Monday, January 31, 2022

"सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील "या" प्राथमिक आरोग्य केंद्रातील 'कुटुंब नियोजन - मोफत स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात "या" डॉक्टरने घेतली मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीर रक्कम; फलटणचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांचे 'लेखी तक्रार' करण्याचे आवाहन"....


फलटण, साखरवाडी, दि.31 : - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मोफत कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरामध्ये  स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांकडून या शिबिरातील डॉक्टर कदम यांनी भुलीच्या शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीरपणे हजारो रुपयांची रक्कम उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक जानेवारी रोजी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या साखरवाडी पंचक्रोशीतील महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टर कदम यांनी सिझेरियन प्रसूती झालेल्या महिला रुग्णांच्या स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नातेवाइकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये भुलीसाठीचे शुल्क म्हणून बेकायदेशीर रक्कम गोळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.




"फलटण तालुक्यातील साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर  कारवाई करू. तसेच ज्या महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे शुल्क, पैसे घेतलेले असतील त्यांनी लेखी तक्रार सातारा जिल्हा आरोग्य कार्यालयात येऊन द्यावी."  अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिसन पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरामध्ये जर डॉक्टरांनी बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील तर ते खूप चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही करायला लावू आणि  जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर  कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या महिला रुग्णांच्या नातेवाइकांकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील त्यांनी माझ्याकडे तक्रार द्यावी. मी या प्रकरणात विशेष लक्ष घालून पुढील योग्य त्या कारवाईसाठी  प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया फलटणचे लोकप्रिय आमदार दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मोफत केल्या जाणाऱ्या कुटुंबनियोजन स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे पैसे घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला लावून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया फलटण तालुक्यातील प्रसिद्ध युवा नेते, साखरवाडीचे मा. सरपंच विक्रमसिंह भोसले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन - स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया  सुविधा मोफत उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून  सरकारी रुग्णालयांना, संस्थांना, दरवर्षी लाखो - करोडो रुपयांचे अनुदान मिळत असते. सरकारी रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळणार्‍या मोफत सुविधांसाठी जर नागरिकांना कुठल्याही सरकारी आरोग्य सेवकाकडून  किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर शुल्क आकारले तर त्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे करावी.



केंद्र सरकार, राज्य सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते त्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. सरकारी रुग्णालयांमधील नागरिकांसाठी असणाऱ्या मोफत सुविधांसाठी नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर शुल्क दिले नाही पाहिजे.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीच्‍या नियंञणासाठी राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम राबविला जातो. सहाय्यक अनुदान योजना ही सदर कुटूंब कल्‍याण कार्यक्रमाचाच एक भाग असून ती योजना सन १९६० मध्‍ये सुरु झालेली आहे.



भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीवर नियंञण ठेवण्‍यासाठी राष्‍ट्रीय कुटुंब कल्‍याण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. सध्‍या या कार्यक्रमासाठीचे अनुदान राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान अंतर्गत आरसीएच पीआयपीमधून देण्‍यात येते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



महाराष्ट्रात राष्‍ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, स्‍ञी रुग्‍णालये, सामान्‍य रुग्‍णालये, महानगरपालिका रुग्‍णालये आणि मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍था यांचे मार्फत केली जाते. या सर्व केंद्रामध्‍ये उपकेंद्र वगळता बहुतांश इतर सर्व ठिकाणी शस्‍ञक्रियेच्‍या सुविधा उपलब्‍ध आहेत.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते.


जिल्हयात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दरमहा टाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे व निश्‍चित केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत योग्य लाभार्थीना प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातो.





Sunday, January 30, 2022

"महात्मा गांधीजींच्या बालपणातील "या" प्रसंगामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी; भावाला कर्जातून सोडवण्यासाठीचा हृदयस्पर्शी प्रयत्न, वडिलांचे हृदय आले भरून; मारहाणीपेक्षा वडिलांचे प्रेमाचे संस्कार" - आत्मप्रेरणा पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मण जगताप यांचा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त "जगाला कल्याणकारी अहिंसेचा विचार देणारे महापुरुष महात्मा गांधीजी" विशेष लेख...



 "जगाला कल्याणकारी अहिंसेचा विचार देणारे महापुरुष महात्मा गांधीजी"


महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी हे नाव भारतापुरते मर्यादित न राहता जगाच्या कानाकोप-यात पोहचले ते दया, क्षमा, शांती, सेवा, अहिंसा आणि परोपकार या सर्वोच्च मानवी मूल्यांची शिकवण देणारे जागतिक कीर्तीचे एक महान विचारवंत म्हणून.




३० जानेवारी हा त्यांचा स्मृतीदिन.या निमित्ताने बापूंच्या विचारांना आणि स्मृतीना उजाळा देऊयात. 



अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी बापूंनी आपले आयुष्य समर्पित केले.भारतीय  स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासाने बापूंची नोंद घेतली आहे.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला.भारतीय जनमत संघटित करुन सामान्य माणसांचा लढा उभारला.



बापूंच्या आयुष्यात अशा अनेक घटना आणि प्रसंग घडले ज्यांनी बापूंच्या मनावर खोलवर परिणाम झाला.अशाच एका प्रसंगातून बापूंचा प्रामाणिकपणा  आपणांस पहावयास मिळतो.




लहानपणी एका भावाला कर्जातून सोडविण्यासाठी दुसऱ्या भावाच्या कड्यातून सोन्याच्या तुकड्याची चोरी छोट्या मोहनदासने केली अवश्य.पण नंतर त्याला आपली चूक समजली.मोहनदासला चैन पडेना.




काय करावे ते समजेना.बराच वेळ विचार केल्यावर मोहनदासने आपल्या वडीलांना एक पत्र लिहिले.त्यात त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.आणि पुन्हा चोरी करणार नाही असे वचन दिले.आणि पुढे असेही लिहिले की वडीलांनी कितीही कडक शिक्षा दिली तरी वाईट वाटून घेणार नाही व ती शिक्षा आनंदाने सहन करेल.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


मोहनदास अर्थात गांधीजी यांचे वडील आजारी असल्याने अंथरुणात झोपून असत.गांधीजी आपल्या वडीलांकडे पत्र घेऊन गेले.त्यांच्या हातात पत्र ठेवले.आणि त्यांच्या जवळच पलंगावर गुपचूप बसले.




गांधीजींचे वडील उठून बसले आणि त्यांनी ते पत्र वाचले.पत्र वाचताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.


त्या अश्रूंचा असा परिणाम झाला की त्यांचे जीवन बदलले.मोहनदास पूर्वीपेक्षा कितीतरी चांगला मुलगा झाला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आपल्या मुलाचे धैर्य आणि खरेपणा पाहून गांधीजींच्या वडीलांचे हदय भरुन आले.त्यांनी गांधीजींनी न मारताच स्वतः दुःखी होऊन मोहनदासवर जो परिणाम घडवून आणला तो मारुन घडला नसता.


मारापेक्षा प्रेमाचा  मोहनदासवर खोल परिणाम झाला.प्रसंग साधा आणि छोटा परंतु गांधीजींच्या जीवनाला कलाटणी आणि वळण देणारा ठरला.




गांधीजींच्या जीवनातील हा अहिंसेचा पहिला धडा होता.मोठे झाल्यावर याच अहिसेंच्या जोरावर त्यांनी इंग्रजांशी न लढताच त्यांना आपल्या देशातून जायला भाग पाडले.


गांधीजींचे काम ,त्यांचा खरेपणा,  प्रामाणिकपणा आणि त्याग पाहून रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा ' म्हणायली सुरूवात केली.नंतर सगळा देश त्यांना ' महात्मा ' या नावानेच ओळखू लागला. 


स्वच्छता,स्वावलंबन,अहिंसा आणि सेवा ही मूल्ये स्वतःच्या जीवनात आचरणात आणून बापूंनी लोकांना सदवर्तनाचा धडा दिला.


माणूस गरीब असो वा श्रीमंत त्याचा माणूस म्हणून  सन्मान झाला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


देशसेवा करत असताना गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.




त्यांनी भारतीयांच्या मनात द्वेषाऐवजी प्रेमाची ज्योत पेटवली म्हणूनच शांती आणि अहिंसेचे प्रतीक असणारे गांधीजी  सगळ्या जगाला हवेहवेसे वाटतात.



लेखक : - शिक्षक, स्तंभ लेखक, आत्मप्रेरणा पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मण जगताप








Tuesday, January 25, 2022

महाराष्ट्रातील "या" पोलीस शिलेदारांना ७ शौर्य पोलीस पदक, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र पोलीस दलाला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४० पोलीस पदके; एकूण ५१ पोलीस पदकांसह मिळाला बहुमान"....

 


मुंबई, दि. २५ : भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस शिलेदारांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे.




यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.



“महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 



त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असे ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. 



याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. 


मुख्य अग्निशमन  अधिकारी  प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय  उत्कृष्ट सेवेसाठी  मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.




Tuesday, January 18, 2022

"पुणे शहरात आज कोरोनाबाधितांचा आकडा ६३०० पार; ३,३८१ रुग्ण कोरोनामुक्त, ५ जणांचा मृत्यू"...

 


पुणे, दि. 18 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येची लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


आज  पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने मागील काही दिवसांमधील चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 6,320 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.



पुणे शहरात 38,007 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 3,381 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 5 व्यक्तींचा  मृत्यू झाला. 



मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे व राज्य सरकारने लागू केलेले सर्व निर्बंध पाळणे गरजेचे आहे.


Saturday, January 15, 2022

"पुरंदरचा उज्वल व विकसनशील भविष्यकाळ - आमदार संजयजी चंदुकाका जगताप" - राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री नंदकुमार सागर यांचा पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख...

 



"पुरंदरचा उज्वल व विकसनशील भविष्यकाळ - आमदार संजयजी चंदुकाका जगताप" 


पुरंदर तालुका नव्हे तर पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण व राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे स्वर्गीय चंदुकाका जगताप होय. स्वर्गीय काका म्हणजे गेली चाळीस पन्नास वर्ष पुरंदर मध्ये सहकार, शिक्षण, क्रीडा, राजकारण अशा अनेक महत्वाच्या क्षेत्रात  मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व.काकांच्या कुटुंबातील पीढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल पुरंदर तालुक्याला आहे यात नवल नाही.




मागील काही काळात काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन अगदी तळागाळातील सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडली. शिक्षण, सहकार, राजकारण, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात काकांच्या पावलावर पाऊल ठेवून गरुडझेप घेत आपले नेतृत्व आणि कर्तुत्व सिद्ध केले. 




आपला व्यवसाय सांभाळत संपूर्ण पुरंदर-हवेली मधील जनता माझे कुटुंब आहे,या भावनेतून काम सुरू केले आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला कळून चुकले नात्यागोत्याच्या, गरीब-श्रीमंत या दरीच्या पलीकडे संजय सर आहेत अशी स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केली.




तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतील काही कळत नाही ही गृहीतक मोडीत काढून, त्यांना संजय सरांनी शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तरच शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. स्वर्गीय काकांच्याकडे शेतीविषयक अफाट ज्ञान होते याची चुणूक आमदार संजयसरांशी चर्चा करताना वारंवार जाणवते. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


नुसते स्वतःपुरते न पाहता माझ्या शेतकरी बंधूंचे शेतीतील पीक बाजारभावाच्या अभावी वाया जाऊ नये, या उदात्त हेतूने खळद येथे भव्य असे कोल्ड स्टोअरेज उभारले.




नुसत्या शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदा केला पाहिजे, यासाठी पुरंदर तालुक्यात आनंदी डेअरीच्या माध्यमातून धवलक्रांती घडवून शेतकऱ्यांना शेती बरोबर दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केले.आज आनंदी डेअरीच्या माध्यमातून अनेक शेतकरी, तरुण यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 




महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना शेतीमालाबरोबर शेतकऱ्यांना जी.एस.टी मिळत नाही त्यामुळे खत व बियाणे यावरील जी.एस.टी रद्द करावा असे अभ्यासू विधान करतानाचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.


    

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


घरची परिस्थिती पाहता संजय सरांना परदेशी शिक्षण घेणे सहज शक्य होते. परंतु सासवड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. आपण ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने माझ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने काकांनी अतिशय कष्टाने उभ्या केलेल्या श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची सचिव पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या सर्व शाळातून ई-लर्निंग सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणककक्ष अशा अनेक सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, यासाठी अतोनात प्रयत्न करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.




आज त्यामुळे संस्थेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस अधिकारी, शिक्षक, देशसेवेसाठी आर्मीमध्ये अशा अनेक नामवंत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच बरोबर एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी अशा विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत.




तालुक्यातील युवक हा शिक्षणाबरोबर आरोग्याने सुद्धा सक्षम असला पाहिजे, पुरंदरच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कुस्ती क्षेत्रामध्ये इच्छा असून सुद्धा तरुणांना आपले भवितव्य घडविता येत नव्हते, तरुणांची ही अवस्था पाहून शिवाजी व्यायाम मंदिर उभे करून स्वतः खर्च करीत तरुणांना एक नवी दिशा देऊन दरवर्षी पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा भरवून कुस्ती क्षेत्रात आपले भवितव्य घडविण्यासाठी तरुणांना एक नवे दालन खुले करून दिले.




युवक,युवती, शेतकरी यांनी नोकरी,शेती बरोबर इतर व्यवसायाकडे वळावे यासाठी संजय सर कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात.नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, अशी भावना त्यामागे आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्या सर्वांना व्यवसायासाठी भांडवल पुरंदर नागरी पतसंस्था,संत सोपानकाका सहकारी बँक, यांच्या माध्यमातून उभे करून अनेक कुटुंब संजयसरांनी उभी केली आहेत.


 पुरंदर-हवेली मधील लोकांना बारा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांचे दर्शन, मुस्लिम बांधवांना हज यात्रा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, अशा सर्व गोष्टींमुळे पुरंदरच्या जनतेने त्यांना श्रावणबाळ ही उपाधी दिली.




आमदार संजयसर ही समाजसेवा करु शकले कारण आई मा.आनंदीकाकी जगताप यांची प्रेरणा, थोरले बंधू भारतीय प्रशासन सेवेमधील अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप साहेब यांची भक्कम साथ, आमदार संजयसरांच्या पत्नी सौ. राजवर्धिनीताई जगताप यांचे सहकार्य, सर्व महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी केलेले कार्य या गोष्टी नाकारता येणार नाही.




पुरंदरचे राजकारण हे स्वर्गीय काकांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, राजकारणातून सुद्धा समाजकारण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काका होय. विविध कार्यकारी सोसायटी, सर्वसामान्य शेतकरी यांना विविध सुविधा उपलब्ध करणे, सासवड नगरपालिकेचे अध्यक्षपद,राज्य सहकार मंडळाचे अध्यक्षपद अशा अनेक पदावर काम करून काकांनी कामाचा मोठा डोंगर उभा केला. 




काकांची समाजाविषयी असणारी तळमळ आणि कणव हेच गुण संजय सरांच्यामध्ये जाणवतात. दोन वेळा यशाने हुलकावणी देऊन सुद्धा आपल्या ध्येयापासून यत्किंचित न ढळता समाजसेवेचे व्रत चालू ठेवून पुरंदर-हवेलीच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत होऊन सरांनी २०१९ ची पुरंदर हवेलीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. 




पुरंदर-हवेलीच्या जनतेने एक आपला माणूस मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी विधानसभेत संजयसरांच्या रूपाने पाठविला.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


आज पुरंदर-हवेलीमध्ये अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून पुरंदरकडे पाहिले जाते, ही ओळख बदलणे, शेतीसाठी पाणी, जेजुरी एम.आय.डी.सी मधील बंद असलेल्या कंपन्या, विमानतळ, तरुणांना रोजगार, अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, वाहून गेलेले बंधारे, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय, फुरसुंगी कचरा डेपो, पालखीमार्ग, पुणे व मुंबई येथे पुरंदर वसतिगृह उभारणे असे अनेक प्रश्न आमदार संजय सरांच्या पुढे आहेत,परंतु मला खात्री आहे, आपल्या अभ्यासू स्वभावाने सर या सर्व प्रश्नांना लिलया सामोरे जाऊन पुरंदर हवेलीच्या लोकांना योग्य प्रकारे न्याय देतील.




ज्याप्रमाणे सासवडच्या जनतेने सरांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवून सासवड नगरपालिकेची सत्ता सरांच्या हातात दिली, अतिशय सुक्ष्म नियोजन करीत सासवड नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक सर्व कर्मचारी यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत भारतामध्ये सासवड शहराचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे, त्याच पद्धतीने जेजुरी नगरपालिकासुद्धा काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.


अगदी तसेच पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरवित संजय सर पुरंदर हवेली तालुका सुजलाम सुफलाम करतील यात कोणतीच शंका नाही.



लेखक : - राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य   श्री.नंदकुमार सागर. जिजामाता हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जेजुरी,कार्याध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ.