आण्णा टीमची राजकीय पक्षांशी तुलना करूच नका कारण आण्णा कायम राजकीय पक्षांना शिव्या देत आलेत. द्वेष करत आलेत , स्वतःला अराजकीय म्हणत इतरांना कायम तुच्छ लेखत आहेत. जो राळेगणला येऊन पायावर डोकं ठेवील तोच आपला ही अण्णांची मुख्य अट असते. देशात फक्त आण्णा प्रामाणिक बाकी सर्वजण चोर आहेत , बाकी पुरोगामी प्रतिगामी वगैरे व्याख्या अण्णांनी स्वतः जाहीरपणे सांगाव्यात पण कुणाचा सल्ला न घेता सांगाव्यात , अण्णांची विचारधारा नेमकी कोणती खुद्द अण्णांना तरी माहीत आहे काय ?
उपोषणाचे हत्यार बोथट करून आण्णा स्वतःला दुसरा गांधी समजू लागले आहेत. गांधीजी तत्वनिष्ठ होते त्यांना स्वतःचे स्पष्ट असे विचार होते. आण्णा स्वतःला फकीर म्हणवतात कारण संसार झेपला नसता. संसारी माणसांची दुःख अडचणी त्यांना कशा कळणार ?
भाजप वगळून सर्व राजकीय पक्षांना शिव्या देत मध्यम वर्गीय लोकांची दिशाभूल करत अराजक आणण्यासाठी आण्णा आजपर्यंत अपयशी ठरले आहेत. संघटना म्हणजे सासू असते असे अण्णांचे मत आहे म्हणून इतक्या वर्षात संघटना उभी करू शकले नाहीत कारण मग मनमानी करता आली नसती.
मनमानी करता यावी म्हनून दरवेळी नवीन आण्णा टीम उभारली जाते. एक लोकपाल आंदोलनातील आण्णा टीम सध्या भाजपच्या सत्तेचे लाभार्थी बनले आहेत. हा डुप्लिकेटपणा आता उघड झाला आहे.
आण्णा म्हणजे ढोंगीपणा हे आता उघड सत्य कुणीच नाकारू शकत नाही. भारतरत्न मिळण्याच्या आशेवर भाजपला बिनधास्त समर्थन करत राहावे कारण तूमची राज्यघटनेच्या व गांधीजींच्या तत्वांशी बांधिलकी कधीच नाही.
बाकी आम्ही राजकीय पक्षाचे लोक बदनाम आहोतच कारण आम्ही संत नाहीत. आण्णा तुमचा चेहरा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने दरवेळी मोठा केला तुम्हाला दरवेळी महत्व दिले तुमच्या पत्रांना मुख्यमंत्री ,पंतप्रधान उत्तर द्यायचे तुमच्या बरोबर चर्चा करायचे हीच त्यांची घोडचूक होती काय ?
लेखक : - सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, विकास लवांडे.
No comments:
Post a Comment