पुरंदर,सासवड,दि.२३ : मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नामुळे संपूर्ण राज्यभर करोडो मराठा युवकांमध्ये अस्वस्थता आणि आक्रोश निर्माण झालेला आहे. पुरंदर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नांसाठी ऐतिहासिक आंदोलने केलेली आहेत.
मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला सगे - सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे बाबत मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने आढावा बैठक ऐतिहासिक शिवतीर्थ, सासवड येथे घेण्यात आली .
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सगे - सोयरे सहित ओबीसी मधून सरसकट आरक्षणांमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवला आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मराठा आरक्षणाच्या याच मुख्य मागणी करता अनेक वेळा शासनाकडून खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे. अशी करोडो मराठा युवकांची भावना आहे.
या मागणी करता अंतरवाली सराटी येथे दिनांक 8 जून 2024 पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी राज्यातील लाखो - करोडो मराठा समाज बांधवांचा खंबीर पाठिंबा दिसून येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा हा ऐतिहासिक लढा देशभर गाजलेला असून या लढ्यात मराठा तरुणाईचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. दिनांक 16 जून 2024 रोजी शासनाच्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.
यापूर्वीही मराठा समाजाने महाराष्ट्र शासनाला मुदत दिली होती, परंतु सदर मुदतीमध्ये मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली गेली होती.याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा पुरंदर तालुक्याच्या वतीने वेळोवेळी शिवतीर्थ सासवड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
"पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले शंभर दिवसाचे ऐतिहासिक आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजले होते."
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना व त्यांच्या सगे - सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाच्या मुला - मुलींसाठी शिक्षण 100% मोफत करावे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करू नये,अथवा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जागा रिक्त ठेवाव्यात; संपूर्ण राज्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत."अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देऊन करण्यात आली.
"महाराष्ट्रातील करोडो मराठा बांधवांच्या हक्कांसाठी हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल. राज्य सरकारने सगे सोयरे अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण द्यावे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, मराठा क्रांती मोर्चा चळवळीतील कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना मराठा महासंघाचे प्रशांत वांडेकर, शलील जगताप, अनिल जगताप, सासवड शहराध्यक्ष संदीप जगताप, सागर नाना जगताप, बाळासाहेब भिंताडे, अभिजीत जगताप, बंडूकाका जगताप, शिवाजी कोलते, शामकांत भिंताडे, माजी नगरसेवक नंदू जगताप, स्वप्नील गायकवाड, सागर जगताप तसेच
महेश सणस, अमोल कड, प्रकाश शिंदे, अमित पवार, आकाश शिळीमकर, योगेश कोलते, अभिजीत दाते, अमोल जगताप, जितेंद्र जाधव, राजेंद्र जगताप, समीर दिवसे, राहुल लिंबोरे, मधुकर जगताप, दीपक गायकवाड, रमेश पवार, योगेश गायकवाड, शंकर मेमाणे, विश्वनाथ भोंडे, अभिषेक देशमुख, आयुष देशमुख, तुषार जगताप, स्वप्नील कुदळे, प्रशांत दाबणारे, दीपक गायकवाड आणि असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर करोडो मराठा युवकांचा आक्रोश व अस्वस्थता समजून घेऊन न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे मराठा आरक्षण द्यावे. अशी भावना मराठा समाजातील तरुणाई व्यक्त करत आहे.
No comments:
Post a Comment