जालना, दि.१४ : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजाची लाखो लोकांच्या उपस्थितीत, मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गाराने विक्रमी अशी अति विराट सभा संपन्न झाली.
"एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल." असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत सरकारला दिला.
आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली व मोठा जनसागर उपस्थित होता. सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले. त्यांचं भाषण सुरु झालं. "महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत."
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे." असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
तसंच आता मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या या सभेत सरकारकडे केल्या आहेत.
मनोज जरांगें पाटील यांच्या प्रमुख मागण्या :
१)महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
२)कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी.
३)मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबियांना सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
४)दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
५)सारथी संस्थेमार्फत पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
६)महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे.
"आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे म्हणून आपण इथे सगळे जमलो आहोत. आज मराठा समाजासाठीचा सुवर्णक्षण आला आहे. या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाला आहे. घराघरांतला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणार आहे की मी माझ्या नातवासाठी, मुलासाठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो आहे. आरक्षणासाठी मराठा पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात १० दिवस आहेत. आज जो जनसमुदाय आंतरवालीत आला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करा."
"मराठा समाजाने जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळी येत आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरु केलं.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आज लाखाने मराठा समुदाय आंतरवाली येथे उसळलाय. त्याचं एकच म्हणणं की राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजाने जो शब्द दिलाय त्या शब्दावर समाज ठाम आहे. 40 दिवस दिले, यात आम्ही एक शब्दही सरकारला विचारणार नाही, असा शब्द दिला होता.
या काळात एक शब्द विचारला नाही. तुमच्याकडे अजून दहा दिवस आहेत. या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40 व्या दिवशी सांगू."असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
‘मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार आहे. मराठ्यांची औलाद दिलेला शब्द मोडत नाही. मराठा समाज शांततेत आल्याचं पोलिसांनी बघितलंय. पोलीसच मला सांगतात, की मराठ्यांना मानावं लागेल की ते शांततेत आले, असं ते म्हणाले.’
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, की ‘थोडी गैरसोय झाली आहे पण थोडं सहन करा. आपल्या लेकरांना, पुढच्या पिढ्यांना सुखात बघायचं असेल तर हा संघर्ष केल्याशिवाय आणि सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण मागे हटायचं नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटील इंचभरही मागे हटणार नाही’.
त्यांनी सरकारला विनंती करत म्हटलं, की ‘मराठा समाजासाठी गठित केलेली समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5 हजार पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्याचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि समाजाचा ओबीसीत समावेश करा.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करून सांगतो. या राज्यातला सगळ्यात मोठा मराठा समाज, या समाजाची विनाकारण हालआपेष्टा करू नका."
"या गोरगरिब समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घेऊन, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीत समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र राज्यसरकारने व केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न गांभीर्याने घेऊन तो लवकर सोडवणे अत्यंत गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment