष्ट्रातील मराठा समाजाला सगे - सोयरे सहित ओबीसी मधून सरसकट आरक्षणांमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवला आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

मराठा आरक्षणाच्या याच मुख्य मागणी करता अनेक वेळा शासनाकडून खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे. अशी करोडो मराठा युवकांची भावना आहे.


या मागणी करता अंतरवाली सराटी येथे दिनांक 8 जून 2024 पासून संघर्ष योद्धा  मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते. 


मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी राज्यातील लाखो - करोडो मराठा समाज बांधवांचा खंबीर पाठिंबा दिसून येत आहे.


मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा हा ऐतिहासिक लढा देशभर गाजलेला असून या लढ्यात मराठा तरुणाईचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. दिनांक 16 जून 2024 रोजी शासनाच्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. 


यापूर्वीही मराठा समाजाने महाराष्ट्र शासनाला मुदत दिली होती, परंतु सदर मुदतीमध्ये मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली गेली होती.याच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चा पुरंदर तालुक्याच्या वतीने वेळोवेळी शिवतीर्थ सासवड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते.


"पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले शंभर दिवसाचे ऐतिहासिक आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजले होते." 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना व त्यांच्या सगे - सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाच्या मुला - मुलींसाठी शिक्षण 100% मोफत करावे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करू नये,अथवा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जागा रिक्त ठेवाव्यात; संपूर्ण राज्यातील मराठा  आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत."अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देऊन करण्यात आली. 


"महाराष्ट्रातील करोडो मराठा बांधवांच्या  हक्कांसाठी हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल. राज्य सरकारने सगे सोयरे अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण द्यावे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, मराठा क्रांती मोर्चा चळवळीतील कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना  मराठा महासंघाचे प्रशांत वांडेकर, शलील जगताप, अनिल जगताप, सासवड शहराध्यक्ष संदीप जगताप, सागर नाना जगताप, बाळासाहेब भिंताडे, अभिजीत जगताप, बंडूकाका जगताप, शिवाजी कोलते, शामकांत भिंताडे, माजी नगरसेवक नंदू जगताप, स्वप्नील गायकवाड, सागर जगताप तसेच


महेश सणस, अमोल कड, प्रकाश शिंदे, अमित पवार, आकाश शिळीमकर, योगेश कोलते, अभिजीत दाते, अमोल जगताप, जितेंद्र जाधव, राजेंद्र जगताप, समीर दिवसे, राहुल लिंबोरे, मधुकर जगताप, दीपक गायकवाड, रमेश पवार, योगेश गायकवाड, शंकर मेमाणे, विश्वनाथ भोंडे, अभिषेक देशमुख, आयुष देशमुख, तुषार जगताप, स्वप्नील कुदळे, प्रशांत दाबणारे, दीपक गायकवाड आणि असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर करोडो मराठा युवकांचा आक्रोश व अस्वस्थता समजून घेऊन  न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे मराठा आरक्षण द्यावे. अशी भावना मराठा समाजातील तरुणाई व्यक्त करत आहे.

Thursday, June 13, 2024

"१९ वर्षानंतर रंगला मैत्रीचा सुखद अनुभव देणारा, शिक्षक - गुरुजनांचा आशीर्वाद लाभलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा; वीर येथे 2005 मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा "हा" सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात संपन्न, देशसेवा करणाऱ्या "या" शिलेदार मित्रांचाही स्नेह मेळाव्यात ऑनलाइन सहभाग"...


पुरंदर,वीर,दि.१३ : भारतीय संस्कृतीत गुरु - शिष्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते श्रेष्ठ मानले जाते. शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थी व शिक्षकांसाठी खूप संस्मरणीय असतात.पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथे दहावीच्या 2005 मधील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात व पुन्हा एकदा मैत्रीचा सुखद अनुभव देणाऱ्या आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


"आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते."

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत.


रविवारी 9 जून रोजी  रविंद्रनाथ टागोर विद्यालय वीर  येथे २००४-२००५ मध्‍ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी एकत्र येऊन, पुन्हा एकदा शाळा भरली. आणि शाळेतील त्या जुन्या आठवणींना, सोनेरी दिवसांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणींची खूप मोठया कालावधीनंतर भेट झाली. 


या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा भरवत, सर्व मुले-मुली वर्गामध्ये ओळीत दाखल झाले. सर्व शिक्षकांचे - गुरुजनांचे स्वागत, औक्षण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश समगीर आणि अश्विनी धसाडे यांनी केले तसेच प्रास्ताविक दिनेश जाधव यांनी केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या विद्यालयाचे माजी विद्यार्थी ए.पी.आय.विकास शिंदे, महेश चवरे, महेश समीर, स्वप्नील वाघ, श्रीकांत वचकल,दिनेश जाधव, अश्विनी धसाडे, शितल वचकल,  यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. 


अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी या कार्यक्रमानिमित्त  १९ वर्षांनंतर एकमेकांना भेटले.त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपल्या शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.


शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ. बापुजी साळुंखे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

आजमितीला हयात नसलेल्या मित्रांना व शिक्षकांना अत्यंत भावपुर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरु झाला.


"या माजी विद्यार्थी - शिक्षक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांची प्रगतशील वाटचाल व भेट ही सर्वांसाठीच संस्मरणीय असेल. अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील" अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना धुमाळ सर, एन बी राऊत सर, गावडे सर, भोसले सर, पाटील सर, भिसे सर व भिसे मॅडम, धुमाळ मॅडम, शिंदे मॅडम, दुर्गाडे मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले. आजच्या सोशल मीडियाच्या, टेक्नॉलॉजीच्या जमान्यात 19 वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन या सोहळ्याच्या निमित्त एकमेकांना भेटून संवाद साधत होते.

प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, आपल्या शाळेचे बदललेले रूप व मनाला आनंद देणाऱ्या मित्रांच्या भेटी डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक पी. एल कुंभार सर यांनीही शुभेच्छा दिल्या. रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या प्रशालेच्या प्रगतशील वाटचालीमध्ये कुंभार सर यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"देशाची सेवा करत असताना देखील आपल्या मित्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. देशासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना देखील  दत्ता साळुंखे(फौजी), उमेश वचकल (SSB सशस्त्र सीमा बल जवान), योगेश कदम(फौजी) या देश सेवा करणाऱ्या शिलेदार मित्रांनी  ऑनलाईन या वीर येथील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला हजेरी लावुन आपले मनोगत व्यक्त केले. यामुळे सर्व मित्र परिवाराला एक सुखद अनुभव मिळाला.


या शाळेच्या सर्व शिक्षकांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन, भावी आयुष्यातील प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून, शुभेच्छा दिल्या.


या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी  शिक्षक वर्ग, विद्यालयाचा कर्मचारी वर्ग, या विद्यालयाचे कर्मचारी हिरामण जाधव आवर्जून उपस्थित होते. "आम्ही तुमच्यामुळेच घडलो हे भाव मनी जपत, आपोआप कित्येक जणांचे हात त्या गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते, नतमस्तक होत होते. वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.


या कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षकांचा, मान्यवरांचा शाल, श्रीफळ , आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  


या माजी विद्यार्थ्यां स्नेह मेळावा  कार्यक्रमासाठी सर्व विवाहित मुलींनी आपल्या घरातुन  दिलेला प्रतिसाद आणि त्यांची राहीलेली उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती. 

या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला व शिक्षक - विद्यार्थी भेटीची भविष्यातील आठवण रहावी म्हणून रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथील प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून एक चांगला सामाजिक उपक्रम राबविण्यात  आला.


यानंतर संगीत खुर्ची, रस्सीखेच यांसारखे मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले व हसत खेळत या कार्यक्रमाची सांगता झाली.


या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी रविंद्रनाथ टागोर विद्यालय वीर,श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर, वन परिक्षेत्र अधिकारी सासवड, अस्तित्व प्रतिष्ठान वीर यांचे  सहकार्य लाभले असे दिनेश जाधव यांनी सांगितले.


"१९ वर्षानंतर रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर येथे 1999-2005 बॅचचे  आमचे वर्गमित्र- मैत्रिणी हे  शिक्षकांसह  पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा एकदा शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आमच्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये शाळेचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.आम्ही पुन्हा  एकत्र येऊन आमच्या वीर गावच्या शाळेमध्ये अजून कसे चांगले गुणवत्तापूर्ण आणि वैविध्यपूर्ण शिक्षण मिळेल.यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहणार आहोत." अशी प्रतिक्रिया सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आजच्या धकाधकीच्या, व्यस्त जीवनामध्ये 19 वर्षानंतर या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, वीर येथे स्नेह मेळावा आयोजित करून, सर्व गुरुजनांचे - शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन, वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम राबवून, समाजात एक चांगला संदेश दिला. निस्वार्थ, प्रेमळ मैत्रीतला आनंद हा सर्वांनाच ऊर्जा देणार असतो.


रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर या प्रशालेने अनेक कर्तुत्ववान विद्यार्थी घडवलेले आहेत.